शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST

परभणी : ऊसतोडीच्या पैशांच्या कारणावरुन अपहरण केलेल्या एका व्यक्तीचा आरोपींनी खून केल्याची बाब तपासात स्पष्ट झाली असून, ग्रामीण पोलिसांनी ...

परभणी : ऊसतोडीच्या पैशांच्या कारणावरुन अपहरण केलेल्या एका व्यक्तीचा आरोपींनी खून केल्याची बाब तपासात स्पष्ट झाली असून, ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.

परभणी तालुक्यातील गव्हा येथील उत्तम नागोराव खरात हे ऊसतोडीसाठी कामाला गेले होते. त्यांनी काही रक्कम उचल म्हणून घेतली, त्यानंतर काही दिवसांपासून ते कामावर गेले नव्हते. याच दरम्यान १५ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना ऊसतोडीसाठी कामावर चल असे म्हणून आरोपींनी बळजबरीने उचलून नेले. या प्रकरणी उत्तम खरात यांचा मुलगा अक्षय खरात याने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गजानन चांदू काळे (रा.साळपुरी तांडा), उत्तम गोरखनाथ काळे (रा.गव्हा) व इतर तिघांनी वडिलांना जबरदस्ती करुन पळवून नेल्याचे म्हटले. त्यावरुन आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

याच दरम्यान १८ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात एक मृतदेह वाहून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नवा मोंढा पोलिसांनी या मृतदेहाचा पंचनामा करुन ओळख पटविण्याचे काम सुरू केले. तेव्हा हा मृतदेह उत्तम खरात यांचा असल्याचे स्पष्ट झाले. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांनी घटनास्थळी जाऊन ओळख पटविली. तसेच अपहरण प्रकरणाच्या तपासाला गती दिली. त्यावेळी अपहरणकर्त्यांनीच उत्तम नागोराव खरात यांचा खून केल्याची बाब तपासात स्पष्ट झाली. दरम्यान, गजानन काळे आणि उत्तम काळे या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे अपहरणाच्या प्रकरणात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे, अशी माहिती गणेश राहिरे यांनी दिली.