शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मनपाने हाती घेतली स्वच्छतेची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST

स्टेडियम भागातील स्वच्छतागृह बंद परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागातील व्यापारी आणि नागरिकांसाठी काही महिन्यांपूर्वी मनपाने बांधलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था ...

स्टेडियम भागातील स्वच्छतागृह बंद

परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागातील व्यापारी आणि नागरिकांसाठी काही महिन्यांपूर्वी मनपाने बांधलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. जलतरणिकेला लागून या स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच या स्वच्छतागृहाचे दरवाजे काढून नेले आहेत. त्याचप्रमाणे पाण्याची सुविधाही बंद झाली आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहाचा कोणताही उपयोग होत नसून, केलेला खर्च पाण्यात गेला आहे.

जलकुंभ उभारणीचे काम संथगतीने

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभ उभारणीचे काम संथगतीने सुरू आहे. तीन वर्षांपासून या कामाला प्रारंभ करण्यात आला. शहरातील इतर जलकुंभ बांधून पूर्ण झाले. मात्र राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. हे काम पूर्ण झाल्यास शिवाजीनगर, संभाजीनगर, शंकरनगर व इतर वसाहतीतील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

राहाटीजवळ पुलाच्या कामाला प्रारंभ

परभणी : वसमत रस्त्यावरील राहाटी येथे नवीन रुंद पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी झिरो फाट्याच्या दिशेने नांदगावजवळ खोदकाम केेले जात असून, पूल उभारणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत हे काम केले जात आहे. दरम्यान, काम सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करा

परभणी : शहरात नळ योजनेद्वारे ८ ते १० दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसांसाठी पाण्याची साठवण करण्याची तयारी नागरिकांना करावी लागत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असतानाही पाण्याची समस्या कायम आहे. नागरिकांना दोन दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन मनपाने करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

कालव्यातील गाळ उपसण्याची मागणी

परभणी : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे पाण्याची वहन क्षमता कमी झाली आहे. पाटबंधारे विभागाने या कालव्यातून एक पाणी आवर्तन दिले आहे. त्याचा कालावधी पूर्ण झाला असून, कालव्यातील गाळ आता उघडा पडला आहे. पुढील पाणी आवर्तन टेलपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.