शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

५०० खाटांचे जंम्बाे काेविड सेंटर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:18 IST

परभणी : जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता येत्या आठ दिवसात ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार असून, ...

परभणी : जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता येत्या आठ दिवसात ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार असून, प्रत्येक तालुक्यात ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मलिक यांनी गुरुवारी शहरातील सर्व कोविड रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मलिक म्हणाले, जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाने ७०० खाटांची क्षमता सध्या उपलब्ध केली असून, आणखी ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर कल्याण मंडपम या ठिकाणी उभे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ५० खाटांचे सेंटर प्रत्येक तालुक्यात उभारून ४०० बेड आणखी वाढविले जाणार आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसामध्ये किमान १ हजार बेडची क्षमता वाढलेली जाईल. रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता जाणवू नये, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ५०० सिलिंडर भरतील असे दोन प्रकल्प जिल्ह्याला मंजूर झाले असून, त्यातून १ हजार जम्बो सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. तसेच तालुक्याच्या ठिकाणी मिनी ऑक्सिजन प्रकल्पही उभारला जाणार असून, त्याद्वारे प्रत्येक ठिकाणी ३० जम्बो सिलिंडर उपलब्ध केले जाणार आहे. तसेच ऑक्सिजन कॉनस्ट्रेटर मशीनही खरेदी केल्या जाणार असून दोन बेडवरील रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध केले जाईल. सध्या जिल्ह्याला कर्नाटकातील बेल्लारी येथील जिंदाल स्टील प्रकल्पातून दररोज २० के एल ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. रेमडेसिविर इंजेक्शन संदर्भातही तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्ह्याला मोठा साठा उपलब्ध होईल. कोविड रुग्णालयाच्या बाहेर मोठे स्क्रीन लावून रुग्णालयातील उपलब्ध बेड, ऑक्सिजन बेट या संदर्भातील माहिती द्यावी, असे आदेशही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खा. फौजिया खान, आ. डॉ. राहुल पाटील, आ. सुरेश वरपूडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जि. प. सीईओ शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार आदींची उपस्थिती होती.

रुग्णांचा मनोरंजनाची ही सुविधा

कोरोना रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना मनोरंजनाचे साहित्यही उपलब्ध करून केले जाईल. त्यानुसार रुग्णालयांमध्ये प्रत्येक ठिकाणी टीव्ही तसेच ग्रंथालय उपलब्ध केले जाणार आहेत.

जिल्ह्यात मृत्यूचा दर का वाढला

नागरिक कोरोनाचा आजार अंगावर काढतात. गंभीर झाल्यानंतरच रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर वाढला आहे. हा दर राज्याच्या दरापेक्षा ही अधिक असल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले.