शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

परभणी तालुक्याला पाण्याचे नो टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST

मागील काही वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने धरण, तलाव, नदी, नाले, ओढे या जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाण्याची साठवण होत ...

मागील काही वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने धरण, तलाव, नदी, नाले, ओढे या जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाण्याची साठवण होत नव्हती. परिणामी फेब्रुवारी महिन्यापासूनच तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा जाणू लागत होत्या. त्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कोट्यावधी रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार तयार करण्यात येत होता. परंतु, पाणीटंचाई मात्र दूर होत नव्हती. २०२०-२०२१ मध्ये तालुक्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यावर्षी तर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्‍यातील जलस्रोतांचा मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे तालुक्यातील १३१ गावांपैकी केवळ ५ गावात सद्यस्थितीत पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यासाठी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने १० लाख रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर परभणी तालुक्यातील मोहपुरी, आळंद, तांबसवाडी, सिरसी बु व ठोळा या गावात विहीर, बोअर अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

जायकवाडी,येलदरी व निम्न दुधनाचा आधार

यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जायकवाडी,येलदरी धारण, निम्न दुधना प्रकल्प तुडुंब भरले. सध्या या धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्याचा परभणी तालुक्यातील शेत सिंचनासह पाणीटंचाई दूर होण्यासही मदत होत आहे .त्यामुळे हे तिन्ही धरण तालुक्यासाठी आधार मिळत असल्याचे दिसून येत आहे.