शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रेरकांचे मानधन रखडले

By admin | Updated: October 21, 2014 13:29 IST

निरक्षरांना नवसाक्षर बनवून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा विडा उचललेल्या प्रेरकांचे मानधन दोन वर्षे होत आले तरी मिळालेेले नाही.

परभणी : निरक्षरांना नवसाक्षर बनवून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा विडा उचललेल्या प्रेरकांचे मानधन दोन वर्षे होत आले तरी मिळाले नसल्याने दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या आनंदोत्सवास जिल्ह्यातील ८५२ गावातील प्रेरकांना मुकावे लागणार आहे. 
देशातील निरक्षरांची संख्या लक्षात घेता विकासाच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय बनला आहे. विकासाच्या प्रवाहात यायचे असेल तर निरक्षरांना साक्षर करावे लागणार हा उद्देश समोर ठेऊन तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते २00९ मध्ये साक्षरतादिनी 'साक्षर भारत' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशातील अतिमहत्त्वाच्या १८ प्राधान्यांपैकी हा एक महत्त्वाचा असल्याने देशामध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली होती. महाराष्ट्रातही शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण ५0 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याने महाराष्ट्रातील परभणी, हिंगोली, जालना, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, गडचिरोली, नंदुरबार आणि गोंदिया या १0 जिल्ह्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला. या जिल्ह्यात २0१२ पासून मोठी व्यापक चळवळउभारत निरक्षरांचा शोध घेत त्यांना नवसाक्षर करण्यात आले. जिल्हास्तरावर निरंतर शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक व प्रेरकाच्या मानधन तत्वावर कंत्राटी स्वरुपात नियुक्त्या करण्यात आल्या. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दोन प्रेरकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. स्वयंसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक गावात निरंतर शिक्षण केंद्रावर निरक्षरांना साक्षर करण्याचे काम होत आहे. मात्र हे महत्त्वाचे कार्य पार पाडणार्‍या समन्वयकासह प्रेरकांचे मानधन दोन वर्ष होत आले तरी मिळाले नाही. याबाबत जिल्हा निरंतर शिक्षण कार्यालयामध्ये चौकशी केली असता केंद्र सरकारकडे निधीच उपलब्ध नसल्यामुळे मानधन रोखण्यात आल्याचे सांगण्यात आले. याविषयी जिल्हा शिक्षणाधिकारी निरंतर यांना मागील महिन्याच्या मानधनाविषयी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली तरीही अद्याप मानधन मिळाले नसल्याने प्रेरकांवर उपासमारीची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)
 
■ याविषयी माहिती घेतली असता ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे मानधन राज्य शासन देणार असल्याचे अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना १0 सप्टेंबर रोजी पत्र पाठवून प्रेरकांचे मानधन करावे, असे आदेश दिले आहेत. असे असले तरी दोन महिन्यांच्या मानधनासाठी कुटुंब सर्वेक्षणाचे काम पूर्णकरून त्यांच्या वेबपोर्टलवर अपलोड करावे लागणार आहे.