शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
3
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
4
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
5
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
6
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
7
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
9
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
10
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
11
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
12
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
13
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
14
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
15
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
16
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
17
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
18
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
19
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली

५०० खाटांचे जंम्बाे काेविड सेंटर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:18 IST

परभणी : जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता येत्या आठ दिवसात ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार असून, ...

परभणी : जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता येत्या आठ दिवसात ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार असून, प्रत्येक तालुक्यात ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मलिक यांनी गुरुवारी शहरातील सर्व कोविड रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मलिक म्हणाले, जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाने ७०० खाटांची क्षमता सध्या उपलब्ध केली असून, आणखी ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर कल्याण मंडपम या ठिकाणी उभे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ५० खाटांचे सेंटर प्रत्येक तालुक्यात उभारून ४०० बेड आणखी वाढविले जाणार आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसामध्ये किमान १ हजार बेडची क्षमता वाढलेली जाईल. रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता जाणवू नये, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ५०० सिलिंडर भरतील असे दोन प्रकल्प जिल्ह्याला मंजूर झाले असून, त्यातून १ हजार जम्बो सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. तसेच तालुक्याच्या ठिकाणी मिनी ऑक्सिजन प्रकल्पही उभारला जाणार असून, त्याद्वारे प्रत्येक ठिकाणी ३० जम्बो सिलिंडर उपलब्ध केले जाणार आहे. तसेच ऑक्सिजन कॉनस्ट्रेटर मशीनही खरेदी केल्या जाणार असून दोन बेडवरील रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध केले जाईल. सध्या जिल्ह्याला कर्नाटकातील बेल्लारी येथील जिंदाल स्टील प्रकल्पातून दररोज २० के एल ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. रेमडेसिविर इंजेक्शन संदर्भातही तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्ह्याला मोठा साठा उपलब्ध होईल. कोविड रुग्णालयाच्या बाहेर मोठे स्क्रीन लावून रुग्णालयातील उपलब्ध बेड, ऑक्सिजन बेट या संदर्भातील माहिती द्यावी, असे आदेशही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खा. फौजिया खान, आ. डॉ. राहुल पाटील, आ. सुरेश वरपूडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जि. प. सीईओ शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार आदींची उपस्थिती होती.

रुग्णांचा मनोरंजनाची ही सुविधा

कोरोना रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना मनोरंजनाचे साहित्यही उपलब्ध करून केले जाईल. त्यानुसार रुग्णालयांमध्ये प्रत्येक ठिकाणी टीव्ही तसेच ग्रंथालय उपलब्ध केले जाणार आहेत.

जिल्ह्यात मृत्यूचा दर का वाढला

नागरिक कोरोनाचा आजार अंगावर काढतात. गंभीर झाल्यानंतरच रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर वाढला आहे. हा दर राज्याच्या दरापेक्षा ही अधिक असल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले.