शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बाजारभावाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST

परभणी : राज्यभरात सध्या टोमॅटोच्या गडगडलेल्या दराचा प्रश्न गाजत असून, जिल्ह्यातील सुमारे ५ हजार शेतकऱ्यांना बाजारभावाचा फटका सहन करावा ...

परभणी : राज्यभरात सध्या टोमॅटोच्या गडगडलेल्या दराचा प्रश्न गाजत असून, जिल्ह्यातील सुमारे ५ हजार शेतकऱ्यांना बाजारभावाचा फटका सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीला उत्पादन खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादकांसमोरील चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी या दोन हंगामात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच काही शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीतून वेगळा मार्ग स्वीकारला आहे. कमी काळात पैसा मोकळा होत असल्याने अनेक शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळले. मात्र या शेतकऱ्यांनाही बाजारभावाचा फटका सहन करावा लागत आहे. निसर्गाने साथ दिली; परंतु, परिस्थिती साथ देत नसल्याचीच भावना या शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

राज्यभरात सध्या टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. टोमॅटोला सध्या मिळत असलेल्या भावातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत टोमॅटोचे पीक घेतले जाते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत टोमॅटो उत्पादनाचे प्रमाण कमी असले तरी, सुमारे पाच हजार शेतकरी टोमॅटो उत्पादन करतात. चांगला भाव मिळाल्यास मुंबई. औरंगाबाद यांसारख्या बाजारपेेठेत टोमॅटोची निर्यात होते. मात्र सध्या कोणत्याच बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने स्थानिक बाजारपेठेतच टोमॅटोची विक्री होत आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत अडीच ते तीन रुपये किलो असा टोमॅटोला भाव मिळत आहे. त्यामुळे चांगले उत्पादन झाल्यानंतरही या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

निर्यात बंद असल्याचा फटका

परदेशात होणारी टोमॅटोची निर्यात बंद आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर होत आहे. निर्यात बंद असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढली. परिणामी भाव गडगडले आहेत. त्यामुळे टोमॅटो निर्यातीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. शिवाय टोमॅटो पिकाला हमीभाव जाहीर करावा, अशीही मागणी पुढे येत आहे.

एकरी पावणेदोन लाखाचा खर्च

टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी सरासरी एका एकराला काढणी आणि काढणीपश्चात असा सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च येतो. रोप लागवड, खत, फवारणी, बांधणी आणि मल्चिंग असा सुमारे १ लाख रुपयांचा खर्च येतो, तर तोडणी आणि वाहतूक खर्च ७५ हजारांपर्यंत जातो. एका एकरात साधारणत: ६० टन टोमॅटोचे उत्पादन होते. अडीच ते तीन रुपये किलो सध्या टोमॅटोला भाव मिळत असून, एकरातून कसेबसे एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडतात. त्यामुळे उत्पादन खर्चातही ७५ हजारांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

टोमॅटो हे नाशवंत पीक आहे. ते बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर किमान १० रुपये किलो भाव मिळणे अपेक्षित आहे. दोन आणि तीन रुपयांचा भाव मिळत असेल, तर नुकसान होणारच.

- विलास बाबर, शेतकरी