शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बाजारभावाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST

परभणी : राज्यभरात सध्या टोमॅटोच्या गडगडलेल्या दराचा प्रश्न गाजत असून, जिल्ह्यातील सुमारे ५ हजार शेतकऱ्यांना बाजारभावाचा फटका सहन करावा ...

परभणी : राज्यभरात सध्या टोमॅटोच्या गडगडलेल्या दराचा प्रश्न गाजत असून, जिल्ह्यातील सुमारे ५ हजार शेतकऱ्यांना बाजारभावाचा फटका सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीला उत्पादन खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादकांसमोरील चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी या दोन हंगामात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच काही शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीतून वेगळा मार्ग स्वीकारला आहे. कमी काळात पैसा मोकळा होत असल्याने अनेक शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळले. मात्र या शेतकऱ्यांनाही बाजारभावाचा फटका सहन करावा लागत आहे. निसर्गाने साथ दिली; परंतु, परिस्थिती साथ देत नसल्याचीच भावना या शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

राज्यभरात सध्या टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. टोमॅटोला सध्या मिळत असलेल्या भावातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत टोमॅटोचे पीक घेतले जाते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत टोमॅटो उत्पादनाचे प्रमाण कमी असले तरी, सुमारे पाच हजार शेतकरी टोमॅटो उत्पादन करतात. चांगला भाव मिळाल्यास मुंबई. औरंगाबाद यांसारख्या बाजारपेेठेत टोमॅटोची निर्यात होते. मात्र सध्या कोणत्याच बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने स्थानिक बाजारपेठेतच टोमॅटोची विक्री होत आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत अडीच ते तीन रुपये किलो असा टोमॅटोला भाव मिळत आहे. त्यामुळे चांगले उत्पादन झाल्यानंतरही या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

निर्यात बंद असल्याचा फटका

परदेशात होणारी टोमॅटोची निर्यात बंद आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर होत आहे. निर्यात बंद असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढली. परिणामी भाव गडगडले आहेत. त्यामुळे टोमॅटो निर्यातीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. शिवाय टोमॅटो पिकाला हमीभाव जाहीर करावा, अशीही मागणी पुढे येत आहे.

एकरी पावणेदोन लाखाचा खर्च

टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी सरासरी एका एकराला काढणी आणि काढणीपश्चात असा सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च येतो. रोप लागवड, खत, फवारणी, बांधणी आणि मल्चिंग असा सुमारे १ लाख रुपयांचा खर्च येतो, तर तोडणी आणि वाहतूक खर्च ७५ हजारांपर्यंत जातो. एका एकरात साधारणत: ६० टन टोमॅटोचे उत्पादन होते. अडीच ते तीन रुपये किलो सध्या टोमॅटोला भाव मिळत असून, एकरातून कसेबसे एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडतात. त्यामुळे उत्पादन खर्चातही ७५ हजारांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

टोमॅटो हे नाशवंत पीक आहे. ते बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर किमान १० रुपये किलो भाव मिळणे अपेक्षित आहे. दोन आणि तीन रुपयांचा भाव मिळत असेल, तर नुकसान होणारच.

- विलास बाबर, शेतकरी