शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'मग आम्हाला बोलावले कशाला'; मंत्री अतुल सावेंना विचारला स्वातंत्र्यसैनिकाने जाब

By ज्ञानेश्वर भाले | Updated: September 17, 2022 17:43 IST

marathawada muktisangram din: परभणीतील राजगोपालाचारी उद्यानात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण झाले. ध्वजाराेहणानंतर मंत्री सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली.

परभणी : आम्ही जिवाचे रान करून मराठवाड्याला निजामापासून मुक्त केले. गुलामगिरी काय असते, याची कल्पना आपणास येणार नाही. त्यामुळे तुमच्यासह इतर नागरिक जे स्वातंत्र्य उपभोगत आहेत, ते आमच्या सारख्या अनेकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच. पण आज सरकार, प्रशासन आमचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी कमी पडत असल्याची खंत स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मकरंद यांनी मंत्री अतुल सावे यांच्याकडे व्यक्त करत त्यांना याबाबत जाब विचारला. परभणी शहरातील राजगोपालाचारी उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या (marathawada muktisangram din) पार्श्वभूमीवर झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्यसैनिकाने आपली खदखद मंत्री सावे यांच्यासह इतरांकडे बोलून दाखवली.

परभणीतील राजगोपालाचारी उद्यानात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण झाले. ध्वजाराेहणानंतर मंत्री सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मकरंद यांनी आपल्या अडचणी मंत्र्यांसमोर मांडल्या. आजचे प्रश्न, सुविधा, योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागतात. जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आमचे प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. घरासह वैयक्तिक योजनेच्या अनुषंगाने आमच्या सोबत दुजाभाव होतो, असा आरोप लक्ष्मण मकरंद यांनी केला. आता बोटावर माेजण्या इतकेच स्वातंत्र्यसैनिक हयात आहे, किमान त्यांचे प्रश्न तरी सरकारने तातडीने साेडवावे, अशी अपेक्षा त्यांनी मंत्री सावे यांच्याकडे व्यक्त केली.

मग आम्हाला बोलावले कशालापरभणीत झालेल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान वीरपत्नी आणि मातांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायास अश्रूंच्या रुपाने वाट मोकळी करून दिली. आमच्या परिवारातील सदस्यांनी जिवाची बाजी लावत देश रक्षणासाठी आत्मबलिदान दिले. पण अशा शासकीय कार्यक्रमादरम्यान आम्हाला योग्य तो मान, सन्मान मिळत नाही, मग बोलवता कशाला, अशी खंत शहीद अक्षय यांची आई सुनीता गोडबोले, वीर पत्नी अनुराधा गणेश शहाणे, वीरपत्नी अंजना बालाजी अंभोरे यांनी मंत्री सावे यांच्याकडे व्यक्त केली. या कार्यक्रमातही मंत्री सावे संबंधितांना न भेटता निघाले हाेते. पण अनिता सरोदे यांनी संबंधितांची भेट मंत्री सावे यांच्याशी घालून दिली. कुठल्याही कार्यक्रमात आमच्यासोबत असेच होत असल्याचा आरोप यावेळी वीर माता, वीर पत्नी यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Atul Saveअतुल सावेparabhaniपरभणी