शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ३६ टक्के पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:30 IST

परभणी : यावर्षीच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपयांचे उद्दिष्ट ...

परभणी : यावर्षीच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र रब्बी हंगाम संपला तरीही आतापर्यंत बँकांनी केवळ ३५.७८ टक्केच पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटप करताना बँकांनी आखडता हात घेतल्याचेच दिसून येत आहे.

मागील दोन-तीन वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक संकटापासून त्रस्त झाला आहे. कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ या संकटांमुळे शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे शेतकरी बँकांकडे पीक कर्जाची मागणी करतो. यावर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने ४५१ कोटी ८७ लाख रुपयांचे उद्दिष्ट बँकांना दिले होते. मात्र बँकांनी खरीप हंगाम संपला, तरी आतापर्यंत केवळ २९ हजार ९८९ शेतकऱ्यांना १६१ कोटी ६७ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करीत केवळ ३५.७८ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे यामध्ये बँक व्यावसायिक बँकांनी ४ हजार २२८ शेतकऱ्यांना ३२ कोटी ७३ लाख रुपयांचे वाटप करीत १२.६७ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. खासगी बँकांनी १ हजार ११ शेतकऱ्यांना ९ कोटी ६० लाखांचे वाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ५ हजार १३९ शेतकऱ्यांना २५ कोटी ३७ लाख, तर जिल्हा मध्यवर्ती बँकांनी सर्वाधिक १९ हजार ६११ शेतकऱ्यांना ९३ कोटी ९८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत ८४.५० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. मात्र इतर बँकांनी यावर्षीच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन पीक कर्जाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पाऊले उचलावीत, अशी मागणी लाभार्थी शेतकऱ्यांमधून होत आहे.

खरीप हंगामातही ६६ टक्केच वाटप

२०२०-२१ या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने १६५५ कोटी २० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्याचे बँकांना उद्दिष्ट दिले होते. मात्र बँकांनी शेतकरी अडचणीत असतानाही पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष केले. १ लाख ५७ हजार ५० शेतकऱ्यांना १ हजार ९२ कोटी ४० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत ६६ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात बँकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठता आले नाही.