शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

जिल्ह्यात २७ टक्केच पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST

परभणी : खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २७ टक्के पीक कर्ज वाटप झाले असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ...

परभणी : खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २७ टक्के पीक कर्ज वाटप झाले असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने दरवर्षी जिल्हा प्रशासन बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून देते. मात्र, मागील तीन वर्षांपासून बँका उद्दिष्ट पूर्ण करीत नाहीत. या वर्षीदेखील अशीच परिस्थिती आहे.

या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत व्यापारी बँक आणि ग्रामीण बँकांना १२१३ कोटी २१ लाख रुपये कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ९ जुलैअखेर जिल्ह्यातील बँकांनी ५९ हजार ६०८ शेतकऱ्यांना ३२७ कोटी ७ लाख ७८ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत २७ टक्‍के कर्जवाटप झाले आहे. खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता भासते. जिल्ह्यात जवळपास पेरण्या पूर्ण झाल्या असून आता पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. असे असताना बँकांनी मात्र त्यांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण केले नाही. आणखी ७० टक्के कर्ज वाटप बँकांना करावयाचे असून, शेतकरी कर्जाची मागणी करीत असतानाही त्यात त्रुटी काढून कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ होत आहे. मागील वर्षी राज्य शासनाने कर्ज माफी योजना राबविली असून, यात अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने यंदा बँकांकडून पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी आशा होती. मात्र, सध्याची आकडेवारी पाहता या वर्षीदेखील बँक प्रशासनाकडून उद्दिष्टपूर्ती होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

जिल्हा बँकेने केले उद्दिष्ट पूर्ण

राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकेचे कर्जवाटप संथगतीने होत असले तरी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १४२ कोटी ८२ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. या बँकेने आतापर्यंत १५० कोटी ७२ लाख ८७ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत १०५ टक्के काम बँकेने पूर्ण केले आहे. उर्वरित बँका मात्र कर्जवाटपात मागे पडल्या आहेत.

शेतकऱ्यांना मिळणार

व्याज सवलतीचा लाभ

पीक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड करून कर्जाचे नूतनीकरण करावे. तसेच शासनाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील हट्टेकर आणि जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार खरीप हंगामात २०२१-२२ मध्ये ३ लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ३ टक्के व्याज परतावा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ३ रुपयांपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जासाठी केंद्र शासनाचे ३ टक्के व राज्यशासनाच्या योजनेंतर्गत ३ टक्के व्याज सवलत विचारात घेतल्यानंतर शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होऊ शकते. तेव्हा या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.