शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

परभणी: ४३३ कुटुंबियांना मिळणार शासकीय मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:53 IST

जिल्ह्यातील ४३३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाणार असून २२ डिसेंबरपासून जिल्हा प्रशासन विशेष योजनेअंतर्गत हे काम करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील ४३३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाणार असून २२ डिसेंबरपासून जिल्हा प्रशासन विशेष योजनेअंतर्गत हे काम करणार आहे.विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार अधिकारी व कर्मचाºयांनी मागील महिन्यात परभणी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेटी दिल्या होत्या. या कुटुंबियांची संपूर्ण माहिती प्रशासनाने नव्याने उपलब्ध करुन घेतली. त्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांची सध्याची परिस्थिती, उपलब्ध असलेली शेती, सद्य परिस्थितीत कुटुंबातील शेतकºयांना रोजगाराभिमूख कौशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे का? आरोग्याच्या संदर्भाने प्रशासन काही मदत करु शकते का? शेतीचा विकास करण्यासाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या जाऊ शकतात का? तसेच बँकांचे कर्ज, कर्ज माफीचा लाभ मिळाला का? कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला आहे का? या मुद्यांवर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची माहिती प्रशासनाने एकत्र केली.या माहितीचे वर्गीकरण करण्यात आले असून या वर्गीकरणानुसार आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना त्यांच्या आवश्यकतेनुसार तातडीने शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ४३३ शेतकरी कुटुंबियांची माहिती प्रशासनाने संकलित केली असून या माहितीचे वर्गीकरणही झाले आहे. त्यानुसार २२ डिसेंबरपासून या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना विशेष योजनेच्याअंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.असा मिळणार योजनांचा लाभ२०१२ पासून आजपर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्यांची माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाने या शेतकरी कुटुंबियांना मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यात २१८ शेतकरी कुटुंबियांना रोजगाराभिमूख प्रशिक्षण दिले जाणार आहे. ११२ कुटुंबियांना आरोग्यविषयक उपचार दिले जाणार असून ३३८ कुटुंबियांना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे २१२ शेतकºयांच्या शेतामध्ये वीज जोडणी देणे, १५६ शेतकºयांच्या घरी वीज जोडणी देणे, २६२ शेतकºयांना सिंचनासाठी विहीर उपलब्ध करुन देणे, २३४ कुटुंबियांना गॅस जोडणी देणे, २०६ कुटुंबियांना अन्न सुरक्षेचा लाभ, ७४ शेतकरी कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ, ५२ शेतकरी कुटुंबियांना शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ देणे, १७२ शेतकºयांच्या पाल्यांना वसतिगृहाची सुविधा, २२० कुटुंबियांना शौचालय, २८९ कुटुंबियांना घरकुल, ६५ कुटुंबियांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा तर २५१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वेतन योजनेचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. २१२ शेतकरी कुटुंबियांना राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जनधन खाते काढून दिले जाणार आहे.