शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मागेल त्याला शेततळे योजनेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:30 IST

जिंतूर : यंदाच्या अर्थसंकल्पीय निधीत केवळ ३३ टक्केच निधी रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाला उपलब्ध होण्याची शक्यता ...

जिंतूर : यंदाच्या अर्थसंकल्पीय निधीत केवळ ३३ टक्केच निधी रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाला उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नव्या वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेतून नवीन कामे सुरू करू नयेत, असे आदेश कृषी आयुक्तांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे मागेल त्याला शेततळे या योजनेला शासनाचा ब्रेक लागला आहे.

तत्कालीन राज्य शासनाच्या वतीने २०१६ पासून मागेल त्याला शेततळे ही योजना राबविली. या योजनेंतर्गत दुष्काळ भागात शेततळ्याच्या माध्यमातून पाणी साठवण होऊन शेतकऱ्यांचा दुष्काळ कमी होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार शेततळे योजना राबविली जात होती. दरवर्षी जिंतूर तालुक्यात साधारणत: १०० ते १५० शेतकरी या योजनेतून शेततळे घेण्यासाठी अनुदानाची मागणी करतात. २०१६ पासून ते आतापर्यंत २ हजार ९५९ शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी तालुका कृषी विभागाकडे ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी २७९ शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. तालुक्यातील ९६२ शेतकऱ्यांनी आपल्या शेततळ्यांचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी मागील ४ वर्षात मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत राज्य शासनाकडून ३ कोटी ८० लाख ८६ हजार रुपयांचा निधी कृषी विभागाला देण्यात आला. या योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडे शेततळ्यांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाले. त्यातून शेतकरी आर्थिक प्रगती साधू लागला. मात्र राज्यात राबविण्यात येत असलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेला नव्या वर्षात सरकारने ब्रेक दिला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पीय निधीत रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाला केवळ ३३ टक्केच निधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या वर्षात मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत नवीन कामे सुरू करू नयेत, किंवा नवीन शेततळ्यांची आखणी करू नये, असे आदेश कृषी आयुक्तांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे शेततळे या महत्वाकांक्षी योजनेला राज्य शासनाच्या वतीने यावर्षी ब्रेक देण्यात आला आहे.

६९ लाख रुपये थकले

मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील १५२ शेततळ्यांचे अनुदान शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाही. ३ वर्षापासून हे अनुदान रखडले आहे. अनेक शेतकरी कृषी कार्यालयाच्या चकरा मारून थकले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने कृषी कार्यालयास ६९ लाख ५७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून लाभार्थी शेतकऱ्यांना वर्ग करावा, अशी मागणी आहे.