शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती प्रशासक मंडळासाठी आता नवे निकष; समावेशासाठी फिल्डिंग लावणाऱ्यांचा हिरमोड

By मारोती जुंबडे | Updated: August 25, 2022 17:11 IST

राज्यात सत्तांतर होऊन भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यानंतर थेट शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिला.

मानवत (परभणी) : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यावर प्रशासक मंडळात वर्णी लावण्यासाठी भाजप आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मात्र सहकार व पणन विभागाने २३ ऑगस्ट रोजी पणन संचालकांना लेखी पत्र काढून पत्रामध्ये दिलेल्या निकषांच्या अंमलबजावणी करूनच प्रशासक मंडळातील सदस्यांची निवड करावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळात वर्णी लागावी, यासाठी फिल्डिंग लावणाऱ्या भाजप आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील मुदतवाढ मिळालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय सहकार प्राधिकरणाने गतवर्षी घेतला होता. मात्र उच्च न्यायालयाने विविध कार्यकारी सेवा संस्थाच्या निवडणुकीनंतर बाजार समितीच्या निवडणुका घेणे उचित होईल असा निर्णय दिल्याने सहकारी निवडणूक प्राधिकरणाने २१ जानेवारी रोजी स्वतंत्र आदेश काढून बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीची प्रक्रिया रद्द केली करुन चौथ्यांदा संचालक मंडळाला मुदतवाढ दिली होती. राज्यात सत्तांतर होऊन भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यानंतर थेट शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिला.

शेतकऱ्यांना मतदान अधिकाराचा निर्णय झाल्याने निवडणुकीसाठी वेळ लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून राज्यातील बाजार समितीवर प्रशासक मंडळ नेमण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये मानवत बाजार समितीचा ही समावेश आहे. यामुळे प्रशासक मंडळात सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी माजी आमदार मोहन फड यांच्यामार्फत जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने यासाठी २३ ऑगस्ट रोजी पणन संचालकांना लेखी पत्र देऊन कोणते निकष असावेत याची माहिती दिली आहे. या जाचक निकषामुळे इच्छुक असलेल्या भाजप आणि शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांना प्रशासक मंडळापासून दूर राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.

मानवतचे प्रकरण न्यायप्रविष्टमानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे नवीन प्रशासक मंडळ नियुक्त करताना राज्य सरकारला अडचण येणार आहे. यामुळे विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळते की नवीन प्रशासक मंडळ नियुक्त होते. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मोहन फड झाले सक्रियबाजार समितीवर प्रशासक मंडळ आणण्यासाठी माजी आमदार मोहन फड यांच्या मुंबई वाऱ्या सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रparabhaniपरभणी