शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

परभणी : ५९६ बालके गंभीर कुपोषणातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:51 IST

महिला व बालविकास विभागाने राबविलेल्या ग्राम बालविकास केंद्र या विशेष मोहिमेमुळे १ हजार ९७ कुपोषित बालकांपैकी ५९६ बालके गंभीर कुपोषणातून कायमची बाहेर पडली असल्याची माहिती या विभागाने दिली आहे़ विशेष म्हणजे, या मोहिमेत ४२६ बालकांना गंभीर कुपोषणातून मध्यम स्थितीत आणण्यातही विभागाला यश मिळाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महिला व बालविकास विभागाने राबविलेल्या ग्राम बालविकास केंद्र या विशेष मोहिमेमुळे १ हजार ९७ कुपोषित बालकांपैकी ५९६ बालके गंभीर कुपोषणातून कायमची बाहेर पडली असल्याची माहिती या विभागाने दिली आहे़ विशेष म्हणजे, या मोहिमेत ४२६ बालकांना गंभीर कुपोषणातून मध्यम स्थितीत आणण्यातही विभागाला यश मिळाले आहे़सकस आहार न मिळाल्याने बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण जिल्ह्यातही अधिक आहे़ अशा बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने मोहीम राबविली जाते़ महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वीच कुपोषण निर्मूलन उपक्रम हाती घेतला होता़ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़ पी़ पृथ्वीराज यांनी जिल्ह्यात ‘शून्य कुपोषण’ हे अभियान सुरू केले़ अभियानाच्या प्रारंभीच ग्रामीण भागात सर्वेक्षण करून कुपोषित बालकांचा शोध घेण्यात आला़ तेव्हा जिल्हाभरात १ हजार ९६ बालके कुपोषित असल्याची बाब समोर आली़ त्यानंतर या बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने प्रयत्न सुरू केले़ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले़ जिल्ह्यातील २८५ केंद्रांमधून या बालकांना संतुलित आहार देण्याचे प्रयत्न सुरू झाले़साधारणत: जुलै महिन्यात महिला व बालविकास विभागाने हे अभियान राबविले़ या अभियानाचा परिणाम दीड महिन्यातच दिसून आला़ जिल्ह्यात दाखल झालेल्या १ हजार ९७ बालकांना दररोज संतुलित आहार देणे, त्यांचे वजन घेणे, आरोग्य तपासणी करणे असे उपक्रम राबविण्यात आले़ त्यात जिल्हाभरातील विविध केंद्रांत दाखल झालेल्या बालकांपैकी ५९६ बालके गंभीर कुपोषणातून कायमची बाहेर पडली असून, ४२६ बालके मध्यमस्थितीत आली आहेत़ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ कैलास घोडके यांनी सुक्ष्म नियोजन केले़ महिला व बालकल्याण सभापती राधाबाई सूर्यवंशी यांनी वेळोवेळी केंद्रांना भेटी देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्देश दिले़ त्यामुळेच कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मदत झाली, असे डॉ़ घोडके यांनी सांगितले़घरोघरी ठेवा बाळ कोपराबालकांमध्ये मुळातच खाण्याची आवड असते़ त्यांना थोड्या थोड्या वेळाने काही तरी खायला लागते. तेव्हा प्रत्येक पालकांनी आपल्या घरात मुरमुरे, शेंगदाणे लाडू, खजूर, गुळपट्टी असे पदार्थ भरणीमध्ये भरून ठेवावीत़ हे पदार्थ मुलांना सहज हाताला येतील, अशा पद्धतीने ठेवावीत, असे आवाहन जि.प. तर्फे करण्यात आले आहे.२८५ केंद्रांतून बालकांची देखभालकुपोषित बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात २८५ ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले़ त्यात गंगाखेड तालुक्यात १७, पाथरी ४१, परभणी २९, जिंतूर ६१, पालम ३१, पूर्णा २७, सेलू ३८, मानवत २९ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये १२ केंद्र सुरू करण्यात आले़ या अंगणवाडी केंद्रात दाखल झालेल्या बालकांना जुलै महिन्यापासून दररोज सात वेळा नियमितपणे अमायलेज युक्त आहार देण्यात आला़ तसेच गरजेनुसार औषधी देण्यात आली़ यासाठी सेविकांना प्रती बालक प्रती दिवस २५ रुपये या प्रमाणे निधीही उपलब्ध करून दिला़ वैद्यकीय अधिकाºयांमार्फत १५ दिवसांना बालकांची तपासणी करण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani z pपरभणी जिल्हा परिषदfoodअन्नGovernmentसरकार