शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आता सरपंच निवडीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाले असून, आता ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष सरपंच निवडीकडे लक्ष लागले आहे. ...

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाले असून, आता ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष सरपंच निवडीकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले. गावपातळीवर या निवडणुकांना महत्व आहे. अनेक नवीन राजकारणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकारणात प्रवेश करतात. मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना थेट निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे या निवडणुकीचे महत्व अधिकच वाढले आहे. मागील आठवड्यात ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. यावर्षी सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आले होते. परंतु, राज्य शासनाने स्वतंत्र निर्णय घेत निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार २५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले. नवीन आरक्षणानुसार काही ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या इच्छुक उमेदवारांची अडचण झाली तर काही ठिकाणी महिलांसाठी सरपंचपद सुटल्याने इच्छुकांना पर्याय निवडावा लागत आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष सरपंचपदाच्या निवडीचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात सरपंचपदासाठी समीकरणे जुळविली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार, याचीच चर्चा अधिक रंगत आहे. निवडणूक विभागातून सरपंच निवडीचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर केला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष निवड प्रक्रिया घेतली जाते. अद्याप हा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे सरपंचपदाच्या निवडीकडे ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.

राजकीय पक्षांचाही सहभाग

ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात राहाव्यात, यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जातात. त्यातूनच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय पक्षांमधून दावे-प्रतिदावे सुरु झाले होते. आपल्या ताब्यात किती ग्रामपंचायती आल्या, यावरून ग्रामीण भागात पक्षांची ताकद ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरपंचपदी कोणाची वर्णी लागते, यावरही ती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहे, हे ठरणार असल्याने या निवडीकडे राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आरक्षणामुळे अनेकांची गोची

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांची गोची झाली आहे. काही पॅनलने सर्वाधिक जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी त्या पॅनलकडे सरपंचपदाचा उमेदवार नसल्याने नाईलाजाने ग्रामपंचायत विरोधी गटाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरपंचपदाचा उमेदवारच निवडणुकीतून पराभूत झाल्याने पॅनलप्रमुखांची अडचण झाली आहे. त्यामुळे सध्या गावागावात सरपंचपदासाठी तयारी सुरू झाली असून, या निवडीकडे लक्ष लागले आहे.