शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

परभणी : २९ लाखांचे कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:16 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजनेंतर्र्गत १० डिसेंबरपर्यंत ४० शेतकऱ्यांना २९ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्जामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना हक्काचा पैसा उपलब्ध झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजनेंतर्र्गत १० डिसेंबरपर्यंत ४० शेतकऱ्यांना २९ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्जामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना हक्काचा पैसा उपलब्ध झाला आहे.आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने सुगीच्या काळात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला जातो. परिणामी बाजारभाव कमी होतात. शेतमालास योग्य भाव न मिळाल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. काढणी हंगामात शेतमालाची साठवणूक करून काही कालावधीनंतर तो बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास ज्यादा भाव मिळू शकतो. शेतकºयांना सुगीच्या काळात असलेली आर्थिक निकड लक्षात घेऊन गरजेच्या वेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळ शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.मानवत बाजार समितीनेही या योजनेची अंमलबजावणी केली असून शेतमाल तारण ठेवल्यास बाजार भावानुसार सहा महिन्यांच्या मुदतीसाठी ६ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. या कर्जाचा भरणा १८० दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. चालू वर्षाचा सातबारा, शेतमालाचे पीकपेरा पत्र, १०० रुपयांचा बॉम्ड आदी कागदपत्र जमा करून बाजार समितीकडे सादर केल्यास कर्ज उपलब्ध करून दिले जाते. १० आॅक्टोबर ते १० डिसेंबर या काळात बाजार समितीकडे ४० शेतकºयांनी २ हजार २५५ सोयाबीन कट्टे तारण ठेवले असून या शेतकºयांना २९ लाख ६४ हजार ३०० रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी पणन मंडळाने १७ लाख ३४ हजार रुपये उपलब्ध करून दिले असून उर्वरित १२ लाख रुपये बाजार समितीने उपलब्ध केले आहेत.६ टक्के व्याज दराने कर्जया योजनेंतर्गत बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या ७५ टक्के रक्कम सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ६ टक्के व्याज दराने तारण कर्ज म्हणून दिली जाते. ही योजना पणन मंडळाच्या स्वनिधीतून बाजार समित्यांमार्फत राबविली जाते. सहा महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाºया बाजार समित्यांना ३ टक्के व्याज सवलत पणन मंडळाकडून दिली जाते. तसेच ज्या बाजार समित्या स्वनिधीतून कर्ज योजना राबवितात त्या बाजार समित्यांना वाटप केलेल्या कर्जरकमेवर ३ टक्के व्याज सवलत अनुदान स्वरुपात दिले जाते.कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने शेतमाल तारण ठेऊन नाममात्र ६ टक्के दराने सहा महिने मुदतीचे कर्ज बाजार समितीने उपलब्ध करून दिले आहे. शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा.-गंगाधरराव कदम,सभापती कृऊबा, मानवतशेतमाल तारण योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या शेतकºयांना १८० दिवसांच्या आत कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. शेतकºयांची निकड लक्षात घेऊन बाजार समितीने ही योजना सुरू केली आहे.-शिवनारायण सारडा,प्रभारी सचिव

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती