शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ५९६ बालके गंभीर कुपोषणातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:51 IST

महिला व बालविकास विभागाने राबविलेल्या ग्राम बालविकास केंद्र या विशेष मोहिमेमुळे १ हजार ९७ कुपोषित बालकांपैकी ५९६ बालके गंभीर कुपोषणातून कायमची बाहेर पडली असल्याची माहिती या विभागाने दिली आहे़ विशेष म्हणजे, या मोहिमेत ४२६ बालकांना गंभीर कुपोषणातून मध्यम स्थितीत आणण्यातही विभागाला यश मिळाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महिला व बालविकास विभागाने राबविलेल्या ग्राम बालविकास केंद्र या विशेष मोहिमेमुळे १ हजार ९७ कुपोषित बालकांपैकी ५९६ बालके गंभीर कुपोषणातून कायमची बाहेर पडली असल्याची माहिती या विभागाने दिली आहे़ विशेष म्हणजे, या मोहिमेत ४२६ बालकांना गंभीर कुपोषणातून मध्यम स्थितीत आणण्यातही विभागाला यश मिळाले आहे़सकस आहार न मिळाल्याने बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण जिल्ह्यातही अधिक आहे़ अशा बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने मोहीम राबविली जाते़ महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वीच कुपोषण निर्मूलन उपक्रम हाती घेतला होता़ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़ पी़ पृथ्वीराज यांनी जिल्ह्यात ‘शून्य कुपोषण’ हे अभियान सुरू केले़ अभियानाच्या प्रारंभीच ग्रामीण भागात सर्वेक्षण करून कुपोषित बालकांचा शोध घेण्यात आला़ तेव्हा जिल्हाभरात १ हजार ९६ बालके कुपोषित असल्याची बाब समोर आली़ त्यानंतर या बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने प्रयत्न सुरू केले़ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले़ जिल्ह्यातील २८५ केंद्रांमधून या बालकांना संतुलित आहार देण्याचे प्रयत्न सुरू झाले़साधारणत: जुलै महिन्यात महिला व बालविकास विभागाने हे अभियान राबविले़ या अभियानाचा परिणाम दीड महिन्यातच दिसून आला़ जिल्ह्यात दाखल झालेल्या १ हजार ९७ बालकांना दररोज संतुलित आहार देणे, त्यांचे वजन घेणे, आरोग्य तपासणी करणे असे उपक्रम राबविण्यात आले़ त्यात जिल्हाभरातील विविध केंद्रांत दाखल झालेल्या बालकांपैकी ५९६ बालके गंभीर कुपोषणातून कायमची बाहेर पडली असून, ४२६ बालके मध्यमस्थितीत आली आहेत़ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ कैलास घोडके यांनी सुक्ष्म नियोजन केले़ महिला व बालकल्याण सभापती राधाबाई सूर्यवंशी यांनी वेळोवेळी केंद्रांना भेटी देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्देश दिले़ त्यामुळेच कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मदत झाली, असे डॉ़ घोडके यांनी सांगितले़घरोघरी ठेवा बाळ कोपराबालकांमध्ये मुळातच खाण्याची आवड असते़ त्यांना थोड्या थोड्या वेळाने काही तरी खायला लागते. तेव्हा प्रत्येक पालकांनी आपल्या घरात मुरमुरे, शेंगदाणे लाडू, खजूर, गुळपट्टी असे पदार्थ भरणीमध्ये भरून ठेवावीत़ हे पदार्थ मुलांना सहज हाताला येतील, अशा पद्धतीने ठेवावीत, असे आवाहन जि.प. तर्फे करण्यात आले आहे.२८५ केंद्रांतून बालकांची देखभालकुपोषित बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात २८५ ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले़ त्यात गंगाखेड तालुक्यात १७, पाथरी ४१, परभणी २९, जिंतूर ६१, पालम ३१, पूर्णा २७, सेलू ३८, मानवत २९ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये १२ केंद्र सुरू करण्यात आले़ या अंगणवाडी केंद्रात दाखल झालेल्या बालकांना जुलै महिन्यापासून दररोज सात वेळा नियमितपणे अमायलेज युक्त आहार देण्यात आला़ तसेच गरजेनुसार औषधी देण्यात आली़ यासाठी सेविकांना प्रती बालक प्रती दिवस २५ रुपये या प्रमाणे निधीही उपलब्ध करून दिला़ वैद्यकीय अधिकाºयांमार्फत १५ दिवसांना बालकांची तपासणी करण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani z pपरभणी जिल्हा परिषदfoodअन्नGovernmentसरकार