शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मोबाइलने विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:20 IST

परभणी : ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या हातात मोबाइल आला असून, त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. मैदानी खेळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे ...

परभणी : ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या हातात मोबाइल आला असून, त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. मैदानी खेळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी वर्षभर शाळा बंद राहिल्या. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांपासून दूर ठेवलेले ॲन्ड्राइड मोबाइल नाईलाजाने पालकांना त्यांच्या हातात द्यावे लागले. साधारणत: दोन ते तीन तास ऑनलाइन अभ्यासक्रम आणि त्यानंतर मोबाइलवरच गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही विद्यार्थी मोबाइल हातात घेत असून, मागील वर्षभरापासून मोबाइलचा वाढलेेला हा वापर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करीत आहे. डोळ्यांच्या समस्या, वारंवार डोके दुखणे, कमी वयात चष्मा लागणे या प्रमुख कारणांबरोबरच शारीरिक आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत. मैदानी खेळ जवळपास बंद झाले असून, विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीवरही परिणाम होत आहे. त्यामुळे ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे शिक्षण प्रक्रिया सुरू राहिली असली, तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यामुळे या संदर्भात पालकांनीच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुले कायम मोबाइलवर

ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना ॲन्ड्राइड मोबाइल खरेदी करून दिले. जेमतेम दोन ते तीन तासांचा ऑनलाइन अभ्यासक्रम असला, तरी त्या व्यतिरिक्तही मोबाइलचा वापर वाढला आहे. जास्तीतजास्त वेळ मुुले मोबाइलवर वेगवेगळे गेम खेळत असल्याचे चित्र शहरी भागात घराघरात पाहावयास मिळत आहे. मोबाइलच्या अति वापरामुळे मुलांना डोळ्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत, तसेच त्यांची एकाग्रताही खंडित होत असल्याचे दिसून येत आहे.

विटीदांडू गायबच

मैदानी खेळांसाठी पूर्वी विटीदांडू, लिंगोरच्या, सूरपारंब्या आदी खेळ खेळले जात होते. मात्र, मागच्या काही वर्षांपासून हे खेळ लुप्त झाले आहेत. ग्रामीण भागात कुठेतरी सूरपारंब्या खेळताना मुले दिसतात, परंतु शहरी भागात मात्र या मैदानी खेळांकडे मुलांनी चक्क पाठ फिरविली आहे. वसाहतीतील रस्त्यावर क्रिकेट, बॅडमिंटन मात्र खेळले जात असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनामुळे मोबाइल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले

विद्यार्थ्यांच्या हातात मोबाइल आल्याने मोबाइलवर गेम खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ५५ टक्क्यांपर्यंत आहे. शहरी भागात ही संख्या अधिक असून, ग्रामीण भागात मात्र अजूनही विद्यार्थी मैदानावर येतात. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्याने मैदानी खेळ टिकून आहेत, असे क्रीडा शिक्षक कैलास माने यांनी सांगितले.