शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

परभणी : १४० ग्राहकांची वीज थकबाकीमुळे तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:51 IST

शहरातील वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढत असून वसुलीत शहराचा क्रमांक तळाला गेला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने मंगळवारपासून थकबाकी वसुली मोहीम हाती घेत १४० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. आणखी २७०० थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : शहरातील वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढत असून वसुलीत शहराचा क्रमांक तळाला गेला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने मंगळवारपासून थकबाकी वसुली मोहीम हाती घेत १४० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. आणखी २७०० थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडली जाणार आहे.शहरात महावितरणचे ९ हजार ८०० ग्राहक आहेत. यातील तब्बल २ हजार ७०० ग्राहकांनी मार्चनंतर एकाही वीज बिलाचा भरणा केलेला नाही. या ग्राहकांकडे अडीच कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे वीज बिल वसुलीत शहराचा क्रमांक शेवटचा आहे. शहराची एकूण वीज बिल थकबाकी ४ कोटी २२ लाख झाली आहे. परिणामी भारनियमनात वाढ केली जात आहे. मंगळवारपासून महावितरणकडून वीज बिल थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई केली जात आहे. महिन्याला शहरातील वीज ग्राहक १ कोटी २० हजारांची वीज वापरतात. त्या तुलनेत केवळ ४० लाख रुपयांचा भरणा ग्राहकांंकडून होतो. त्यामुळे दर महिन्याला थकबाकीचा आकडा फुगत आहे. महावितरण कंपनीने वसुलीसाठी ६ पथके स्थापन केली आहेत. या पथकात ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परभणी व इतर शहरातील महावितरणचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. ३० आॅक्टोबरपर्यंत वसुली मोहीम चालविणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता राजेश मेश्राम यांनी दिली.केवळ दोन हजार : ग्राहक भरतात नियमित बिलशहरातील ९ हजार ८०० ग्राहकांपैकी केवळ २ हजारच ग्राहक नियमित वीज बिलाचा भरणा करतात. त्यामुळे शहराची थकबाकी साडेचार कोटींच्या घरात आहे. तसेच वसुलीमध्ये शहर तळाला आहे. त्यामुळे शहरात सद्यस्थितीत सहा तास भारनियमन केले जात आहे. गरज भासल्यास सक्तीचे भारनियमन वाढवून ९ तास केले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण