शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

आता सरपंच निवडीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाले असून, आता ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष सरपंच निवडीकडे लक्ष लागले आहे. ...

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाले असून, आता ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष सरपंच निवडीकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले. गावपातळीवर या निवडणुकांना महत्व आहे. अनेक नवीन राजकारणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकारणात प्रवेश करतात. मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना थेट निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे या निवडणुकीचे महत्व अधिकच वाढले आहे. मागील आठवड्यात ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. यावर्षी सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आले होते. परंतु, राज्य शासनाने स्वतंत्र निर्णय घेत निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार २५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले. नवीन आरक्षणानुसार काही ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या इच्छुक उमेदवारांची अडचण झाली तर काही ठिकाणी महिलांसाठी सरपंचपद सुटल्याने इच्छुकांना पर्याय निवडावा लागत आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष सरपंचपदाच्या निवडीचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात सरपंचपदासाठी समीकरणे जुळविली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार, याचीच चर्चा अधिक रंगत आहे. निवडणूक विभागातून सरपंच निवडीचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर केला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष निवड प्रक्रिया घेतली जाते. अद्याप हा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे सरपंचपदाच्या निवडीकडे ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.

राजकीय पक्षांचाही सहभाग

ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात राहाव्यात, यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जातात. त्यातूनच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय पक्षांमधून दावे-प्रतिदावे सुरु झाले होते. आपल्या ताब्यात किती ग्रामपंचायती आल्या, यावरून ग्रामीण भागात पक्षांची ताकद ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरपंचपदी कोणाची वर्णी लागते, यावरही ती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहे, हे ठरणार असल्याने या निवडीकडे राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आरक्षणामुळे अनेकांची गोची

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांची गोची झाली आहे. काही पॅनलने सर्वाधिक जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी त्या पॅनलकडे सरपंचपदाचा उमेदवार नसल्याने नाईलाजाने ग्रामपंचायत विरोधी गटाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरपंचपदाचा उमेदवारच निवडणुकीतून पराभूत झाल्याने पॅनलप्रमुखांची अडचण झाली आहे. त्यामुळे सध्या गावागावात सरपंचपदासाठी तयारी सुरू झाली असून, या निवडीकडे लक्ष लागले आहे.