शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

परभणी : हरभरा विक्रीचे दहा लाख रुपये झाले जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:34 IST

जिल्हा मार्केटिंग व विदर्भ फेडरेशनच्या वतीने सुरू केलेल्या येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत १७ शेतकºयांच्या खात्यावर १० लाख रुपये जमा झाल्याची माहिती खरेदी विक्री संघाने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी ): जिल्हा मार्केटिंग व विदर्भ फेडरेशनच्या वतीने सुरू केलेल्या येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत १७ शेतकºयांच्या खात्यावर १० लाख रुपये जमा झाल्याची माहिती खरेदी विक्री संघाने दिली.तालुक्यात मागील काही वर्षांपासून सोयाबीन, तुरी पाठोपाठ हरभºयाचे उत्पादन होत आहे. यावर्षीच्या रबी हंगामात ५ हजार ६० हेक्टवर हरभºयाचा पेरा करण्यात आला. कमी पाणी पाळ्यामध्ये पीक हाती येत असल्याचे त्याचे लागवड क्षेत्र गव्हाच्या तुलनेत वाढले आहे. यावर्षी शेतकºयांनी हरभºयाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले होते. शासनाचा हमीभाव ४ हजार ४४० रुपये असताना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा एक ते दीड हजार कमी मिळत असल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. त्यामुळे हमीभाव केंद्रावर हरभरा विक्री करण्याशिवाय शेतकºयांसमोर पर्याय राहिला नव्हता. २१ मार्च २०१८ पासून येथील खरेदी विक्री संघात आॅनलाईन नोंदणी सुरू झाली. ३ मे २०१८ पासून बाजार समिती परिसरात काटा सुरू करून हरभºयाची खरेदी सुरू करण्यात आली. आॅनलाईन हरभरा विक्रीसाठी तालुक्यातील १२९३ शेतकºयांनी खरेदी विक्री संघात नोंद केली होती. मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत ६५३ शेतकºयांचा ८ हजार ७८३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. शेतकºयांचा हरभरा खरेदी केल्यानंतर सुमारे ४६८ शेतकºयांचे ६ हजार २०८ क्विंटलचे २ कोटी ७३ लाख रुपये थकले होते. तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही कष्टाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले. आठ दिवसांत आरटीजीएसद्वारे शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आदेश असताना ही रक्कम मिळत नसल्याने शेतकºयांना उसणवारी करावी लागली. यंदाच्या हंगामातील नवीन हरभºयाची पेरणी झाल्यानंतर हमीभाव केंद्रावर माल विक्री केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. १७ आॅक्टोबरपर्यंत १० लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे ४५८ शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.तुरीचे ४६ लाख रुपये थकलेशासकीय हमीभाव केंद्रावर विदर्भ को.आॅप. फेडरेशनच्या वतीने ९ फेब्रुवारीपासून तूर खरेदीला सुरुवात झाली. तूर विक्रीसाठी तालुक्यातील ३ हजार १५० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. यातील केवळ ८४४ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली. ६० तूर उत्पादक शेतकºयांचे ८४९ क्विंटल तुरीचे ४६ लाख २६ हजार रुपये थकले आहेत. नोंदणी केलेल्या मात्र तूर विक्री करता न आलेल्या शेतकºयांंसाठी राज्य सरकारने अनुदान जाहीर केले आहे. मात्र प्रत्यक्षात हे अनुदान कधी मिळणार? याची शेतकºयांना प्रतीक्षा लागली आहे.हमीभाव केंद्रावर तूर, हरभरा विक्री केलेल्या शेतकºयांची थकलेली रक्कम अदा करावी, अशी मागणी शेतकरी सुकाणू समितीने ५ सप्टेंबर रोजी केली होती. त्यानंतर २७ व २८ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलनही केले होते. या समितीने मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून पैसे जमा करण्याची मागणी लावून धरली. शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याने सुकाणू समितीच्या आंदोलनाला यश आले आहे, अशी माहिती समितीचे लिंबाजी कचरे, बाळासाहेब आळणे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती