शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

अपात्र शिक्षकांचे २० टक्के अनुदान पूर्ववत करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:21 IST

राज्याच्या शिक्षण विभागाने १२ व १५ फेब्रुवारी २०२१ अन्वये राज्यातील विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्त्वावर मान्यता दिलेल्या खासगी प्राथमिक, ...

राज्याच्या शिक्षण विभागाने १२ व १५ फेब्रुवारी २०२१ अन्वये राज्यातील विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्त्वावर मान्यता दिलेल्या खासगी प्राथमिक, माध्यमिक, शाळा व तुकड्यांना २० टक्के अनुदान मंजूर केले होते. २० टक्के अनुदान सुरू असलेल्या तथापि वाढीव २० टक्के अनुदानाकरिता कागदपत्रांअभावी ज्या शाळा अपात्र ठरल्या होत्या, अशा शाळांना पात्रतेचे प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. या प्रस्तावांवर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. तथापि, ज्या शाळांना २० टक्के सुरू आहे, पण वाढीव २० टक्के वेतन अनुदानासाठी शाळा अपात्र ठरविण्यात आल्या आहेत, अशा शाळांना पूर्वी सुरू असलेले २० टक्के अनुदान बंद करण्याचे शासनाचे आदेश नसतानाही हे अनुदान बंद करण्यात आले होते. ही बाब माजी आमदार विजय गव्हाणे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी २० टक्के तुटपुंज्या पगारावर काम करीत असतानासुद्धा नियमितपणे जर वेतन मिळत नसेल तर त्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती काय असेल? त्यांचा उदरनिर्वाह कसा चालत असेल? याचा विचार करा, अशी विनंती त्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी संबधित अधिकाऱ्यांना याबाबत आदेश देऊन त्या शिक्षकांचे अनुदान पुढील आदेशापर्यंत पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार २१ सप्टेंबर रोजी या विभागाचे कार्यासन अधिकारी प्रमोद कदम यांच्या स्वाक्षरीने आदेश काढला आहे. त्यामुळे या शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न सुटला आहे.