शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

जमीन जिवंत ठेवून उत्पादन वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST

परभणी : जमीन जिवंत ठेवून त्यातील शेतमालाचे उत्पादन वाढविण्याची गरज निर्माण झाली असून हे केवळ सेंद्रिय शेतीतून शक्य आहे. ...

परभणी : जमीन जिवंत ठेवून त्यातील शेतमालाचे उत्पादन वाढविण्याची गरज निर्माण झाली असून हे केवळ सेंद्रिय शेतीतून शक्य आहे. तेव्हा सेंद्रिय शेती उत्पादने वाढवावीत, असे आवाहन गाझियाबाद येथील एनसीएफचे संचालक गगनेश शर्मा यांनी केले.

नागपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, परभणीच्या वनामकृवितील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, हैदराबाद येथील शाश्वत शेती केंद्र आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने १५ ते २१ मार्च या काळात ऑनलाईन सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. शर्मा बोलत होते.

कुलगुरू डॉ.अशोक ढवण, डॉ.गगनेश शर्मा आणि संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात अडीचशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गगनेश शर्मा म्हणाले, यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सेंद्रिय शेती करणे आवश्यक आहे. शेतकरी मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून शेती करणे आवश्यक आहे. शेती जिवंत ठेवून उत्पादन घेण्याची आवश्यकता निर्माण झाली असून, हे काम फक्त जैविक शेतीतून साध्य करता येईल, असे शर्मा म्हणाले.

जबलपूर येथील प्रादेशिक संचालक डॉ. राजपूत म्हणाले, सेंद्रिय शेतीमध्ये स्थानिक बायो डायजेस्टर तण आणि रोगजनकांच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे. कोविडच्या परिस्थितीमध्ये सेंद्रिय उत्पादन विक्रीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली असून, आशिया खंडात भारताने पहिला क्रमांक मिळविला आहे. तर जगात भारत आठव्या स्थानावर आहे. वनामकृविचे सहयोगी संचालक डॉ. के. एस. बेग म्हणाले, जैविक शेतीमुळे जमिनीची उपजाऊ क्षमता वाढते. भारतात जैविक शेतीचे क्षेत्र असणाऱ्या भागात जैविक शेती २० ते ३० टक्‍क्‍यांनी वाढणे गरजेचे आहे. सेंद्रिय मालास योग्य भाव, बाजारपेठ उपलब्ध होण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी आयोजक डॉ. वाचस्पती पांडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. डॉ. प्रवीण कापसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जी. व्ही. रामानजनेयुलू यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिजित कदम, डॉ. सुनील जावळे, श्रीधर पतंगे, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी प्रयत्न केले.

परप्रांतीय शेतकऱ्यांचा सहभाग

या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू, तेलंगना, आंध्रप्रदेश येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘सेंद्रिय शेतीमध्ये पेरणी, वाण, लागवड पद्धती, कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण व सेंद्रिय मालाची प्रक्रिया आदी विषयावर नामांकित संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था, आयसीएआर संस्थांमधील तज्ज्ञांना निमंत्रित करून प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.