शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेकडून शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:14 IST

पाथरी : येथील रेणुका शुगर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणेकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात ...

पाथरी : येथील रेणुका शुगर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणेकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. १०० टन ऊस गाळपास २० हजारांची एंट्री द्यावी लागत असल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे.

पाथरी येथील रेणुका शुगर साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला; मात्र सुरुवातीपासूनच ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणेकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पळवणूक केली जात आहेत. यावर्षी या भागात अधिक ऊस उत्पादक असल्याने शेतकरी आपला ऊस गाळपास जातो की नाही, या विचारात आहेत. त्यामुळे कारखान्याची बैलगाडी, ट्रॅक्टर यंत्रणेकडून या संधीचा फायदा घेत लूट सुरू केली आहे. कारखान्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे या प्रकाराकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. तसेच वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण राहिले नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. कारखान्याच्या जवळपासच्या कार्यक्षेत्रात बैलगाडीने ऊस गाळपास आणला जातो. एका बैलगाडीत जवळपास २ ते अडीच टन उसाची वाहतूक केली जाते. एक टन ऊस गाळपास २०० रुपये एंट्री सर्रास घेतली जाते. त्यामुळे बैलगाडीने १०० टन ऊस एका शेतकऱ्याचा गाळप झाला तर २० हजार रुपयांची एंट्री मोजावी लागत आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टरने ऊस तोडणीसाठी एकरी ते ३ ते ४ हजार रुपये एंट्री आणि वाहतूक यंत्रणेचे वेगळेच पैसे मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे ऊस गाळपास घालण्यासाठी पैसे माेजावे लागत असल्याने ऊस उत्पादकांनी सावकारांचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे.

काटा बंद पाडण्याचा इशारा

रेणुका शुगर कारखान्याची तोडणी वाहतूक यंत्रणेकडून एंट्रीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून मोठी रक्कम उकळली जात आहे. हा प्रकार थांबला नाही तर ६ डिसेंबर रोजी साखर कारखान्याचा काटा बंद केला जाणार असल्याची माहिती आ. बाबाजानी दुर्राणी यांनी शुक्रवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.