शहरं
Join us  
Trending Stories
1
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
2
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
3
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर
4
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
5
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
6
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
7
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
8
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
9
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
10
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
11
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
12
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
13
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
14
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
15
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
16
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
17
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
18
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
19
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
20
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?

निम्न दुधनात ७८ टक्के, तर येलदरीत ६१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST

दोन वर्षांपासून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा होत असल्याने उन्हाळ्यातील टंचाईची चिंता मिटली आहे. यावर्षीदेखील जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या ...

दोन वर्षांपासून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा होत असल्याने उन्हाळ्यातील टंचाईची चिंता मिटली आहे. यावर्षीदेखील जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस नोंद झाला आहे. मागील आठवड्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात ३४४ दलघमी पाणी साठविण्याची क्षमता आहे. या प्रकल्पामध्ये सध्या २४२.२०० दलघमी (७८.८४) पाणीसाठा झाला आहे. ७५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने या प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. या वर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच १४ दरवाजे उघडण्यात आले होते.

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. ९३४ दलघमी क्षमतेच्या या प्रकल्पात ८०९.७७० दलघमी उपयुक्त पाणीसाठा जमा करण्याची क्षमता आहे. सद्य:स्थितीला प्रकल्पात ४९४.३८४ दलघमी म्हणजे ६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. दोन्ही मोठ्या प्रकल्पांबरोबरच जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात १९.६४१ दलघमी (७९ टक्के) पाणीसाठा झाला असून, गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात ६.७८ (२५ टक्के) दलघमी पाणी साठवणूक झाली आहे. दोन्ही मध्यम प्रकल्पात मिळून ५१ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पावसाळ्याच्या दोन महिन्यांतच जिल्ह्यात ४५२ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत निम्मा पाऊस या दोनच महिन्यांत झाला असून, सिंचन प्रकल्प लवकरच १०० टक्के भरतील, अशी आशा निर्माण झाली आहे.