शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

निम्न दुधनात ७८ टक्के, तर येलदरीत ६१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST

दोन वर्षांपासून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा होत असल्याने उन्हाळ्यातील टंचाईची चिंता मिटली आहे. यावर्षीदेखील जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या ...

दोन वर्षांपासून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा होत असल्याने उन्हाळ्यातील टंचाईची चिंता मिटली आहे. यावर्षीदेखील जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस नोंद झाला आहे. मागील आठवड्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात ३४४ दलघमी पाणी साठविण्याची क्षमता आहे. या प्रकल्पामध्ये सध्या २४२.२०० दलघमी (७८.८४) पाणीसाठा झाला आहे. ७५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने या प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. या वर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच १४ दरवाजे उघडण्यात आले होते.

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. ९३४ दलघमी क्षमतेच्या या प्रकल्पात ८०९.७७० दलघमी उपयुक्त पाणीसाठा जमा करण्याची क्षमता आहे. सद्य:स्थितीला प्रकल्पात ४९४.३८४ दलघमी म्हणजे ६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. दोन्ही मोठ्या प्रकल्पांबरोबरच जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात १९.६४१ दलघमी (७९ टक्के) पाणीसाठा झाला असून, गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात ६.७८ (२५ टक्के) दलघमी पाणी साठवणूक झाली आहे. दोन्ही मध्यम प्रकल्पात मिळून ५१ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पावसाळ्याच्या दोन महिन्यांतच जिल्ह्यात ४५२ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत निम्मा पाऊस या दोनच महिन्यांत झाला असून, सिंचन प्रकल्प लवकरच १०० टक्के भरतील, अशी आशा निर्माण झाली आहे.