शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

परभणी : ‘ब्लड आॅन कॉल’ने तीन हजार रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:50 IST

राज्य शासनाच्या जीवन अमृत योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असून २०१४ ते २०१८ या चार वर्षांत ३ हजार ६३३ रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे ‘ब्लड आॅन कॉल’ या सेवेने जिल्ह्यातील ३ हजार रुग्णांचे चार वर्षांमध्ये प्राण वाचविल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाच्या जीवन अमृत योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असून २०१४ ते २०१८ या चार वर्षांत ३ हजार ६३३ रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे ‘ब्लड आॅन कॉल’ या सेवेने जिल्ह्यातील ३ हजार रुग्णांचे चार वर्षांमध्ये प्राण वाचविल्याची माहिती समोर आली आहे.एखाद्या घटनेतील रुग्णांना तत्काळ रक्त मिळावे, रक्तावाचून रुग्णाचा मृत्यू होऊ नये या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालया व्यतिरिक्त जिल्ह्यातील ४० कि.मी. अंतरापर्यंत काही वेळातच रक्ताची पिशवी उपलब्ध व्हावी, यासाठी जानेवारी २०१४ पासून राज्य शासनाने ‘ब्लड आॅन कॉल’ योजनेची अंमलबजावणी सुरु केली. या योजनेअंतर्गत रुग्णाला रक्त पिशवीची आवश्यकता असल्यास त्या रुग्णाने किंवा नातेवाईकाने १०४ या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधित रुग्णालयात अर्ध्या तासात रक्त पिशवीचा पुरवठा केला जातो.२०१४ पासून सुरु केलेल्या या योजनेला जिल्ह्यात दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०१४ या आर्थिक वर्षात ७४६ रुग्णांना ब्लड आॅन कॉल या योजनेतून रक्त पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात २९, फेब्रुवारी ६५, मार्च ८८, एप्रिल २०, मे ५४, जून १७, जुलै ७२, आॅगस्ट ७७, सप्टेंबर ६९, आॅक्टोबर १३५, नोव्हेंबर ८२ तर डिसेंबरमध्ये ३८ रुग्णांनी या योजनेअंतर्गत रक्त पिशवी मिळविली आहे.२०१५ या वर्षात ७२३ रुग्णांना ब्लड आॅन कॉलच्या माध्यमातून रक्त पिशवीचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक १०४, त्या पाठोपाठ आॅक्टोबर महिन्यात ९४ तर सर्वात कमी जानेवारी महिन्यात ४५ रुग्णांनी सेवा घेतली आहे.२०१६ या आर्थिक वर्षात तब्बल १ हजार २० रुग्णांनी १०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन रक्त पिशवी मिळविली आहे. यामध्ये सर्वाधिक जानेवारी महिन्यात १४४, फेब्रुवारी १३५, जून १०० तर आॅगस्ट महिन्यात १०४ रक्त पिशवींचा पुरवठा करुन रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले आहेत.२०१७ या आर्थिक वर्षात ७३२ तर १ जानेवारी २०१८ ते २१ मे २०१८ पर्यंत ४१२ रुग्ण व नातेवाईकांना जीवन अमृत सेवांतर्गत रक्त पिशवींचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक डिसेंबर महिन्यात ९९ तर आॅक्टोबर महिन्यात ८१ असे एकूण ३ हजार ६३३ रुग्णांचे प्राण जीवन अमृत सेवेच्या माध्यमातून वाचविण्यात यश मिळाले आहे.फोन करा, रक्त पिशवी मिळवाएखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता असल्यास ब्लड आॅन कॉल या योजनेच्या १०४ टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास अर्ध्या तासात परभणी शहरापासून ४० कि.मी. अंतरापर्यंत केवळ ४० रुपयांचा सरचार्ज घेऊन रक्त पिशव्यांचा पुरवठा केला जातो. मागणी असलेल्या ठिकाणी रक्त पुरवठा करण्याची जबाबदारी परभणी जिल्ह्यासाठी अरुणोदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला देण्यात आली आहे. या संस्थेचे तीन कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा रक्तपेढीत कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त पुरवठा केला जातो.

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार