शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या दुरुस्तीसाठी साडेसहाशे कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा खराब झाला असल्याने पाण्याची वहनक्षमता कमी झाली आहे. परिणामी परभणी मतदारसंघातील ५० टक्के गावे मागील ...

जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा खराब झाला असल्याने पाण्याची वहनक्षमता कमी झाली आहे. परिणामी परभणी मतदारसंघातील ५० टक्के गावे मागील अनेक वर्षांपासून कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. या कालव्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी आ. डॉ. राहुल पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने ८ जून रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. त्यावर जयंत पाटील यांनी आ. डॉ. पाटील यांना वरीलप्रमाणे आश्वासन दिले आहे. या शिष्टमंडळात दिनेश बोबडे, रवींद्र पतंगे, बाजार समितीचे संचालक तानाजी भोसले, प्रभाकर जयस्वाल, अनिल डहाळे, बाळासाहेब रसाळ, वसीक इनामदार आदींची उपस्थिती होती.

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यामुळे जिल्ह्यातील ९७ हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येते. कालवा नादुरुस्त असल्याने वहन क्षमता कमी झाली आहे. या कालव्याची वहन क्षमता २१०० क्युसेस असताना केवळ ९०० ते ११०० क्षमतेने पाणी वाहते. त्यामुळे परभणी तालुक्यातील ५० टक्के गावे कालव्याच्या सिंचनापासून वंचित राहतात. या शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. परिणामी नुकसान होते. ही बाब आ. डॉ. राहुल पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली, तसेच कालव्याच्या दुरुस्तीसाठी विशेष बैठक घेण्याची मागणीही आ. डॉ. राहुल पाटील यांनी यावेळी केली.