शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

परभणी: आठ वर्षांतून एकदाच गाठली पावसाने सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:28 IST

तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत असून असमतोलही वाढत असल्याचे मागील आठ वर्षांच्या पर्जन्यमानाची आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आठ वर्षांत केवळ एकदाच पावसाने सरासरी गाठली असून तालुक्यातील दुधना प्रकल्पात शिल्लक असलेल्या पाण्यावर शहरवासियांची मदार अवलंबून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत असून असमतोलही वाढत असल्याचे मागील आठ वर्षांच्या पर्जन्यमानाची आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आठ वर्षांत केवळ एकदाच पावसाने सरासरी गाठली असून तालुक्यातील दुधना प्रकल्पात शिल्लक असलेल्या पाण्यावर शहरवासियांची मदार अवलंबून आहे.सेलू तालुक्यात सुपीक जमीन आहे. तसेच दुधना, कसुरा आणि करपरा या प्रमुख तीन नद्या वाहतात. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांच्या उत्पन्नावर शेतीचे बजेट अवलंबून आहे. सिंचनाची अपुरी व्यवस्था असल्याने पावसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांना पिके घ्यावी लागतात. मात्र मागील आठ वर्षांपासून पावसाचा असमतोल आणि पर्जन्य दिवसात कमालीची घट झाल्याने चिंता वाढली आहे.सेलू तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८१६.७० मि.मी. एवढी आहे. मागील आठ वर्षांत २०१३ या वर्षी ९१५.०४ मि.मी. सरासरी पाऊस झाला होता. हा अपवाद वगळता गेल्या आठ वर्षात एकदाही पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे या आकडेवारीवरून तालुक्यातील पर्जन्यमानावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती काय उत्पन्न लागले असेल आणि त्याची आर्थिक अवस्था कशी असेल, याचा अंदाज येतो. यावर्षीही जुलैपर्यंत केवळ ३०.६० मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाही शेतकºयांच्या नशिबी दुष्काळी परिस्थिती निर्माण होती काय? अशी भिती व्यक्त होत आहे. २०१४ पासून निम्न दुधना प्रकल्पात पाणी आडविण्यात येत आहे. परतीच्या पावसाने दोन वर्षांपूर्वी प्रकल्पात समाधानकारक पाणी साठा झाला होता. त्यावर सलग दोन वर्षे सेलू, परतूर, मंठा, परभणी, पूर्णा आणि नांदेड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दुधना प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यात आला. तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि जनावरांच्या चाºयासाठीही दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.जून महिन्यात दुधना प्रकल्पाच्या मृत साठ्यातून परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १६ दलघमी पाणी सोडल्यामुळे सेलू शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत आठ दिवसातून एकदा शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आले. तालुक्यातील देऊळगाव, वालूर, चिकलठाणा, सेलू, कुपटा या पाच महसूल मंडळातील पावसाच्या सरासरीची नोंद घेण्यात येते. दरम्यान, दरवर्षी कमी होत असलेल्या पावसामुळे शेती व्यवसाय कोलमडून पडला असून पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.आठ वर्षातील : पावसाची सरासरी (मि.मी.मध्ये)२०११ - ६३५२०१२ - ६१६.०४२०१३ - ९१५.०४२०१४ - ३५४.७८२०१५ - ४२९.१२२०१६ - ७४३.४२२०१७ - ६००२०१८ - ४५८