शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

बाजार समिती प्रशासक मंडळासाठी आता नवे निकष; समावेशासाठी फिल्डिंग लावणाऱ्यांचा हिरमोड

By मारोती जुंबडे | Updated: August 25, 2022 17:11 IST

राज्यात सत्तांतर होऊन भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यानंतर थेट शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिला.

मानवत (परभणी) : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यावर प्रशासक मंडळात वर्णी लावण्यासाठी भाजप आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मात्र सहकार व पणन विभागाने २३ ऑगस्ट रोजी पणन संचालकांना लेखी पत्र काढून पत्रामध्ये दिलेल्या निकषांच्या अंमलबजावणी करूनच प्रशासक मंडळातील सदस्यांची निवड करावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळात वर्णी लागावी, यासाठी फिल्डिंग लावणाऱ्या भाजप आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील मुदतवाढ मिळालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय सहकार प्राधिकरणाने गतवर्षी घेतला होता. मात्र उच्च न्यायालयाने विविध कार्यकारी सेवा संस्थाच्या निवडणुकीनंतर बाजार समितीच्या निवडणुका घेणे उचित होईल असा निर्णय दिल्याने सहकारी निवडणूक प्राधिकरणाने २१ जानेवारी रोजी स्वतंत्र आदेश काढून बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीची प्रक्रिया रद्द केली करुन चौथ्यांदा संचालक मंडळाला मुदतवाढ दिली होती. राज्यात सत्तांतर होऊन भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यानंतर थेट शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिला.

शेतकऱ्यांना मतदान अधिकाराचा निर्णय झाल्याने निवडणुकीसाठी वेळ लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून राज्यातील बाजार समितीवर प्रशासक मंडळ नेमण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये मानवत बाजार समितीचा ही समावेश आहे. यामुळे प्रशासक मंडळात सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी माजी आमदार मोहन फड यांच्यामार्फत जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने यासाठी २३ ऑगस्ट रोजी पणन संचालकांना लेखी पत्र देऊन कोणते निकष असावेत याची माहिती दिली आहे. या जाचक निकषामुळे इच्छुक असलेल्या भाजप आणि शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांना प्रशासक मंडळापासून दूर राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.

मानवतचे प्रकरण न्यायप्रविष्टमानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे नवीन प्रशासक मंडळ नियुक्त करताना राज्य सरकारला अडचण येणार आहे. यामुळे विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळते की नवीन प्रशासक मंडळ नियुक्त होते. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मोहन फड झाले सक्रियबाजार समितीवर प्रशासक मंडळ आणण्यासाठी माजी आमदार मोहन फड यांच्या मुंबई वाऱ्या सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रparabhaniपरभणी