शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

परभणी जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील कापसाचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:12 IST

जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे कृषी विभागाने सुरू केले असून, २१ डिसेंबरपर्यंत ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस अळीने बाधित असल्याने आणखी दीड लाख हेक्टरवरील पंचनामे शिल्लक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे कृषी विभागाने सुरू केले असून, २१ डिसेंबरपर्यंत ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस अळीने बाधित असल्याने आणखी दीड लाख हेक्टरवरील पंचनामे शिल्लक आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित केले होते़ प्रत्यक्षात शेतकºयांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाची १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवर लागवड केली़ प्रस्तावित क्षेत्रांपैकी ९१ टक्के कापसाची लागवड झाली़ विशेष म्हणजे, यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविली होती़ गतवर्षी सोयाबीन पिकाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नाही़ त्यामुळे यावर्षी पर्जन्यमान चांगले होणार असल्याच्या अंदाजावरुन शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली़ अपेक्षेप्रमाणे शेतकºयांचे कापूस पीक बहरले़दिवाळीपासून जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीला सुरुवात झाली़ मात्र जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पहिली वेचणी झाल्यानंतर कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला चढविला़ त्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले पीक बोंडअळीने हिरावून नेले़ कापूस उत्पादक अडचणीत सापडला़ बोंडअळी नियंत्रणात येण्याऐवजी वाढतच गेली़ परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनू लागली़ बोंडअळीच्या प्रादुर्भावासंदर्भात सर्वच तालुक्यातून कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या़ वाढत्या तक्रारी लक्षात घेता, कृषी विभागानेही या संकटाचे गांभीर्य ओळखले़ तक्रारींचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर सुरुवातीला शेतकºयांकडून रितसर तक्रार अर्ज भरून घेण्यात आले. आता तर थेट पंचनामेच करण्याचे आदेश कृषी विभागाला मिळाले आहे.कृषी विभागाने पंचनामे सुरू केले असून, २१ डिसेंबरपर्यंत १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रापैकी ३५ हजार १३१ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत़ परभणी तालुक्यात ६ हजार ४०४ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे तालुका कृषी कार्यालयाकडून तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी आदींनी पूर्ण केले आहे़ गंगाखेड १ हजार ४५०, पाथरी २ हजार २०५, जिंतूर १ हजार ४१०, पूर्णा ६ हजार ५४७, पालम १ हजार ५३२, सेलू १२ हजार ५६, सोनपेठ ७८५ आणि मानवत तालुक्यात २ हजार ७४२ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़शेतकºयांच्या नजरा मदतीकडे४कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांनी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे़ दरवर्षी पिकांवर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे़ यावर्षी पीक चांगले येऊनही त्यातून उत्पन्न हाती लागले नाही़ कापूस उत्पादकांनी यावर्षी लागवड केलेल्या पावणेदोन लाख हेक्टरवरील कापूस पीक बाधित झाले आहे़ बाधित शेतकरी सध्या शासनाकडून मिळणाºया मदतीची प्रतीक्षा करीत आहे़ शासनाने दोन दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये कोरडवाहूसाठी प्रती हेक्टरी ३० हजार रुपये व बागायतीसाठी प्रती हेक्टरी ३७ हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे़ मात्र या मदतीचे निकष अजून स्पष्ट झालेले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांच्या नजरा सध्या शासकीय मदतीकडे आहेत़सरसकट मदत द्याजिल्ह्यातील कापूस लागवडीचे सर्व क्षेत्र बोंंडअळीने बाधित झाले असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे़ त्यामुळे कापूस उत्पादक हतबल झाला आहे़ शासनाने कापूस उत्पादक शेतकºयांना मदत देताना कोणतेही निकष न ठेवता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी कापूस उत्पादकांतून होत आहे़९२ हजार ८२४ कापूस उत्पादकांना फटकाजिल्ह्यामध्ये ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत़ यातील ९२ हजार ८२४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीपात कापसाची लागवड केली़ मात्र कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांनी पिकावर केलेला अर्धा खर्च उत्पादनातून निघालेला नाही़ त्यामुळे या शेतकºयांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी कृषी विभागाच्या बाधीत झालेल्या क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत़ आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील ९२ हजार ८२४ शेतकºयांपैकी केवळ ३९ हजार २२३ शेतकºयांचेच पंचनामे पूर्ण झाले आहेत़ त्यामुळे जवळपास ५० हजार शेतकºयांचे पंचनामे येत्या काळात कृषी विभागाला पूर्ण करावयाचे आहेत़