शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

आता सरपंच निवडीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाले असून, आता ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष सरपंच निवडीकडे लक्ष लागले आहे. ...

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाले असून, आता ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष सरपंच निवडीकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले. गावपातळीवर या निवडणुकांना महत्व आहे. अनेक नवीन राजकारणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकारणात प्रवेश करतात. मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना थेट निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे या निवडणुकीचे महत्व अधिकच वाढले आहे. मागील आठवड्यात ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. यावर्षी सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आले होते. परंतु, राज्य शासनाने स्वतंत्र निर्णय घेत निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार २५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले. नवीन आरक्षणानुसार काही ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या इच्छुक उमेदवारांची अडचण झाली तर काही ठिकाणी महिलांसाठी सरपंचपद सुटल्याने इच्छुकांना पर्याय निवडावा लागत आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष सरपंचपदाच्या निवडीचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात सरपंचपदासाठी समीकरणे जुळविली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार, याचीच चर्चा अधिक रंगत आहे. निवडणूक विभागातून सरपंच निवडीचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर केला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष निवड प्रक्रिया घेतली जाते. अद्याप हा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे सरपंचपदाच्या निवडीकडे ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.

राजकीय पक्षांचाही सहभाग

ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात राहाव्यात, यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जातात. त्यातूनच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय पक्षांमधून दावे-प्रतिदावे सुरु झाले होते. आपल्या ताब्यात किती ग्रामपंचायती आल्या, यावरून ग्रामीण भागात पक्षांची ताकद ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरपंचपदी कोणाची वर्णी लागते, यावरही ती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहे, हे ठरणार असल्याने या निवडीकडे राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आरक्षणामुळे अनेकांची गोची

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांची गोची झाली आहे. काही पॅनलने सर्वाधिक जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी त्या पॅनलकडे सरपंचपदाचा उमेदवार नसल्याने नाईलाजाने ग्रामपंचायत विरोधी गटाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरपंचपदाचा उमेदवारच निवडणुकीतून पराभूत झाल्याने पॅनलप्रमुखांची अडचण झाली आहे. त्यामुळे सध्या गावागावात सरपंचपदासाठी तयारी सुरू झाली असून, या निवडीकडे लक्ष लागले आहे.