शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

वाचन संस्कृती जोपासण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:17 IST

परभणी : महानुभव पंथ आणि वारकरी संप्रदायाला बांधणारा सेतू म्हणजे महाचिंतनी आहे. आपण वाचन संस्कृतीपासून दूर जात असून, ग्रंथ ...

परभणी : महानुभव पंथ आणि वारकरी संप्रदायाला बांधणारा सेतू म्हणजे महाचिंतनी आहे. आपण वाचन संस्कृतीपासून दूर जात असून, ग्रंथ हे बुद्धीला खाद्य देणारे असतात. केवळ आस्तिकच नव्हे, तर नास्तिकालाही वाचनाची आवश्यकता आहे. तेव्हा वाचनाला मर्यादा न ठेवता वाचन संस्कृती जोपासावी, असे प्रतिपादन महानुभाव पंथाचे बा.भो. शास्त्री यांनी केले. येथील खानापूर परिसरातील श्रीकृष्ण दत्त मंदिरात आयोजित पुस्तक प्रकाशन प्रसंगी शास्त्री बोलत होते. परभणी येथे २०१९ मध्ये झालेल्या महाचिंतनीमधील सर्व विचारवंतांचे विचार शब्दबद्ध करून चिंतनीतले चिंतन या ग्रंथाची निर्मिती डॉ.गणेश मारेवाड यांनी केली आहे. या ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी बा.भो. शास्त्री बोलत होते. यावेळी कवी प्रा.इंद्रजीत भालेराव, वैद्यराज बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.इंद्रजीत भालेराव म्हणाले, डॉ.गणेश मारेवाड यांनी परिश्रमाने पुस्तकाचे संपादन केले आहे. निष्ठेने आणि प्रेमाने केलेली पुस्तकाची मांडणी यातून सिद्ध झालेला हा ग्रंथ देखणा झाला आहे. महाचिंतनीतील चिंतन या पुस्तकातील विचार वाचकांसाठी प्रेरणादायक ठरतील, असे भालेराव म्हणाले. बाभुळगावकर बाबा यांनी प्रास्ताविक केले. प्रा.सखाराम कदम यांनी सूत्रसंचालन केले. विश्वनाथ बाबा कोठी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी राजू शिंदे, मुकुंद शिंदे, साहेबराव जाधव, प्रा.सुधाकर फाजगे, नारायण शिंदे आदींनी प्रयत्न केले.