शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

परभणी: ४३३ कुटुंबियांना मिळणार शासकीय मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:53 IST

जिल्ह्यातील ४३३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाणार असून २२ डिसेंबरपासून जिल्हा प्रशासन विशेष योजनेअंतर्गत हे काम करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील ४३३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाणार असून २२ डिसेंबरपासून जिल्हा प्रशासन विशेष योजनेअंतर्गत हे काम करणार आहे.विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार अधिकारी व कर्मचाºयांनी मागील महिन्यात परभणी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेटी दिल्या होत्या. या कुटुंबियांची संपूर्ण माहिती प्रशासनाने नव्याने उपलब्ध करुन घेतली. त्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांची सध्याची परिस्थिती, उपलब्ध असलेली शेती, सद्य परिस्थितीत कुटुंबातील शेतकºयांना रोजगाराभिमूख कौशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे का? आरोग्याच्या संदर्भाने प्रशासन काही मदत करु शकते का? शेतीचा विकास करण्यासाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या जाऊ शकतात का? तसेच बँकांचे कर्ज, कर्ज माफीचा लाभ मिळाला का? कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला आहे का? या मुद्यांवर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची माहिती प्रशासनाने एकत्र केली.या माहितीचे वर्गीकरण करण्यात आले असून या वर्गीकरणानुसार आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना त्यांच्या आवश्यकतेनुसार तातडीने शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ४३३ शेतकरी कुटुंबियांची माहिती प्रशासनाने संकलित केली असून या माहितीचे वर्गीकरणही झाले आहे. त्यानुसार २२ डिसेंबरपासून या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना विशेष योजनेच्याअंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.असा मिळणार योजनांचा लाभ२०१२ पासून आजपर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्यांची माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाने या शेतकरी कुटुंबियांना मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यात २१८ शेतकरी कुटुंबियांना रोजगाराभिमूख प्रशिक्षण दिले जाणार आहे. ११२ कुटुंबियांना आरोग्यविषयक उपचार दिले जाणार असून ३३८ कुटुंबियांना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे २१२ शेतकºयांच्या शेतामध्ये वीज जोडणी देणे, १५६ शेतकºयांच्या घरी वीज जोडणी देणे, २६२ शेतकºयांना सिंचनासाठी विहीर उपलब्ध करुन देणे, २३४ कुटुंबियांना गॅस जोडणी देणे, २०६ कुटुंबियांना अन्न सुरक्षेचा लाभ, ७४ शेतकरी कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ, ५२ शेतकरी कुटुंबियांना शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ देणे, १७२ शेतकºयांच्या पाल्यांना वसतिगृहाची सुविधा, २२० कुटुंबियांना शौचालय, २८९ कुटुंबियांना घरकुल, ६५ कुटुंबियांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा तर २५१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वेतन योजनेचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. २१२ शेतकरी कुटुंबियांना राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जनधन खाते काढून दिले जाणार आहे.