शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

डिसेंबरअखेरपर्यंत केवळ १२.६६ टक्के खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST

परभणी : जिल्हा वार्षिक योजनेत तरतूद केलेल्या विकासकामांवर डिसेंबर अखेरपर्यंत ३२ कोटी २२ लाख रुपयांचा खर्च झाला असून, ...

परभणी : जिल्हा वार्षिक योजनेत तरतूद केलेल्या विकासकामांवर डिसेंबर अखेरपर्यंत ३२ कोटी २२ लाख रुपयांचा खर्च झाला असून, एकूण तरतुदीच्या केवळ १२.६६ टक्के खर्चाचे प्रमाण आहे. त्यामुळे जिल्हा विकासाला कोरोनाच्या संकटाचा फटका बसल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील विकासकामांसाठी वार्षिक योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाते. त्यामुळे विकासकामे याच योजनेच्या माध्यमातून पूर्णत्वाला जातात. दरवर्षी विकासकामांचा आराखडा तयार करून त्यासाठी निधी मंजूर केला जातो. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी एप्रिल महिन्यात २६२ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार यासह इतर घटकांच्या विकासकामांचा समावेश करण्यात आला. मात्र, या आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर राज्यभरात कोरोनाचे संकट सुरू झाले. त्यामुळे राज्यातील विकासकामे ठप्प झाली. कोरोनाचा प्रतिबंध करण्यात आला असून, मागील १० महिने प्रशासकीय यंत्रणेची वाया गेली. राज्य शासनाने विकासकामांसाठीचा निधीही रोखून धरला होता. डिसेंबर महिन्यातच हा निधी जिल्ह्यांना प्राप्त झाला आहे. परभणी जिल्ह्यालाही वार्षिक योजनेंतर्गत १०० टक्के निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी ३३ कोटी २२ लाख ८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण घटकाला २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, डिसेंबरअखेर २९ कोटी ८४ लाख ८० हजार रुपये (१४.९२ टक्के) खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत ६० कोटी २२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ३ कोटी १३ लाख २८ हजार रुपये खर्च करण्यात आले, तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी २ कोटी १६ लाख ५६ हजार रुपये तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी २४ लाख रुपयांचा खर्च आतापर्यंत झाला आहे. एकूण तरतुदीच्या १२.६६ टक्के खर्च आतापर्यंत झाला आहे.

दोन महिन्यांत निधी खर्चाचे आव्हान

यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे उशिराने निधी प्राप्त झाला. त्यामुळे विकासकामे करण्यासाठी प्रशासनाकडे कमी कालावधी शिल्लक असून, या काळात वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त झालेला संपूर्ण निधी योजनांवर खर्च करण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे मार्चअखेर हा निधी खर्च झाला नाही तर तो शासनाला परत करावा लागतो. त्यामुळे मार्चअखेर १०० टक्के निधी खर्च होतो का, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन १०० टक्के निधी खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत.