शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

'मग आम्हाला बोलावले कशाला'; मंत्री अतुल सावेंना विचारला स्वातंत्र्यसैनिकाने जाब

By ज्ञानेश्वर भाले | Updated: September 17, 2022 17:43 IST

marathawada muktisangram din: परभणीतील राजगोपालाचारी उद्यानात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण झाले. ध्वजाराेहणानंतर मंत्री सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली.

परभणी : आम्ही जिवाचे रान करून मराठवाड्याला निजामापासून मुक्त केले. गुलामगिरी काय असते, याची कल्पना आपणास येणार नाही. त्यामुळे तुमच्यासह इतर नागरिक जे स्वातंत्र्य उपभोगत आहेत, ते आमच्या सारख्या अनेकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच. पण आज सरकार, प्रशासन आमचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी कमी पडत असल्याची खंत स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मकरंद यांनी मंत्री अतुल सावे यांच्याकडे व्यक्त करत त्यांना याबाबत जाब विचारला. परभणी शहरातील राजगोपालाचारी उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या (marathawada muktisangram din) पार्श्वभूमीवर झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्यसैनिकाने आपली खदखद मंत्री सावे यांच्यासह इतरांकडे बोलून दाखवली.

परभणीतील राजगोपालाचारी उद्यानात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण झाले. ध्वजाराेहणानंतर मंत्री सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मकरंद यांनी आपल्या अडचणी मंत्र्यांसमोर मांडल्या. आजचे प्रश्न, सुविधा, योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागतात. जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आमचे प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. घरासह वैयक्तिक योजनेच्या अनुषंगाने आमच्या सोबत दुजाभाव होतो, असा आरोप लक्ष्मण मकरंद यांनी केला. आता बोटावर माेजण्या इतकेच स्वातंत्र्यसैनिक हयात आहे, किमान त्यांचे प्रश्न तरी सरकारने तातडीने साेडवावे, अशी अपेक्षा त्यांनी मंत्री सावे यांच्याकडे व्यक्त केली.

मग आम्हाला बोलावले कशालापरभणीत झालेल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान वीरपत्नी आणि मातांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायास अश्रूंच्या रुपाने वाट मोकळी करून दिली. आमच्या परिवारातील सदस्यांनी जिवाची बाजी लावत देश रक्षणासाठी आत्मबलिदान दिले. पण अशा शासकीय कार्यक्रमादरम्यान आम्हाला योग्य तो मान, सन्मान मिळत नाही, मग बोलवता कशाला, अशी खंत शहीद अक्षय यांची आई सुनीता गोडबोले, वीर पत्नी अनुराधा गणेश शहाणे, वीरपत्नी अंजना बालाजी अंभोरे यांनी मंत्री सावे यांच्याकडे व्यक्त केली. या कार्यक्रमातही मंत्री सावे संबंधितांना न भेटता निघाले हाेते. पण अनिता सरोदे यांनी संबंधितांची भेट मंत्री सावे यांच्याशी घालून दिली. कुठल्याही कार्यक्रमात आमच्यासोबत असेच होत असल्याचा आरोप यावेळी वीर माता, वीर पत्नी यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Atul Saveअतुल सावेparabhaniपरभणी