शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

परभणी तालुक्याला पाण्याचे नो टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST

मागील काही वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने धरण, तलाव, नदी, नाले, ओढे या जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाण्याची साठवण ...

मागील काही वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने धरण, तलाव, नदी, नाले, ओढे या जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाण्याची साठवण होत नव्हती. परिणामी फेब्रुवारी महिन्यापासूनच तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा जाणू लागत होत्या. त्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कोट्यावधी रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार तयार करण्यात येत होता. परंतु, पाणीटंचाई मात्र दूर होत नव्हती. २०२०-२१ मध्ये तालुक्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यावर्षी तर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्‍यातील जलस्रोतांचा मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे तालुक्यातील १३१ गावांपैकी केवळ ५ गावात सद्यस्थितीत पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यासाठी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने १० लाख रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर परभणी तालुक्यातील मोहपुरी, आळंद, तांबसवाडी, सिरसी बु व ठोळा या गावात विहीर, बोअर अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

जायकवाडी,येलदरी व निम्न दुधनाचा आधार

यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जायकवाडी,येलदरी धारण, निम्न दुधना प्रकल्प तुडुंब भरले. सध्या या धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्याचा परभणी तालुक्यातील शेत सिंचनात सह पाणीटंचाई दूर होण्यासही मदत होत आहे .त्यामुळे हे तिन्ही धरण तालुक्यासाठी आधार मिळत असल्याचे दिसून येत आहे.