शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
3
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
4
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
5
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
6
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
7
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
8
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
9
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
10
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
11
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
12
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
13
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
14
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
15
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
16
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
17
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
18
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
19
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
20
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने हाती घेतली स्वच्छतेची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST

स्टेडियम भागातील स्वच्छतागृह बंद परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागातील व्यापारी आणि नागरिकांसाठी काही महिन्यांपूर्वी मनपाने बांधलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था ...

स्टेडियम भागातील स्वच्छतागृह बंद

परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागातील व्यापारी आणि नागरिकांसाठी काही महिन्यांपूर्वी मनपाने बांधलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. जलतरणिकेला लागून या स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच या स्वच्छतागृहाचे दरवाजे काढून नेले आहेत. त्याचप्रमाणे पाण्याची सुविधाही बंद झाली आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहाचा कोणताही उपयोग होत नसून, केलेला खर्च पाण्यात गेला आहे.

जलकुंभ उभारणीचे काम संथगतीने

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभ उभारणीचे काम संथगतीने सुरू आहे. तीन वर्षांपासून या कामाला प्रारंभ करण्यात आला. शहरातील इतर जलकुंभ बांधून पूर्ण झाले. मात्र राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. हे काम पूर्ण झाल्यास शिवाजीनगर, संभाजीनगर, शंकरनगर व इतर वसाहतीतील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

राहाटीजवळ पुलाच्या कामाला प्रारंभ

परभणी : वसमत रस्त्यावरील राहाटी येथे नवीन रुंद पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी झिरो फाट्याच्या दिशेने नांदगावजवळ खोदकाम केेले जात असून, पूल उभारणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत हे काम केले जात आहे. दरम्यान, काम सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करा

परभणी : शहरात नळ योजनेद्वारे ८ ते १० दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसांसाठी पाण्याची साठवण करण्याची तयारी नागरिकांना करावी लागत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असतानाही पाण्याची समस्या कायम आहे. नागरिकांना दोन दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन मनपाने करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

कालव्यातील गाळ उपसण्याची मागणी

परभणी : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे पाण्याची वहन क्षमता कमी झाली आहे. पाटबंधारे विभागाने या कालव्यातून एक पाणी आवर्तन दिले आहे. त्याचा कालावधी पूर्ण झाला असून, कालव्यातील गाळ आता उघडा पडला आहे. पुढील पाणी आवर्तन टेलपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.