शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मनपाने हाती घेतली स्वच्छतेची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST

स्टेडियम भागातील स्वच्छतागृह बंद परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागातील व्यापारी आणि नागरिकांसाठी काही महिन्यांपूर्वी मनपाने बांधलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था ...

स्टेडियम भागातील स्वच्छतागृह बंद

परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागातील व्यापारी आणि नागरिकांसाठी काही महिन्यांपूर्वी मनपाने बांधलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. जलतरणिकेला लागून या स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच या स्वच्छतागृहाचे दरवाजे काढून नेले आहेत. त्याचप्रमाणे पाण्याची सुविधाही बंद झाली आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहाचा कोणताही उपयोग होत नसून, केलेला खर्च पाण्यात गेला आहे.

जलकुंभ उभारणीचे काम संथगतीने

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभ उभारणीचे काम संथगतीने सुरू आहे. तीन वर्षांपासून या कामाला प्रारंभ करण्यात आला. शहरातील इतर जलकुंभ बांधून पूर्ण झाले. मात्र राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. हे काम पूर्ण झाल्यास शिवाजीनगर, संभाजीनगर, शंकरनगर व इतर वसाहतीतील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

राहाटीजवळ पुलाच्या कामाला प्रारंभ

परभणी : वसमत रस्त्यावरील राहाटी येथे नवीन रुंद पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी झिरो फाट्याच्या दिशेने नांदगावजवळ खोदकाम केेले जात असून, पूल उभारणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत हे काम केले जात आहे. दरम्यान, काम सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करा

परभणी : शहरात नळ योजनेद्वारे ८ ते १० दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसांसाठी पाण्याची साठवण करण्याची तयारी नागरिकांना करावी लागत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असतानाही पाण्याची समस्या कायम आहे. नागरिकांना दोन दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन मनपाने करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

कालव्यातील गाळ उपसण्याची मागणी

परभणी : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे पाण्याची वहन क्षमता कमी झाली आहे. पाटबंधारे विभागाने या कालव्यातून एक पाणी आवर्तन दिले आहे. त्याचा कालावधी पूर्ण झाला असून, कालव्यातील गाळ आता उघडा पडला आहे. पुढील पाणी आवर्तन टेलपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.