शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी महापालिकेचा कारभार :१२ कोटींच्या खर्चाचा लेखाजोखा सादर करण्यास दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:36 IST

नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षांत देण्यात आलेल्या १२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यास परभणी महापालिकेने दिरंगाई केल्याने मनपाला २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी देण्यात येणारा ७ कोटींचा निधी प्रशासनाने रोखला आहे़ त्यामुळे मनपाच्या कामातील कासवगती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षांत देण्यात आलेल्या १२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यास परभणी महापालिकेने दिरंगाई केल्याने मनपाला २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी देण्यात येणारा ७ कोटींचा निधी प्रशासनाने रोखला आहे़ त्यामुळे मनपाच्या कामातील कासवगती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे़राज्य शासनाच्या वतीने शहरांतील दलित वस्त्यांमधील विकास कामे करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो़ या निधीतून शहरांमधील दलित वस्त्यांमध्ये रस्ते तयार करणे, नाल्या तयार करणे, पाणी पुरवठा योजनेची कामे, मलनिस्सारण, दिवाबत्ती, समाजमंदिर आदींसह दलित वस्त्यांमध्ये आवश्यक असलेली कामे करता येतात़ यासाठी राज्य शासनाच्या वतीने परभणी महापालिकेला २०१४-१५ मध्ये १ कोटी ५० लाख, २०१५-१६ मध्ये ५ कोटी ५० लाख व २०१६-१७ मध्ये ५ कोटी ५० लाख असा तब्बल १२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता़पहिल्या वर्षाचा निधी मिळाल्यानंतर दुसऱ्या वर्षाचा निधी वितरित करीत असताना पहिल्या वर्षी दिलेल्या निधीच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र राज्य शासनाकडे सादर करणे आवश्यक असते़ असे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच पुढील निधी वितरित करावा, अशा शासनाच्या सूचना आहेत; परंतु, या सूचना अडगळीत ठेवून २०१४-१५ च्या निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त न होताच २०१५-१६ मध्ये मनपाला निधी वितरित करण्यात आला़ त्यानंतर २०१५-१६ च्या निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र राज्य शासनाकडे प्राप्त झाले नसतानाही २०१६-१७ चा निधी मनपाला वितरित करण्यात आला़ अगोदरच्या वर्षाचे उपयोगिता प्रमाणपत्र आल्याशिवाय दुसºया वर्षाचा निधी वितरित करू नये, असा नियम असतानाही हा नियम डावलण्यात आला़ विशेष म्हणजे या संदर्भात कोणीही विचारणा केली नाही़२०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी मनपाला पुन्हा ७ कोटी रुपयांचा राज्य शासनाकडून निधी आला; परंतु, २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ या सलग तीन वर्षातील निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र राज्य शासनाला प्राप्त झाले नसल्याने २०१७-१८ चा ७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा कचेरीतील नगरविकास विभागाने मनपाला वितरितच केला नाही़ निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत दोन वेळा मनपाला जिल्हा नगरविकास विभागाने पत्र व्यवहार केला; परंतु, या पत्रांना मनपा प्रशासनाने उत्तर दिले नाही़ त्यामुळे निधी उपलब्ध असूनही २०१७-१८ हे आर्थिक वर्ष संपून गेले तरी तो निधी मनपाला देता आला नाही़ परिणामी एकीकडे विकास कामे करण्यासाठी निधी मिळत नसल्याची ओरड करणाºया मनपाने शासनाकडून निधी उपलब्ध झाला असतानाही तो घेण्यासाठी का हालचाली केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ तब्बल तीन वर्षे शासनाकडून निधी मिळाल्यानंतरही आलेल्या निधीतून दलित वस्त्यांमध्ये कामे पूर्ण झाली की नाहीत? कामे अपूर्ण असतील तर ती पूर्ण करण्याचा कालावधी किती असावा? अर्धवट कामे पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा कोणी करावा? या संदर्भातील कोणतेही नियोजन मनपाकडून झालेले दिसून येत नाही़ परिणामी निधी उपलब्ध होवूनही केवळ लालफितीच्या कारभारामुळे दलित वस्त्यांमधील विकास कामे होण्यास दिरंगाई होत असल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे़ंआचारसंहितेचा निधी खर्चाला फटकासध्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे़ त्यामुळे २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षातील कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र जरी मनपाने प्रशासनाकडे सादर केल तरी गेल्या आर्थिक वर्षातील पडून असलेला ७ कोटी रुपयांचा निधी प्रशासनाला वितरित करता येणार नाही़ विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता २५ मे नंतर संपणार आहे़ त्यामुळे जून महिन्यामध्येच या निधीचे वितरण होवू शकते़ परंतु, यासाठी उपयोगिता प्रमाणपत्र तयार करण्याकरीता पाठपुरावा करणाºया अधिकाºयांची गरज आह़े़ मनपाचे आयुक्तपद सध्या रिक्त आहे़ या पदाचा पदभार जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे होता, त्यांचीही आता बदली झाली आहे़ नवीन जिल्हाधिकाºयांकडे मनपाचा पदभार येऊ शकतो किंवा या पदावर अन्य एखाद्या अधिकाºयाची नियुक्ती होवू शकते़ ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निधी खर्चाला मुहूर्तही मिळणे कठीण आहे़ त्यामुळे विकास कामांसाठी निधी उपलब्ध असूनही या निधी खर्चाचे नियोजन झाले नाही. तसेच मिळालेल्या निधीतून केलेल्या कामाच्या पूर्णत्वाकडे लक्ष दिले गेले नसल्याने मनपाचा ढिसाळ कारभार यानिमित्ताने समोर आला आहे़सर्वसाधारण सभेत झाली चर्चाचमहानगरपालिकेच्या मार्च अखेरीस झालेल्या सर्वसाधारण सभेत २०१७-१८ च्या ७ कोटी रुपयांच्या दलित वस्ती सुधार योजनेचा निधी खर्च करण्यासंदर्भात चर्चा झाली़ यामध्ये हा निधी खर्च करण्यासाठी नगरसेवकांनी कामांच्या शिफारशी कराव्यात, असे ठरले़ त्यानुसार नगरसेवकांकडून शिफारशी मागविण्यात आल्या़ परंतु, या शिफारशी अद्याप परिपूर्ण आलेल्या नाहीत़ त्यामुळे कामांचे अंदाजपत्रक तयार नाही़त. त्यामुळे कामांचे अंदाजपत्रक कधी होणार? आणि त्या अंदाजपत्रकानुसार प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार? हे सध्या तरी सांगणे कठीण आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका