शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मानवत तालुक्यात निराधारांचा तपासणी अहवाल रखडला; अनुदानासाठी पहावी लागतेय वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 19:52 IST

तहसील प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांची तलाठ्यामार्फत सुक्ष्म तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप हा अहवाल तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला नसल्याने निराधारांचे अनुदान वाटप रखडले आहे. 

ठळक मुद्देसामाजिक न्याय विभागाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. या योजनेसाठी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यानी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले होते. यातील १ हजार ८७ अर्ज निकाली काढण्यासाठी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी बैठक घेण्यात आली होती. 

मानवत (परभणी ) : येथील तहसील प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांची तलाठ्यामार्फत सुक्ष्म तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप हा अहवाल तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला नसल्याने निराधारांचे अनुदान वाटप रखडले आहे. 

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना या दोन राज्य शासनाच्या तर इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या योजनेचा समावेश आहे. यातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपयांचे मानधन दिले जाते. या योजनेसाठी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यानी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले होते. यातील १ हजार ८७ अर्ज निकाली काढण्यासाठी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी बैठक घेण्यात आली होती. 

बैठकीत तहसीलदार अश्विनी जाधव यांनी ३६६ अर्ज मंूजर केले होते. तर या बैठकीत ७१५ अर्ज नामंजूर करण्यात आले होते. बैठकीत मंजूर केलेल्या पात्र लाभार्थ्यांची सुक्ष्म तपासणी करण्याचे आदेश तहसीलदार जाधव यांनी २७ नोव्हेंबर रोजी दिले होते. तलाठ्यांमार्फत ही तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. लाभार्थी मयत झाला आहे का? मुले नोकरीला आहेत का? लाभार्थी स्थलांतरित आहे का? त्यांचा आर्थिक स्तर आदींची तपासणी करण्यात येणार होती. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी केवळ दहा गावांतील २५१ लाभार्थ्यांचे अहवाल कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. इतर लाभार्थ्यांचे अहवाल मात्र आले नाहीत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. उर्वरित गावातील अहवाल सादर करण्यास विलंब करणार्‍या तलाठ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निराधारांमधून केली जात आहे. 

बोंडअळी सर्व्हेक्षणाचा अडथळामानवत तालुक्यातील ३६६ निराधार लाभार्थ्यांच्या सुक्ष्म तपासणीचे आदेश काढून तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. यामध्ये मानवत, रामेटाकळी, उक्कलगाव, केकरजवळा, सावळी, भोसा, वझूर, सावरगाव, पाळोदी, रुढी या १० गावातील २५१ लाभार्थ्यांचे तपासणी अहवाल तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. उर्वरित ४४ गावातील १०५ लाभार्थ्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. याच काळात बोंडअळीग्रस्त कापसाच्या सर्वेक्षणाचे कामही तलाठी कर्मचार्‍यांना करावे लागले. या सर्वेक्षणामुळेच अहवाल सादर करण्यास विलंब झाल्याचे कर्मचार्‍यांतून बोलल्या जात आहे. याचा त्रास मात्र निराधार लाभार्थ्यांना होत आहे. 

तलाठ्यांना सूचना दिल्या आहेतमानवत येथील तहसील कार्यालयास तालुक्यातील काही निराधार लाभार्थ्यांचे सुक्ष्म तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित निराधार लाभार्थ्यांचे तपासणी अहवाल सादर करण्याच्या सूचना तलाठ्यांना दिल्या आहेत. - अश्विनी जाधव, तहसीलदार, मानवत

टॅग्स :parabhaniपरभणी