शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्या थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
5
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
6
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
8
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
9
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
10
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
11
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
12
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
13
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
14
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
15
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
16
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
17
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
18
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
19
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
20
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण

मागेल त्याला शेततळे योजनेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:30 IST

जिंतूर : यंदाच्या अर्थसंकल्पीय निधीत केवळ ३३ टक्केच निधी रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाला उपलब्ध होण्याची शक्यता ...

जिंतूर : यंदाच्या अर्थसंकल्पीय निधीत केवळ ३३ टक्केच निधी रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाला उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नव्या वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेतून नवीन कामे सुरू करू नयेत, असे आदेश कृषी आयुक्तांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे मागेल त्याला शेततळे या योजनेला शासनाचा ब्रेक लागला आहे.

तत्कालीन राज्य शासनाच्या वतीने २०१६ पासून मागेल त्याला शेततळे ही योजना राबविली. या योजनेंतर्गत दुष्काळ भागात शेततळ्याच्या माध्यमातून पाणी साठवण होऊन शेतकऱ्यांचा दुष्काळ कमी होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार शेततळे योजना राबविली जात होती. दरवर्षी जिंतूर तालुक्यात साधारणत: १०० ते १५० शेतकरी या योजनेतून शेततळे घेण्यासाठी अनुदानाची मागणी करतात. २०१६ पासून ते आतापर्यंत २ हजार ९५९ शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी तालुका कृषी विभागाकडे ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी २७९ शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. तालुक्यातील ९६२ शेतकऱ्यांनी आपल्या शेततळ्यांचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी मागील ४ वर्षात मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत राज्य शासनाकडून ३ कोटी ८० लाख ८६ हजार रुपयांचा निधी कृषी विभागाला देण्यात आला. या योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडे शेततळ्यांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाले. त्यातून शेतकरी आर्थिक प्रगती साधू लागला. मात्र राज्यात राबविण्यात येत असलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेला नव्या वर्षात सरकारने ब्रेक दिला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पीय निधीत रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाला केवळ ३३ टक्केच निधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या वर्षात मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत नवीन कामे सुरू करू नयेत, किंवा नवीन शेततळ्यांची आखणी करू नये, असे आदेश कृषी आयुक्तांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे शेततळे या महत्वाकांक्षी योजनेला राज्य शासनाच्या वतीने यावर्षी ब्रेक देण्यात आला आहे.

६९ लाख रुपये थकले

मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील १५२ शेततळ्यांचे अनुदान शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाही. ३ वर्षापासून हे अनुदान रखडले आहे. अनेक शेतकरी कृषी कार्यालयाच्या चकरा मारून थकले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने कृषी कार्यालयास ६९ लाख ५७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून लाभार्थी शेतकऱ्यांना वर्ग करावा, अशी मागणी आहे.