शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

शेती नुकसानाचे तातडीने पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST

मानवत : तालुक्यात ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

मानवत : तालुक्यात ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने बुधवार, ८ सप्टेंबर रोजी तहसीलदार डी. डी. फुफाटे यांच्याकडे करण्यात आली.

हातातोंडाशी पीक आलेले असताना पावसाने ७ सप्टेंबर रोजी धुमाकूळ घातल्याने तालुक्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, हे नुकसान न भरून येणारे आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने ८ सप्टेंबर रोजी केली. यासंदर्भात दिलेल्या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोविंद घाडगे, अनुरथ काळे, माधव शिंदे, राजेभाऊ होगे, कृष्णा शिंदे, सुरज काकडे, अमीर अन्सारी, गोपाळ पिंपळे, रामेश्वर पिंपळे, रामप्रसाद काळे, माधव भिसे, माऊली चांगले, माऊली शिंदे, आकाश गोंडगे, बाबा शेख, मुंकीद शिंदे, नितीन शिंदे यांच्या सह्या आहेत.