शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

न.पा., मनपाला साडेचार कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यात नियोजन समितीने नगरपालिकांनाच विकासकामांसाठी सर्वाधिक ४ कोटी ५८ लाख ११ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...

परभणी : जिल्ह्यात नियोजन समितीने नगरपालिकांनाच विकासकामांसाठी सर्वाधिक ४ कोटी ५८ लाख ११ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागात विकासकामे हाती घेतली जातात. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामे केली जातात. यावर्षी जिल्हा नियोजन समितीने २०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. २०२० च्या एप्रिल महिन्यात विकासकामांचे नियोजन करण्यात आले. मात्र, त्यानंतर कोरोनाने सर्वांनाच वेठीस धरले. आराखड्यातील मंजूर तरतूदही डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्याला प्राप्त झाली नाही. ही सर्व परिस्थिती पाहता विकासकामे ठप्प होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज्य शासनाने विकासकामे आणि रोजगाराला गती देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीचा १०० टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जिल्ह्यात जानेवारी महिन्यात तरतुदीप्रमाणे निधी उपलब्ध झाला. मात्र, त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे निधी वितरण ठप्प होते. या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर नियोजन समितीने निधी वितरणाला सुरुवात केली असून, वितरित केलेल्या निधीपैकी सर्वच्या सर्व निधी खर्च झाल्याची माहिती २५ जानेवारी रोजी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नियोजन समितीच्या बैठकीत देण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील आठही नगरपालिकांना सर्वाधिक ४ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. शहरी भागात नगरोत्थान आणि दलितोत्तर योजनेंतर्गत रस्ते, नाली व इतर विकासकामे या निधीतून अपेक्षित आहेत. प्रशासनाच्या बैठकीनुसार हा निधीही खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोविडवर १९ कोटींचा खर्च

जिल्हा नियोजन समितीने तरतूद केलेल्या एकूण निधीपैकी २५ टक्के निधी कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्याला यापूर्वीच २० कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी १९ कोटी ४५ लाख ५३ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माध्यमातून हा निधी वापरण्यात आला. याच योजनेत शहरातील आयटीआय इमारत परिसरात कोविडसाठी ६३ लाख ७ हजार रुपयांचा खर्च झाला आहे.

कोणाला मिळाला किती निधी

नियोजन समितीने आतापर्यंत ३३ कोटी रुपये वितरित केले आहेत. त्यामध्ये पशुसंवर्धन विभागाला १७ लाख ८२ हजार, दुग्ध व्यवसायासाठी १७ लाख ४४ हजार, वनविभागासाठी ५१ लाख, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये विकासकामे करण्यासाठी जनसुविधा योजनेंतर्गत २ कोटी १ लाख, लघु पाटबंधारे विभागाला ९७ लाख, जि.प.च्या सामान्य शिक्षण विभागाला २ कोटी ९२ लाख ७० हजार, तंत्रनिकेतनसाठी १६ लाख ६० हजार, रेशीम विकास यंत्रणेंतर्गत २० लाख, रस्त्यांच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला ८८ लाख ५० हजार, इमारत बांधकामासाठी ८१ लाख ४१ हजार आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील विकासकामांसाठी २ कोटी ८४ लाख ७८ हजार रुपये वितरित झाले आहेत.