शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

प्रेरकांचे मानधन रखडले

By admin | Updated: October 21, 2014 13:29 IST

निरक्षरांना नवसाक्षर बनवून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा विडा उचललेल्या प्रेरकांचे मानधन दोन वर्षे होत आले तरी मिळालेेले नाही.

परभणी : निरक्षरांना नवसाक्षर बनवून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा विडा उचललेल्या प्रेरकांचे मानधन दोन वर्षे होत आले तरी मिळाले नसल्याने दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या आनंदोत्सवास जिल्ह्यातील ८५२ गावातील प्रेरकांना मुकावे लागणार आहे. 
देशातील निरक्षरांची संख्या लक्षात घेता विकासाच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय बनला आहे. विकासाच्या प्रवाहात यायचे असेल तर निरक्षरांना साक्षर करावे लागणार हा उद्देश समोर ठेऊन तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते २00९ मध्ये साक्षरतादिनी 'साक्षर भारत' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशातील अतिमहत्त्वाच्या १८ प्राधान्यांपैकी हा एक महत्त्वाचा असल्याने देशामध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली होती. महाराष्ट्रातही शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण ५0 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याने महाराष्ट्रातील परभणी, हिंगोली, जालना, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, गडचिरोली, नंदुरबार आणि गोंदिया या १0 जिल्ह्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला. या जिल्ह्यात २0१२ पासून मोठी व्यापक चळवळउभारत निरक्षरांचा शोध घेत त्यांना नवसाक्षर करण्यात आले. जिल्हास्तरावर निरंतर शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक व प्रेरकाच्या मानधन तत्वावर कंत्राटी स्वरुपात नियुक्त्या करण्यात आल्या. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दोन प्रेरकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. स्वयंसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक गावात निरंतर शिक्षण केंद्रावर निरक्षरांना साक्षर करण्याचे काम होत आहे. मात्र हे महत्त्वाचे कार्य पार पाडणार्‍या समन्वयकासह प्रेरकांचे मानधन दोन वर्ष होत आले तरी मिळाले नाही. याबाबत जिल्हा निरंतर शिक्षण कार्यालयामध्ये चौकशी केली असता केंद्र सरकारकडे निधीच उपलब्ध नसल्यामुळे मानधन रोखण्यात आल्याचे सांगण्यात आले. याविषयी जिल्हा शिक्षणाधिकारी निरंतर यांना मागील महिन्याच्या मानधनाविषयी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली तरीही अद्याप मानधन मिळाले नसल्याने प्रेरकांवर उपासमारीची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)
 
■ याविषयी माहिती घेतली असता ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे मानधन राज्य शासन देणार असल्याचे अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना १0 सप्टेंबर रोजी पत्र पाठवून प्रेरकांचे मानधन करावे, असे आदेश दिले आहेत. असे असले तरी दोन महिन्यांच्या मानधनासाठी कुटुंब सर्वेक्षणाचे काम पूर्णकरून त्यांच्या वेबपोर्टलवर अपलोड करावे लागणार आहे.