शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

परभणी: आठ वर्षांतून एकदाच गाठली पावसाने सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:28 IST

तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत असून असमतोलही वाढत असल्याचे मागील आठ वर्षांच्या पर्जन्यमानाची आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आठ वर्षांत केवळ एकदाच पावसाने सरासरी गाठली असून तालुक्यातील दुधना प्रकल्पात शिल्लक असलेल्या पाण्यावर शहरवासियांची मदार अवलंबून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत असून असमतोलही वाढत असल्याचे मागील आठ वर्षांच्या पर्जन्यमानाची आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आठ वर्षांत केवळ एकदाच पावसाने सरासरी गाठली असून तालुक्यातील दुधना प्रकल्पात शिल्लक असलेल्या पाण्यावर शहरवासियांची मदार अवलंबून आहे.सेलू तालुक्यात सुपीक जमीन आहे. तसेच दुधना, कसुरा आणि करपरा या प्रमुख तीन नद्या वाहतात. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांच्या उत्पन्नावर शेतीचे बजेट अवलंबून आहे. सिंचनाची अपुरी व्यवस्था असल्याने पावसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांना पिके घ्यावी लागतात. मात्र मागील आठ वर्षांपासून पावसाचा असमतोल आणि पर्जन्य दिवसात कमालीची घट झाल्याने चिंता वाढली आहे.सेलू तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८१६.७० मि.मी. एवढी आहे. मागील आठ वर्षांत २०१३ या वर्षी ९१५.०४ मि.मी. सरासरी पाऊस झाला होता. हा अपवाद वगळता गेल्या आठ वर्षात एकदाही पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे या आकडेवारीवरून तालुक्यातील पर्जन्यमानावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती काय उत्पन्न लागले असेल आणि त्याची आर्थिक अवस्था कशी असेल, याचा अंदाज येतो. यावर्षीही जुलैपर्यंत केवळ ३०.६० मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाही शेतकºयांच्या नशिबी दुष्काळी परिस्थिती निर्माण होती काय? अशी भिती व्यक्त होत आहे. २०१४ पासून निम्न दुधना प्रकल्पात पाणी आडविण्यात येत आहे. परतीच्या पावसाने दोन वर्षांपूर्वी प्रकल्पात समाधानकारक पाणी साठा झाला होता. त्यावर सलग दोन वर्षे सेलू, परतूर, मंठा, परभणी, पूर्णा आणि नांदेड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दुधना प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यात आला. तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि जनावरांच्या चाºयासाठीही दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.जून महिन्यात दुधना प्रकल्पाच्या मृत साठ्यातून परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १६ दलघमी पाणी सोडल्यामुळे सेलू शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत आठ दिवसातून एकदा शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आले. तालुक्यातील देऊळगाव, वालूर, चिकलठाणा, सेलू, कुपटा या पाच महसूल मंडळातील पावसाच्या सरासरीची नोंद घेण्यात येते. दरम्यान, दरवर्षी कमी होत असलेल्या पावसामुळे शेती व्यवसाय कोलमडून पडला असून पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.आठ वर्षातील : पावसाची सरासरी (मि.मी.मध्ये)२०११ - ६३५२०१२ - ६१६.०४२०१३ - ९१५.०४२०१४ - ३५४.७८२०१५ - ४२९.१२२०१६ - ७४३.४२२०१७ - ६००२०१८ - ४५८