शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने हाती घेतली स्वच्छतेची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST

स्टेडियम भागातील स्वच्छतागृह बंद परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागातील व्यापारी आणि नागरिकांसाठी काही महिन्यांपूर्वी मनपाने बांधलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था ...

स्टेडियम भागातील स्वच्छतागृह बंद

परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागातील व्यापारी आणि नागरिकांसाठी काही महिन्यांपूर्वी मनपाने बांधलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. जलतरणिकेला लागून या स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच या स्वच्छतागृहाचे दरवाजे काढून नेले आहेत. त्याचप्रमाणे पाण्याची सुविधाही बंद झाली आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहाचा कोणताही उपयोग होत नसून, केलेला खर्च पाण्यात गेला आहे.

जलकुंभ उभारणीचे काम संथगतीने

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभ उभारणीचे काम संथगतीने सुरू आहे. तीन वर्षांपासून या कामाला प्रारंभ करण्यात आला. शहरातील इतर जलकुंभ बांधून पूर्ण झाले. मात्र राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. हे काम पूर्ण झाल्यास शिवाजीनगर, संभाजीनगर, शंकरनगर व इतर वसाहतीतील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

राहाटीजवळ पुलाच्या कामाला प्रारंभ

परभणी : वसमत रस्त्यावरील राहाटी येथे नवीन रुंद पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी झिरो फाट्याच्या दिशेने नांदगावजवळ खोदकाम केेले जात असून, पूल उभारणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत हे काम केले जात आहे. दरम्यान, काम सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करा

परभणी : शहरात नळ योजनेद्वारे ८ ते १० दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसांसाठी पाण्याची साठवण करण्याची तयारी नागरिकांना करावी लागत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असतानाही पाण्याची समस्या कायम आहे. नागरिकांना दोन दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन मनपाने करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

कालव्यातील गाळ उपसण्याची मागणी

परभणी : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे पाण्याची वहन क्षमता कमी झाली आहे. पाटबंधारे विभागाने या कालव्यातून एक पाणी आवर्तन दिले आहे. त्याचा कालावधी पूर्ण झाला असून, कालव्यातील गाळ आता उघडा पडला आहे. पुढील पाणी आवर्तन टेलपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.