शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बांधकाम साहित्याचा वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST

मोंढ्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था परभणी : येथील मोंढा बाजारपेठेतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना कसरत ...

मोंढ्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था

परभणी : येथील मोंढा बाजारपेठेतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना कसरत करीत वाहने आडत दुकानापर्यंत न्यावी लागत आहेत. या भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी बाजार समिती प्रशासनावर आहे. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता, दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे.

मास्कच्या वापरास नागरिकांकडून टाळाटाळ

परभणी : शहरातील बाजारपेठ भागासह इतर ठिकाणी अनेक नागरिक विना मास्क फिरत आहेत. या नागरिकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने हा प्रकार बळावला आहे. त्याच प्रमाणे रस्त्यावर थुंकणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणे हे प्रकारही वाढले आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यात परत एकदा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता भीती निर्माण झाली आहे.

शहरात वाढले धुळीचे प्रमाण

परभणी : शहरात धूळ वाढली असून, नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. अनलॉकच्या प्रक्रियेनंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. खड्ड्यमय रस्त्यांमुळे धूळ वातावरणात मिसळत आहे. जड वाहनांच्या पाठीमागील बाजूने तर धुळीचे लोट उडतात. त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यांची नियमित स्वच्छता झाली तर हा त्रास कमी होऊ शकतो.

कारवाई थांबताच गुटखा विक्री सुरू

परभणी : दोन आठवड्यापूर्वी पोलिसांनी अवैध गुटखा विक्रीविरुद्ध कारवाई सुरू केली होती. छोट्या व्यावसायिकांवरही पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली होती. परिणामी दोन आठवडे चोरुन-लपून गुटख्याची विक्री केली जात होती. मात्र पोलिसांची ही मोहीम थांबल्यानंतर आता पानटपऱ्यांवरुन सर्रास गुटखा विक्री केली जात आहे.

मजुरांना मिळेनात रोहयोची कामे

परभणी : रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या वाढविण्यात आली नसल्याने अनेक मजुरांना कामासाठी स्थलांतर करावे लागत आहे. जिल्ह्यात साधारणत: १ लाख मजुरांनी रोजगार हमी योजनेकडे नोंदणी केली आहे. या मजुरांना जॉब कार्ड देण्यात आले आहे. मागेल त्याला काम देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. मात्र ८ महिन्यांपासून रोहयोची कामे मर्यादित स्वरुपाची आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या सर्वच मजुरांना काम उपलब्ध होत नाही. शासकीय यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता लागणारी कामे रोहयोच्या माध्यमातून सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.