शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

गव्हासाठी पोषक ठरले वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:16 IST

पर्यायी जागेचा शोध घेण्याची मागणी परभणी : येथील नानलपेठ भागात भरत असलेल्या शनिवार बाजारासाठी पर्यायी जागा देण्याचा ठराव महानगरपालिकेच्या ...

पर्यायी जागेचा शोध घेण्याची मागणी

परभणी : येथील नानलपेठ भागात भरत असलेल्या शनिवार बाजारासाठी पर्यायी जागा देण्याचा ठराव महानगरपालिकेच्या सभागृहात मंजूर झाला आहे. मात्र त्यानंतर या प्रकरणात कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. शनिवार बाजार परिसरात प्रत्येक शनिवारी बाजार भरत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेता, हा बाजार इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.

प्रवाशी रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरळीत झाले असून, रेल्वे प्रशासनानेही प्रवाशी रेल्वे गाड्या सुरू करुन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. सध्या केवळ विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्याअंतर्गत अथवा शेजारी जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तेव्हा प्रवाशी रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून जोर धरत आहे.

ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मिळेना निधी

परभणी : कोरोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांची कामे ठप्प आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे ठप्प आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.

प्लास्टिक वापरावर लागेना निर्बंध

परभणी : जिल्ह्यात प्लास्टिकच्या वापरावर अद्यापही पूर्णत: निर्बंध लागले नाहीत. विशेषत: ग्रामीण भागात प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तूंचा सर्रास वापर सुरू आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र त्याची ठोस अंमलबजावणी होत नाही. कारवाई होत नसल्याने बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंचा आणि पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे.

शहरात अस्थायी अतिक्रमण वाढली

परभणी : शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला अस्थायी अतिक्रमणे वाढली आहेत. तात्पुरत्या स्वरुपातील ही अतिक्रमणे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. स्टेशन रोड, डॉक्टरलेन यासह बाजारपेठ भागात ही अतिक्रमणे वसवली जात आहेत. मनपा प्रशासनाने वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवावित, अशी मागणी होत आहे.