शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

'मग आम्हाला बोलावले कशाला'; मंत्री अतुल सावेंना विचारला स्वातंत्र्यसैनिकाने जाब

By ज्ञानेश्वर भाले | Updated: September 17, 2022 17:43 IST

marathawada muktisangram din: परभणीतील राजगोपालाचारी उद्यानात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण झाले. ध्वजाराेहणानंतर मंत्री सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली.

परभणी : आम्ही जिवाचे रान करून मराठवाड्याला निजामापासून मुक्त केले. गुलामगिरी काय असते, याची कल्पना आपणास येणार नाही. त्यामुळे तुमच्यासह इतर नागरिक जे स्वातंत्र्य उपभोगत आहेत, ते आमच्या सारख्या अनेकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच. पण आज सरकार, प्रशासन आमचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी कमी पडत असल्याची खंत स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मकरंद यांनी मंत्री अतुल सावे यांच्याकडे व्यक्त करत त्यांना याबाबत जाब विचारला. परभणी शहरातील राजगोपालाचारी उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या (marathawada muktisangram din) पार्श्वभूमीवर झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्यसैनिकाने आपली खदखद मंत्री सावे यांच्यासह इतरांकडे बोलून दाखवली.

परभणीतील राजगोपालाचारी उद्यानात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण झाले. ध्वजाराेहणानंतर मंत्री सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मकरंद यांनी आपल्या अडचणी मंत्र्यांसमोर मांडल्या. आजचे प्रश्न, सुविधा, योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागतात. जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आमचे प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. घरासह वैयक्तिक योजनेच्या अनुषंगाने आमच्या सोबत दुजाभाव होतो, असा आरोप लक्ष्मण मकरंद यांनी केला. आता बोटावर माेजण्या इतकेच स्वातंत्र्यसैनिक हयात आहे, किमान त्यांचे प्रश्न तरी सरकारने तातडीने साेडवावे, अशी अपेक्षा त्यांनी मंत्री सावे यांच्याकडे व्यक्त केली.

मग आम्हाला बोलावले कशालापरभणीत झालेल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान वीरपत्नी आणि मातांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायास अश्रूंच्या रुपाने वाट मोकळी करून दिली. आमच्या परिवारातील सदस्यांनी जिवाची बाजी लावत देश रक्षणासाठी आत्मबलिदान दिले. पण अशा शासकीय कार्यक्रमादरम्यान आम्हाला योग्य तो मान, सन्मान मिळत नाही, मग बोलवता कशाला, अशी खंत शहीद अक्षय यांची आई सुनीता गोडबोले, वीर पत्नी अनुराधा गणेश शहाणे, वीरपत्नी अंजना बालाजी अंभोरे यांनी मंत्री सावे यांच्याकडे व्यक्त केली. या कार्यक्रमातही मंत्री सावे संबंधितांना न भेटता निघाले हाेते. पण अनिता सरोदे यांनी संबंधितांची भेट मंत्री सावे यांच्याशी घालून दिली. कुठल्याही कार्यक्रमात आमच्यासोबत असेच होत असल्याचा आरोप यावेळी वीर माता, वीर पत्नी यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Atul Saveअतुल सावेparabhaniपरभणी