शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात पाणी सोडण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:15 IST

पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात सापडली आहेत. निम्न दुधना प्रकल्पातून दोन्ही कालव्याद्वारे पाणी सोडून शेतकºयांना दिलासा देण्यासाठी एक आॅगस्ट रोजी मुंबई येथे आ.विजय भांबळे, आ.बाबाजानी दुर्राणी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली. दरम्यान, पालकमंत्र्यांनी संबंधितांना दोन ते तीन दिवसांत पाणी सोडण्याचे आदेश दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात सापडली आहेत. निम्न दुधना प्रकल्पातून दोन्ही कालव्याद्वारे पाणी सोडून शेतकºयांना दिलासा देण्यासाठी एक आॅगस्ट रोजी मुंबई येथे आ.विजय भांबळे, आ.बाबाजानी दुर्राणी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली. दरम्यान, पालकमंत्र्यांनी संबंधितांना दोन ते तीन दिवसांत पाणी सोडण्याचे आदेश दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.एक महिन्यापासून पाऊस नसल्याने खरीप हंगामातील मूग, कापूस, सोयाबीन, तूर इ. पिके सुकत आहेत. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकºयांनी खरिपाची पेरणी केली. पिके वाढीसही लागली; परंतु, महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने पिके माना टाकू लागली आहेत. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातून उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडले तर कालवा क्षेत्रातील शेतकºयांना पिके वाचविण्यास मदत होईल. यासाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकºयांसह विविध संघटनांनी केली होती.१ आॅगस्ट रोेजी पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन आ.विजय भांबळे, आ.बाबाजानी दुर्राणी यांनी मागणी केली.दरम्यान, कालव्यातून पाणी सोडल्यास सेलू, जिंतूर, मानवत परभणी तालुक्यातील बहुतांश शेतकºयांना दिलासा मिळेल.