शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

कालव्याच्या दुरुस्तीसाठी साडेसहाशे कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा खराब झाला असल्याने पाण्याची वहनक्षमता कमी झाली आहे. परिणामी परभणी मतदारसंघातील ५० टक्के गावे मागील ...

जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा खराब झाला असल्याने पाण्याची वहनक्षमता कमी झाली आहे. परिणामी परभणी मतदारसंघातील ५० टक्के गावे मागील अनेक वर्षांपासून कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. या कालव्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी आ. डॉ. राहुल पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने ८ जून रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. त्यावर जयंत पाटील यांनी आ. डॉ. पाटील यांना वरीलप्रमाणे आश्वासन दिले आहे. या शिष्टमंडळात दिनेश बोबडे, रवींद्र पतंगे, बाजार समितीचे संचालक तानाजी भोसले, प्रभाकर जयस्वाल, अनिल डहाळे, बाळासाहेब रसाळ, वसीक इनामदार आदींची उपस्थिती होती.

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यामुळे जिल्ह्यातील ९७ हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येते. कालवा नादुरुस्त असल्याने वहन क्षमता कमी झाली आहे. या कालव्याची वहन क्षमता २१०० क्युसेस असताना केवळ ९०० ते ११०० क्षमतेने पाणी वाहते. त्यामुळे परभणी तालुक्यातील ५० टक्के गावे कालव्याच्या सिंचनापासून वंचित राहतात. या शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. परिणामी नुकसान होते. ही बाब आ. डॉ. राहुल पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली, तसेच कालव्याच्या दुरुस्तीसाठी विशेष बैठक घेण्याची मागणीही आ. डॉ. राहुल पाटील यांनी यावेळी केली.