शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील कापसाचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:12 IST

जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे कृषी विभागाने सुरू केले असून, २१ डिसेंबरपर्यंत ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस अळीने बाधित असल्याने आणखी दीड लाख हेक्टरवरील पंचनामे शिल्लक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे कृषी विभागाने सुरू केले असून, २१ डिसेंबरपर्यंत ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस अळीने बाधित असल्याने आणखी दीड लाख हेक्टरवरील पंचनामे शिल्लक आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित केले होते़ प्रत्यक्षात शेतकºयांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाची १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवर लागवड केली़ प्रस्तावित क्षेत्रांपैकी ९१ टक्के कापसाची लागवड झाली़ विशेष म्हणजे, यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविली होती़ गतवर्षी सोयाबीन पिकाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नाही़ त्यामुळे यावर्षी पर्जन्यमान चांगले होणार असल्याच्या अंदाजावरुन शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली़ अपेक्षेप्रमाणे शेतकºयांचे कापूस पीक बहरले़दिवाळीपासून जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीला सुरुवात झाली़ मात्र जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पहिली वेचणी झाल्यानंतर कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला चढविला़ त्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले पीक बोंडअळीने हिरावून नेले़ कापूस उत्पादक अडचणीत सापडला़ बोंडअळी नियंत्रणात येण्याऐवजी वाढतच गेली़ परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनू लागली़ बोंडअळीच्या प्रादुर्भावासंदर्भात सर्वच तालुक्यातून कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या़ वाढत्या तक्रारी लक्षात घेता, कृषी विभागानेही या संकटाचे गांभीर्य ओळखले़ तक्रारींचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर सुरुवातीला शेतकºयांकडून रितसर तक्रार अर्ज भरून घेण्यात आले. आता तर थेट पंचनामेच करण्याचे आदेश कृषी विभागाला मिळाले आहे.कृषी विभागाने पंचनामे सुरू केले असून, २१ डिसेंबरपर्यंत १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रापैकी ३५ हजार १३१ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत़ परभणी तालुक्यात ६ हजार ४०४ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे तालुका कृषी कार्यालयाकडून तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी आदींनी पूर्ण केले आहे़ गंगाखेड १ हजार ४५०, पाथरी २ हजार २०५, जिंतूर १ हजार ४१०, पूर्णा ६ हजार ५४७, पालम १ हजार ५३२, सेलू १२ हजार ५६, सोनपेठ ७८५ आणि मानवत तालुक्यात २ हजार ७४२ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़शेतकºयांच्या नजरा मदतीकडे४कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांनी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे़ दरवर्षी पिकांवर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे़ यावर्षी पीक चांगले येऊनही त्यातून उत्पन्न हाती लागले नाही़ कापूस उत्पादकांनी यावर्षी लागवड केलेल्या पावणेदोन लाख हेक्टरवरील कापूस पीक बाधित झाले आहे़ बाधित शेतकरी सध्या शासनाकडून मिळणाºया मदतीची प्रतीक्षा करीत आहे़ शासनाने दोन दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये कोरडवाहूसाठी प्रती हेक्टरी ३० हजार रुपये व बागायतीसाठी प्रती हेक्टरी ३७ हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे़ मात्र या मदतीचे निकष अजून स्पष्ट झालेले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांच्या नजरा सध्या शासकीय मदतीकडे आहेत़सरसकट मदत द्याजिल्ह्यातील कापूस लागवडीचे सर्व क्षेत्र बोंंडअळीने बाधित झाले असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे़ त्यामुळे कापूस उत्पादक हतबल झाला आहे़ शासनाने कापूस उत्पादक शेतकºयांना मदत देताना कोणतेही निकष न ठेवता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी कापूस उत्पादकांतून होत आहे़९२ हजार ८२४ कापूस उत्पादकांना फटकाजिल्ह्यामध्ये ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत़ यातील ९२ हजार ८२४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीपात कापसाची लागवड केली़ मात्र कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांनी पिकावर केलेला अर्धा खर्च उत्पादनातून निघालेला नाही़ त्यामुळे या शेतकºयांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी कृषी विभागाच्या बाधीत झालेल्या क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत़ आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील ९२ हजार ८२४ शेतकºयांपैकी केवळ ३९ हजार २२३ शेतकºयांचेच पंचनामे पूर्ण झाले आहेत़ त्यामुळे जवळपास ५० हजार शेतकºयांचे पंचनामे येत्या काळात कृषी विभागाला पूर्ण करावयाचे आहेत़