शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

नायलॉनचा मांजा दुकानांतून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:18 IST

परभणी : शहरासह जिल्ह्यात यावर्षी अद्यापही पतंग उडविण्यास प्रारंभ झाला नसून, विक्रेत्यांकडेही नायलॉनचा मांजा उपलब्ध नसल्याची माहिती शनिवारी ...

परभणी : शहरासह जिल्ह्यात यावर्षी अद्यापही पतंग उडविण्यास प्रारंभ झाला नसून, विक्रेत्यांकडेही नायलॉनचा मांजा उपलब्ध नसल्याची माहिती शनिवारी केलेल्या पाहणीत दिसून आली.

मकरसंक्रांतीचा सण म्हटला की पतंग उडविण्यास सुरुवात होते. पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे अपघात होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने नायलॉनच्या दोऱ्यापासून बनविलेला मांजा विक्री करण्यास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात नायलॉनचा मांजा उपलब्ध होतो का, याची पाहणी केली तेव्हा पतंग विक्रीची मुख्य दुकाने बंद असल्याचे दिसून आले. शहरातील कडबी मंडई येथील एकाच दुकानावर पतंग विक्रीसाठी उपलब्ध उपलब्ध होते. या ठिकाणी नायलॉनचा मांजा आहे का, अशी विचारणा केली असता हा मांजा आमच्याकडे विक्री होत नसल्याचे विक्रेत्याने सांगितले. साधा दोरा आणि पतंग विक्रीसाठी ठेवले आहेत; परंतु त्यासही ग्राहक मिळत नाहीत. अद्याप शहरात हा मोसम सुरू झाला नसल्याचे विक्रेत्याने सांगितले.

सध्या पतंगबाजी सुरू नसली तरी लॉकडाऊन काळात मात्र पतंग आणि नायलॉनच्या मांजाला जिल्ह्यात मोठी मागणी होती. चार महिन्यांच्या कालावधीत परभणी शहरासह जिल्हाभरात जागोजागी पतंग उडविण्यात आले. या काळात नायलॉनचा मांजा शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. पोलीस प्रशासनाने नायलॉनचा मांजा विक्री करण्यास बंदी असल्याचे जाहीर केले; परंतु कारवाई मात्र कुठेही झाली नाही.

परभणीत सायकलस्वार जखमी

लॉकडाऊनच्या ४ महिन्यांच्या काळामध्ये पतंगाचा मांजा अडकून एक सायकलस्वार जखमी झाल्याची घटना शहरात घडलेली आहे. त्याचप्रमाणे पतंग उडवित असताना एका विद्यार्थ्याचा गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची घटनाही शहरात नोंद झाली आहे. सेलू, पूर्णा तालुक्यातही पतंगाच्या मांजामुळे जखमी होण्याची घटना घडलेल्या आहेत.

७० ते ८० पक्ष्यांचा मृत्यू

पतंग उडविण्यासाठी नायलॉनचा मांजा वापरल्याने त्याचा सर्वाधिक धोका पक्ष्यांना आहे. लॉकडाऊनच्या चार महिन्यांच्या कालावधीत ७० ते ८० पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पक्षीमित्र अनिल उरटवाड यांनी दिली. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यामध्ये या काळात चार पक्षी जखमी झाले होते. त्यांना आपण जीवदान दिल्याचेही उरटवाड यांनी सांगितले.