शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पोलिसांच्या साक्षीने सोयरीक अन् नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST

भास्कर लांडे पालम : एकमेकांवर जिवापाड प्रेम, मात्र नातेवाइकांचा विरोध... लग्न तर करायचे; पण त्यासाठी अडचणींचा डोंगर... अशा परिस्थितीत ...

भास्कर लांडे

पालम : एकमेकांवर जिवापाड प्रेम, मात्र नातेवाइकांचा विरोध... लग्न तर करायचे; पण त्यासाठी अडचणींचा डोंगर... अशा परिस्थितीत पळून जाणे हा एकमेव मार्ग... त्या दोघांनीही तसा निर्णयही घेतला आणि पळून जाण्याचा बेत आखून तयारी करीत असतानाच पोलिसांची बेरकी नजर या प्रेमीयुगुलावर पडली. मग काय पोलीस ठाण्यापासूनच सुरू झाला प्रवास... पोलिसांनीही समजदारीची भूमिका घेतली. नातेवाइकांची समजूत काढली. पोलिसांच्या साक्षीने आणि नातेवाइकांच्या उपस्थितीत ११ सप्टेंबर रोजी शुभमंगल उरकले... पोलीस ठाण्यापासून सुरू झालेला सहजीवनाचा प्रवास अखेर विवाहबंधनात अडकला. चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे घडलेला हा प्रकार तालुक्यात चांगलाच चर्चेत आला होता.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालम पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे शहरात गस्त घालत होते. दुपारी १ वाजता त्यांना बसस्थानकासमोर तरुण जोडपे संशयास्पदरीत्या वावरताना दिसून आले. लागलीच त्यांनी वाहन वळवून जोडप्याची विचारपूस केली. ते म्हणाले, ‘आमचे ऐकमेकांवर जिवापाड प्रेम असून घरच्या विरोधामुळे आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचा बेत आखला आहे’. हे ऐकताच पोलिसांनी त्यांना वाहनात बसवून पालम ठाण्यात आणले. विचारपूसअंती पालम तालुक्यातील भय्यासाहेब रमेश वाव्हळे (२२) आणि पूर्णा तालुक्यातील मुंबर येथील अर्चना बाळासाहेब कस्तुरे (२०) अशी त्यांची नावे असल्याचे समजले. त्यांचे आई-वडील पालम तालुक्यातील जवळा येथील वीटभट्टीवर एकत्र काम करीत आहेत. येथील ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने दोघांनी ऐकमेकांना जीवनसाथी बनविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांच्या लग्नाला दोन्हीकडील नातेवाइकांनी विरोध दर्शविला. म्हणून हे प्रेमीयुगुल पुण्याला जाऊन विवाह करून संसार थाटण्याच्या बेताने पालमला आले होते. ही हाकीकत समजल्यानंतर पोलिसांनी दोन्हीकडील नातेवाइकांना तातडीने ठाण्यात बोलावून घेतले. प्रथमदर्शनी त्यांच्या प्रेमाला दोन्हीकडील नातेवाइकांनी मान्यता दिली नाही. मग पोलिसांना समुपदेशन करावे लागले. अखेरीस दोन्हीकडील नातेवाईक या दोघांच्या विवाहासाठी तयार झाले; परंतु आजच लग्न करण्याच्या निर्णयावर हे दोघेही ठाम होते. मग काय ! या दोघांपुढे कोणाचेही काहीही चालले नाही. शेवटी मुलाच्या मूळ गावी म्हणजे पालम तालुक्यातील जवळा पा. येथे रात्री विवाहाची तयारी सुरू झाली. पारंपरिक विवाहासारखा झगमगाट नसला तरी या दोघांच्या आनंदाला पारावार नव्हता. ते पाहून वाव्हळे व कस्तुरे कुटुंबाचा उत्साह वाढला. मोकळ्या आकाशाखाली दोन्ही नातेवाइकांच्या साक्षीने विवाह संपन्न झाला. विवाहाला सरपंच रावसाहेब खटिंग, माजी सभापती गणेशराव घोरपडे, बाबासाहेब ऐंगडे, वीटभट्टी मालक नानासाहेब पोळ, गणेश पोळ, गिरीश पोळ आदींनी सहकार्य केले. त्यांची उपस्थिती होती.

पोलिसांकडून दोन्ही नातेवाइकांचे मनपरिवर्तन

मुलगा आणि मुलीकडील नातेवाइकांना एकत्र आणण्याचे काम पालम पोलीस ठाण्यात केले. शिवाय, नातेवाइकांचे मनपरिवर्तन करून विवाहाला राजी केले. त्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे, फौजदार विनोद साने, सहायक पोलीस उपनिरीक्षक आगळे, जमादार दीपक केजगीर, वाहतूक पोलीस भंडारे यांनी परिश्रम घेतले.