शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

बसस्थानक परिसरात सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST

डीपींचा पादचाऱ्यांना वाढला धोका परभणी : शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेने वीज वितरण कंपनीच्या डीपी उभारण्यात आल्या आहेत. यापैकी ...

डीपींचा पादचाऱ्यांना वाढला धोका

परभणी : शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेने वीज वितरण कंपनीच्या डीपी उभारण्यात आल्या आहेत. यापैकी बहुतांश डीपीला कुलूप लावलेले नाही. तसेच काही डीपी सराड उघड्या असतात. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी हा परिसर धोकादायक ठरत आहे. त्याचप्रमाणे एखादा अपघात झाला तर गंभीर घटना घडना घडू शकते. तेव्हा महावितरण कंपनीने या डीपींना दरवाजे बसवून कुलूपबंद करावे, अशी मागणी होत आहे.

मनपाच्या उद्यानांची बकाल अवस्था

परभणी : शहरातील मनपाच्या उद्यानांची अवस्था बकाल झाली आहे. मागील वर्षभरापासून या उद्यानांमध्ये कोणतीही विकास कामे झाली नाहीत. लॉकडाऊनमुळे बंद असलेली उद्याने आता खुली करण्यात आली आहेत. मात्र शहरातील मुख्य उद्यान असलेल्या राजगोपालाचारी उद्यानातच खेळणींची दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे नेहरू पार्क, गांधी पार्क आणि शिवाजी पार्क या चारही उद्यानांची दुरवस्था झाल्याने ज्येष्ठ नागरिक व बालकांची मात्र कुचंबणा होत आहे.

जिंतूर रस्त्याच्या कामाला गती

परभणी : जिंतूर ते परभणी या महामार्गाच्या कामाला गती देण्यात आली असून, सध्या परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहरापर्यंत एका बाजूने रस्त्याची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय दूर झाली आहे. या रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करुन जिंतूर- परभणी हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

ग्रामीण बससेवेला लागेना मुहूर्त

परभणी : जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एस.टी. महामंडळाने लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत प्रमुख मार्गावरील बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातील बसफेऱ्या अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना जिल्ह्याचे अथवा शहराचे ठिकाण गाठण्यासाठी खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. खाजगी वाहतुकीने प्रवास करताना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.

जायकवाडी कालव्याचे पाणी दाखल

परभणी : जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. रबी हंगामातील तिसरे पाणी आवर्तन शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.