शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

परभणी : दोन महिन्यांनंतरही बंधारे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:08 IST

पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटत आहे़ फक्त धन जोपासणारा पाऊस पडत असल्याने खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी काळात जोरदार पाऊस पडला नसल्याने गोदावरी नदीच्या पात्रात अद्याप पूर आला नसल्याने दोन महिन्यानंतरही तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल बंधारे कोरडेठाक आहेत़ त्यामुळे या भागात मोठ्या पाऊसाची प्रतीक्षा कायम आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटत आहे़ फक्त धन जोपासणारा पाऊस पडत असल्याने खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी काळात जोरदार पाऊस पडला नसल्याने गोदावरी नदीच्या पात्रात अद्याप पूर आला नसल्याने दोन महिन्यानंतरही तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल बंधारे कोरडेठाक आहेत़ त्यामुळे या भागात मोठ्या पाऊसाची प्रतीक्षा कायम आहे़पाथरी तालुक्यात मागील तीन ते चार वर्षापासून सतत दुष्काळ पडत आहे़ गतवर्षी या भागात पावसाळ्यात सुरुवातीला दोन महिने पाऊस पडला होता़ आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पडलेल्या पाऊसानंतर पाऊस न पडल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती़ तसेच जायकवाडी धरणात पाणी नसल्याने डावा कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही़ त्यामुळे बागायती पिकांना मोठा फटका बसला होता़ यावर्षी सुरुवातीला तालुक्यातील काही भागात पाऊस पडल्याने वेळेत खरिपाच्या पेरण्या झाल्या तर अर्ध्या भागात म्हणजेच बाभळगाव पट्टयात पाऊस पडला नाही़ यामुळे उशिरा तर काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली आहे़मागील आठ दिवसापासून ढगाळ वातावरण असताना जोरदार पाऊस पडत नाही़ पाऊस कमी असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी अद्याप वाढली गेली नाही़ तसेच नदी नाल्यांना पूरही आला नाही़ जुलै महिना संपला, तरी मोठा पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे़ पाथरी तालुक्यात गोदावरी नदीच्या पात्रात उच्च पातळीचे ढालेगाव आणि मुदगल येथे बंधारे आहेत़ या दोन्ही बंधाºयावर गोदाकाठच्या गावातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे़ दोन्ही बंधारे अद्यापही कोरडेठाक आहेत़शहराची पाणी समस्या गंभीर४पाथरी शहराला गोदावरी नदीच्या पात्रातील रामपुरी रत्नेश्वर येथून पाणी पुरवठा केला जातो़४भर उन्हाळ्यात पात्र कोरडे पडल्याने गेल्या मे महिन्यापासून शहराच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे़४मे महिन्यात पासून पाणी पुरवठ्याचे नियोजन करताना नगर पालिकेला मोठी कसरत करावी लागत आहे़ शहरातील काही वॉर्डात नगर पालिकेने टँकरने पाणी पुरवठा केला़भर पावसाळ्यात १२ दिवसांआड पाणी४ढालेगाव बंधाºयात भर पावसाळ्यात पाणी आले नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात १२ दिवसांआड पाणी पुरवठा होतोय अशीच परिस्थिती राहिली तर शहराच्या पाण्याची समस्या अधिक बिकट होणार आहे़