शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

ग्रामपंचायत निवडणुकीतही पैशांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:53 IST

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा व सलग चार वेळा शेतकरी कामगार पक्षाच्या अत्यंत साधारण उमेदवाराला निवडून देणारा मतदार संघ म्हणून ...

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा व सलग चार वेळा शेतकरी कामगार पक्षाच्या अत्यंत साधारण उमेदवाराला निवडून देणारा मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघात १९८९ च्या विधानसभा निवडणुकीपासून पैशांच्या वापराला सुरुवात झाली. १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत पैशांच्या बळावर धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करून निवडणुका जिंकल्या. त्यानंतर गंगाखेड विधानसभा मतदार संघात पैशांचा वापर अधिकच वाढला आणि येथून पुढे या मतदार संघाच्या अधोगतीला सुरुवात झाली, असे जुन्या जाणत्या राजकीय समीक्षकांबरोबर सुजाण मतदारांतून बोलले जाऊ लागले.

निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या धनदांडग्यांनी प्रत्येक वेळी आपली प्रतिष्ठा पणाला लावत विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केल्याने स्थानिक विकासकामांना बगल मिळाली. विधानसभा निवडणुकीत वापरलेले पैशांचे फंडे पुन्हा शहरातील नगरपरिषद निवडणूक, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत वापरले जाऊ लागले. जो अधिकचा पैसा खर्च करेल, तोच सत्तेत येऊ लागल्याने विधानसभा निवडणुकीतील पैशांचे लोण गावपातळीवरील ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचले आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यानही गावपातळीवर बोली लागत आहे. जो जास्त रकमेची बोली लावेल, त्याच्याच ताब्यात ग्रामपंचायतीच्या चाव्या जात आहेत. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची ऐसीतैसी केली जात असल्याने गावागावातील मूलभूत सुविधांबरोबरच विकासकामांनाही बगल मिळत आहे. त्यामुळे परिसरातील विकासकामे बाजूला पडत आहेत. निवडणुकीदरम्यान होत असलेल्या पैशांच्या वापराला ब्रेक लावण्यासाठी प्रशासनाने सजग व्हावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.