शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

परभणी येथे राष्ट्रीय लोक अदालत: सामोपचाराने वाद मिटविण्यासाठीच लोकन्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:26 IST

न्यायालयात दाखल झालेल्या खटल्याचा निकाल कोणाच्या तरी एकाच्या बाजुने लागतो. त्यामुळे उगीचच मनामध्ये द्वेष बाळगण्यापेक्षा लोक न्यायालयाच्या माध्यमातून सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी पक्षकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा उर्मिला जोशी- फलके यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : न्यायालयात दाखल झालेल्या खटल्याचा निकाल कोणाच्या तरी एकाच्या बाजुने लागतो. त्यामुळे उगीचच मनामध्ये द्वेष बाळगण्यापेक्षा लोक न्यायालयाच्या माध्यमातून सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी पक्षकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा उर्मिला जोशी- फलके यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.परभणी येथील जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्या. उर्मिला जोशी या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश आर.एम. सादरानी, दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शेख अकबर शेख जाफर, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.एल.बागल, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. दीपक गांजापूरकर, ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश उर्मिला जोशी म्हणाल्या की, लोकन्यायालयाच्या माध्यमातून शिष्टाई करण्याचे काम केले जाते. महत्वाकांक्षा प्रत्येकाच्याच असतात. न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांपैकी कोणताही निकाल एका बाजुने लागत असतो. त्यामुळे मनामध्ये द्वेष बाळगण्यापेक्षा व आपसात भांडण न करता पक्षकारांनी लोकन्यायालयाच्या माध्यमातून समोपचाराने वाद मिटवावेत, जेणेकरुन यासाठी लागणारा पैसा व वेळ वाचेल. वाचलेला वेळ सत्कार्यासाठी वापरता येईल. लोकन्यायालयात जमीन अधिग्रहणासंदर्भात बहुतांश खटले दाखल होतात. यामध्ये १०-१० वर्षे न्यायालयीन लढाई करत बसण्यापेक्षा व १० वर्षांनंतर पैसे मिळण्यापेक्षा आताच चार पैसे कमी मिळाले तरी तडजोड करुन सामंजस्याची भूमिका घेऊन वाद मिटवावा व लवचिकता बाळगावी. शिवाय पती-पत्नीमधील वाद, धनादेशाचा अनादर आदी प्रकरणातही वेळ आणि पैसा वाया घालण्यापेक्षा लोकन्यायालयातून हे वाद मिटवावेत. जेणेकरुन दोन पक्षकारांमधील आपसातील संबंध दृढ होतील, असेही त्या म्हणाल्या. यावेळी न्या.आर.एम. सादरानी यांनीही तणावमुक्त जीवन जगण्यासाठी पक्षकारांनी सामंजस्याने लोकन्यायालयाच्या माध्यमातून वाद मिटवावेत, असे आवाहन केले. लोकन्यायालयाचा दोन्ही पक्षकारांनी फायदा घ्यावा, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास न्या. एस.जी. ठुबे, न्या. डी.व्ही.कश्यप, न्या. एस.ए. श्रीखंडे, न्या. एम.एस. तिवारी, न्या.आर.एस. पाजणकर, न्या.सौ.एम.डी.कश्यप आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह दिवाणी न्यायाधीश अजय लांजेवार यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे माधव हुंबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक पी.बी.काळे, सेवानिवृत्त अधीक्षक एस.डी. पाटील, अधीक्षक डी.एन. कुंटुरकर, वरिष्ठ लिपीक बी.एस. कोत्तावार, कनिष्ठ लिपीक जी.के.चव्हाण यांनी प्रयत्न केले.४ कोटी ३३ लाख रुपयांची रक्कम वसूल४शनिवारी झालेल्या लोक न्यायालयात ५९२ प्रलंबित प्रकरणे व १६४ दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण ७५६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये ४ कोटी ३३ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. त्यामुळे या लोकन्यायालयाचा प्रकरणे निकाली काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे.