शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

परभणी : दोन महिन्यांनंतरही बंधारे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:08 IST

पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटत आहे़ फक्त धन जोपासणारा पाऊस पडत असल्याने खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी काळात जोरदार पाऊस पडला नसल्याने गोदावरी नदीच्या पात्रात अद्याप पूर आला नसल्याने दोन महिन्यानंतरही तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल बंधारे कोरडेठाक आहेत़ त्यामुळे या भागात मोठ्या पाऊसाची प्रतीक्षा कायम आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटत आहे़ फक्त धन जोपासणारा पाऊस पडत असल्याने खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी काळात जोरदार पाऊस पडला नसल्याने गोदावरी नदीच्या पात्रात अद्याप पूर आला नसल्याने दोन महिन्यानंतरही तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल बंधारे कोरडेठाक आहेत़ त्यामुळे या भागात मोठ्या पाऊसाची प्रतीक्षा कायम आहे़पाथरी तालुक्यात मागील तीन ते चार वर्षापासून सतत दुष्काळ पडत आहे़ गतवर्षी या भागात पावसाळ्यात सुरुवातीला दोन महिने पाऊस पडला होता़ आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पडलेल्या पाऊसानंतर पाऊस न पडल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती़ तसेच जायकवाडी धरणात पाणी नसल्याने डावा कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही़ त्यामुळे बागायती पिकांना मोठा फटका बसला होता़ यावर्षी सुरुवातीला तालुक्यातील काही भागात पाऊस पडल्याने वेळेत खरिपाच्या पेरण्या झाल्या तर अर्ध्या भागात म्हणजेच बाभळगाव पट्टयात पाऊस पडला नाही़ यामुळे उशिरा तर काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली आहे़मागील आठ दिवसापासून ढगाळ वातावरण असताना जोरदार पाऊस पडत नाही़ पाऊस कमी असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी अद्याप वाढली गेली नाही़ तसेच नदी नाल्यांना पूरही आला नाही़ जुलै महिना संपला, तरी मोठा पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे़ पाथरी तालुक्यात गोदावरी नदीच्या पात्रात उच्च पातळीचे ढालेगाव आणि मुदगल येथे बंधारे आहेत़ या दोन्ही बंधाºयावर गोदाकाठच्या गावातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे़ दोन्ही बंधारे अद्यापही कोरडेठाक आहेत़शहराची पाणी समस्या गंभीर४पाथरी शहराला गोदावरी नदीच्या पात्रातील रामपुरी रत्नेश्वर येथून पाणी पुरवठा केला जातो़४भर उन्हाळ्यात पात्र कोरडे पडल्याने गेल्या मे महिन्यापासून शहराच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे़४मे महिन्यात पासून पाणी पुरवठ्याचे नियोजन करताना नगर पालिकेला मोठी कसरत करावी लागत आहे़ शहरातील काही वॉर्डात नगर पालिकेने टँकरने पाणी पुरवठा केला़भर पावसाळ्यात १२ दिवसांआड पाणी४ढालेगाव बंधाºयात भर पावसाळ्यात पाणी आले नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात १२ दिवसांआड पाणी पुरवठा होतोय अशीच परिस्थिती राहिली तर शहराच्या पाण्याची समस्या अधिक बिकट होणार आहे़