शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: आठ वर्षांतून एकदाच गाठली पावसाने सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:28 IST

तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत असून असमतोलही वाढत असल्याचे मागील आठ वर्षांच्या पर्जन्यमानाची आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आठ वर्षांत केवळ एकदाच पावसाने सरासरी गाठली असून तालुक्यातील दुधना प्रकल्पात शिल्लक असलेल्या पाण्यावर शहरवासियांची मदार अवलंबून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत असून असमतोलही वाढत असल्याचे मागील आठ वर्षांच्या पर्जन्यमानाची आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आठ वर्षांत केवळ एकदाच पावसाने सरासरी गाठली असून तालुक्यातील दुधना प्रकल्पात शिल्लक असलेल्या पाण्यावर शहरवासियांची मदार अवलंबून आहे.सेलू तालुक्यात सुपीक जमीन आहे. तसेच दुधना, कसुरा आणि करपरा या प्रमुख तीन नद्या वाहतात. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांच्या उत्पन्नावर शेतीचे बजेट अवलंबून आहे. सिंचनाची अपुरी व्यवस्था असल्याने पावसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांना पिके घ्यावी लागतात. मात्र मागील आठ वर्षांपासून पावसाचा असमतोल आणि पर्जन्य दिवसात कमालीची घट झाल्याने चिंता वाढली आहे.सेलू तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८१६.७० मि.मी. एवढी आहे. मागील आठ वर्षांत २०१३ या वर्षी ९१५.०४ मि.मी. सरासरी पाऊस झाला होता. हा अपवाद वगळता गेल्या आठ वर्षात एकदाही पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे या आकडेवारीवरून तालुक्यातील पर्जन्यमानावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती काय उत्पन्न लागले असेल आणि त्याची आर्थिक अवस्था कशी असेल, याचा अंदाज येतो. यावर्षीही जुलैपर्यंत केवळ ३०.६० मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाही शेतकºयांच्या नशिबी दुष्काळी परिस्थिती निर्माण होती काय? अशी भिती व्यक्त होत आहे. २०१४ पासून निम्न दुधना प्रकल्पात पाणी आडविण्यात येत आहे. परतीच्या पावसाने दोन वर्षांपूर्वी प्रकल्पात समाधानकारक पाणी साठा झाला होता. त्यावर सलग दोन वर्षे सेलू, परतूर, मंठा, परभणी, पूर्णा आणि नांदेड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दुधना प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यात आला. तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि जनावरांच्या चाºयासाठीही दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.जून महिन्यात दुधना प्रकल्पाच्या मृत साठ्यातून परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १६ दलघमी पाणी सोडल्यामुळे सेलू शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत आठ दिवसातून एकदा शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आले. तालुक्यातील देऊळगाव, वालूर, चिकलठाणा, सेलू, कुपटा या पाच महसूल मंडळातील पावसाच्या सरासरीची नोंद घेण्यात येते. दरम्यान, दरवर्षी कमी होत असलेल्या पावसामुळे शेती व्यवसाय कोलमडून पडला असून पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.आठ वर्षातील : पावसाची सरासरी (मि.मी.मध्ये)२०११ - ६३५२०१२ - ६१६.०४२०१३ - ९१५.०४२०१४ - ३५४.७८२०१५ - ४२९.१२२०१६ - ७४३.४२२०१७ - ६००२०१८ - ४५८