शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परभणी येथे राष्ट्रीय लोक अदालत: सामोपचाराने वाद मिटविण्यासाठीच लोकन्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:26 IST

न्यायालयात दाखल झालेल्या खटल्याचा निकाल कोणाच्या तरी एकाच्या बाजुने लागतो. त्यामुळे उगीचच मनामध्ये द्वेष बाळगण्यापेक्षा लोक न्यायालयाच्या माध्यमातून सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी पक्षकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा उर्मिला जोशी- फलके यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : न्यायालयात दाखल झालेल्या खटल्याचा निकाल कोणाच्या तरी एकाच्या बाजुने लागतो. त्यामुळे उगीचच मनामध्ये द्वेष बाळगण्यापेक्षा लोक न्यायालयाच्या माध्यमातून सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी पक्षकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा उर्मिला जोशी- फलके यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.परभणी येथील जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्या. उर्मिला जोशी या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश आर.एम. सादरानी, दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शेख अकबर शेख जाफर, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.एल.बागल, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. दीपक गांजापूरकर, ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश उर्मिला जोशी म्हणाल्या की, लोकन्यायालयाच्या माध्यमातून शिष्टाई करण्याचे काम केले जाते. महत्वाकांक्षा प्रत्येकाच्याच असतात. न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांपैकी कोणताही निकाल एका बाजुने लागत असतो. त्यामुळे मनामध्ये द्वेष बाळगण्यापेक्षा व आपसात भांडण न करता पक्षकारांनी लोकन्यायालयाच्या माध्यमातून समोपचाराने वाद मिटवावेत, जेणेकरुन यासाठी लागणारा पैसा व वेळ वाचेल. वाचलेला वेळ सत्कार्यासाठी वापरता येईल. लोकन्यायालयात जमीन अधिग्रहणासंदर्भात बहुतांश खटले दाखल होतात. यामध्ये १०-१० वर्षे न्यायालयीन लढाई करत बसण्यापेक्षा व १० वर्षांनंतर पैसे मिळण्यापेक्षा आताच चार पैसे कमी मिळाले तरी तडजोड करुन सामंजस्याची भूमिका घेऊन वाद मिटवावा व लवचिकता बाळगावी. शिवाय पती-पत्नीमधील वाद, धनादेशाचा अनादर आदी प्रकरणातही वेळ आणि पैसा वाया घालण्यापेक्षा लोकन्यायालयातून हे वाद मिटवावेत. जेणेकरुन दोन पक्षकारांमधील आपसातील संबंध दृढ होतील, असेही त्या म्हणाल्या. यावेळी न्या.आर.एम. सादरानी यांनीही तणावमुक्त जीवन जगण्यासाठी पक्षकारांनी सामंजस्याने लोकन्यायालयाच्या माध्यमातून वाद मिटवावेत, असे आवाहन केले. लोकन्यायालयाचा दोन्ही पक्षकारांनी फायदा घ्यावा, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास न्या. एस.जी. ठुबे, न्या. डी.व्ही.कश्यप, न्या. एस.ए. श्रीखंडे, न्या. एम.एस. तिवारी, न्या.आर.एस. पाजणकर, न्या.सौ.एम.डी.कश्यप आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह दिवाणी न्यायाधीश अजय लांजेवार यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे माधव हुंबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक पी.बी.काळे, सेवानिवृत्त अधीक्षक एस.डी. पाटील, अधीक्षक डी.एन. कुंटुरकर, वरिष्ठ लिपीक बी.एस. कोत्तावार, कनिष्ठ लिपीक जी.के.चव्हाण यांनी प्रयत्न केले.४ कोटी ३३ लाख रुपयांची रक्कम वसूल४शनिवारी झालेल्या लोक न्यायालयात ५९२ प्रलंबित प्रकरणे व १६४ दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण ७५६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये ४ कोटी ३३ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. त्यामुळे या लोकन्यायालयाचा प्रकरणे निकाली काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे.