शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मागेल त्याला शेततळे योजनेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:30 IST

जिंतूर : यंदाच्या अर्थसंकल्पीय निधीत केवळ ३३ टक्केच निधी रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाला उपलब्ध होण्याची शक्यता ...

जिंतूर : यंदाच्या अर्थसंकल्पीय निधीत केवळ ३३ टक्केच निधी रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाला उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नव्या वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेतून नवीन कामे सुरू करू नयेत, असे आदेश कृषी आयुक्तांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे मागेल त्याला शेततळे या योजनेला शासनाचा ब्रेक लागला आहे.

तत्कालीन राज्य शासनाच्या वतीने २०१६ पासून मागेल त्याला शेततळे ही योजना राबविली. या योजनेंतर्गत दुष्काळ भागात शेततळ्याच्या माध्यमातून पाणी साठवण होऊन शेतकऱ्यांचा दुष्काळ कमी होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार शेततळे योजना राबविली जात होती. दरवर्षी जिंतूर तालुक्यात साधारणत: १०० ते १५० शेतकरी या योजनेतून शेततळे घेण्यासाठी अनुदानाची मागणी करतात. २०१६ पासून ते आतापर्यंत २ हजार ९५९ शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी तालुका कृषी विभागाकडे ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी २७९ शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. तालुक्यातील ९६२ शेतकऱ्यांनी आपल्या शेततळ्यांचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी मागील ४ वर्षात मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत राज्य शासनाकडून ३ कोटी ८० लाख ८६ हजार रुपयांचा निधी कृषी विभागाला देण्यात आला. या योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडे शेततळ्यांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाले. त्यातून शेतकरी आर्थिक प्रगती साधू लागला. मात्र राज्यात राबविण्यात येत असलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेला नव्या वर्षात सरकारने ब्रेक दिला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पीय निधीत रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाला केवळ ३३ टक्केच निधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या वर्षात मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत नवीन कामे सुरू करू नयेत, किंवा नवीन शेततळ्यांची आखणी करू नये, असे आदेश कृषी आयुक्तांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे शेततळे या महत्वाकांक्षी योजनेला राज्य शासनाच्या वतीने यावर्षी ब्रेक देण्यात आला आहे.

६९ लाख रुपये थकले

मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील १५२ शेततळ्यांचे अनुदान शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाही. ३ वर्षापासून हे अनुदान रखडले आहे. अनेक शेतकरी कृषी कार्यालयाच्या चकरा मारून थकले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने कृषी कार्यालयास ६९ लाख ५७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून लाभार्थी शेतकऱ्यांना वर्ग करावा, अशी मागणी आहे.