शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

मानवत तालुक्यात निराधारांचा तपासणी अहवाल रखडला; अनुदानासाठी पहावी लागतेय वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 19:52 IST

तहसील प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांची तलाठ्यामार्फत सुक्ष्म तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप हा अहवाल तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला नसल्याने निराधारांचे अनुदान वाटप रखडले आहे. 

ठळक मुद्देसामाजिक न्याय विभागाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. या योजनेसाठी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यानी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले होते. यातील १ हजार ८७ अर्ज निकाली काढण्यासाठी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी बैठक घेण्यात आली होती. 

मानवत (परभणी ) : येथील तहसील प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांची तलाठ्यामार्फत सुक्ष्म तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप हा अहवाल तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला नसल्याने निराधारांचे अनुदान वाटप रखडले आहे. 

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना या दोन राज्य शासनाच्या तर इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या योजनेचा समावेश आहे. यातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपयांचे मानधन दिले जाते. या योजनेसाठी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यानी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले होते. यातील १ हजार ८७ अर्ज निकाली काढण्यासाठी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी बैठक घेण्यात आली होती. 

बैठकीत तहसीलदार अश्विनी जाधव यांनी ३६६ अर्ज मंूजर केले होते. तर या बैठकीत ७१५ अर्ज नामंजूर करण्यात आले होते. बैठकीत मंजूर केलेल्या पात्र लाभार्थ्यांची सुक्ष्म तपासणी करण्याचे आदेश तहसीलदार जाधव यांनी २७ नोव्हेंबर रोजी दिले होते. तलाठ्यांमार्फत ही तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. लाभार्थी मयत झाला आहे का? मुले नोकरीला आहेत का? लाभार्थी स्थलांतरित आहे का? त्यांचा आर्थिक स्तर आदींची तपासणी करण्यात येणार होती. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी केवळ दहा गावांतील २५१ लाभार्थ्यांचे अहवाल कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. इतर लाभार्थ्यांचे अहवाल मात्र आले नाहीत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. उर्वरित गावातील अहवाल सादर करण्यास विलंब करणार्‍या तलाठ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निराधारांमधून केली जात आहे. 

बोंडअळी सर्व्हेक्षणाचा अडथळामानवत तालुक्यातील ३६६ निराधार लाभार्थ्यांच्या सुक्ष्म तपासणीचे आदेश काढून तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. यामध्ये मानवत, रामेटाकळी, उक्कलगाव, केकरजवळा, सावळी, भोसा, वझूर, सावरगाव, पाळोदी, रुढी या १० गावातील २५१ लाभार्थ्यांचे तपासणी अहवाल तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. उर्वरित ४४ गावातील १०५ लाभार्थ्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. याच काळात बोंडअळीग्रस्त कापसाच्या सर्वेक्षणाचे कामही तलाठी कर्मचार्‍यांना करावे लागले. या सर्वेक्षणामुळेच अहवाल सादर करण्यास विलंब झाल्याचे कर्मचार्‍यांतून बोलल्या जात आहे. याचा त्रास मात्र निराधार लाभार्थ्यांना होत आहे. 

तलाठ्यांना सूचना दिल्या आहेतमानवत येथील तहसील कार्यालयास तालुक्यातील काही निराधार लाभार्थ्यांचे सुक्ष्म तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित निराधार लाभार्थ्यांचे तपासणी अहवाल सादर करण्याच्या सूचना तलाठ्यांना दिल्या आहेत. - अश्विनी जाधव, तहसीलदार, मानवत

टॅग्स :parabhaniपरभणी