शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

परभणी जिल्ह्यात बिल न देताच महावितरणची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:16 IST

जिल्ह्यात एकाही कृषिपंपाचे रिडिंग घेण्यात आलेले नाही. अंदाजित अव्वाच्या सव्वा बिले देऊन ९६ हजार ८०८ कृषिपंप धारकांकडे १३८६ कोटी ...

जिल्ह्यात एकाही कृषिपंपाचे रिडिंग घेण्यात आलेले नाही. अंदाजित अव्वाच्या सव्वा बिले देऊन ९६ हजार ८०८ कृषिपंप धारकांकडे १३८६ कोटी रुपयांची थकबाकी दाखविण्यात आली आहे. त्याची वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

मागील दहा वर्षांपासून महावितरणकडून कृषिपंपाचे कोटेशन घेतले. तेव्हापासून आतापर्यंत महावितरण कंपनीच्या वतीने कधी मीटर रिडिंग घेण्यात आले नाही. मात्र, वर्षाला एकदा मार्च एंडिंगच्या नावाखाली वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडून बिलाची रक्कम कळते.

- अनंत बनसोडे, शेतकरी, पिंपळगाव

कृषिपंपाचे कोटेशन घेतले तेव्हापासून आतापर्यंत महावितरण कंपनीच्या वतीने एकदाही विद्युत बिल देण्यात आलेले नाही. मात्र, अव्वाच्या सव्वा बिल नावावर जमा होत आहे. आता या बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून तगादा लावला जात आहे.

- सिद्धू कदम, शेतकरी, आर्वी

महावितरण कंपनीकडून दर महिन्याला विद्युत बिल मिळाले तर हे बिल भरण्यासाठी आम्हाला सोयीचे राहील. मात्र, वर्षभर महावितरणचा कर्मचारी आमच्याकडे फिरकत नाही. वर्षानंतर अंदाजित बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित केला जातो.

- नरसिंग ढेंबरे, शेतकरी, कुंभारी