शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

तीन कोटींच्या योजनांत अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:13 IST

राष्टÑीय पेयजल व भारत निर्माण योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ३ कोटी १३ लाख ७६ हजार ८७५ रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांमध्ये अनियमितता झाली असून, त्यातील ४५ लाख ९९ हजार ३३८ रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात येऊनही केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेकडून होत असल्याचा प्रकार समोर आला आहे़

विजय चोरडिया ।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : राष्टÑीय पेयजल व भारत निर्माण योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ३ कोटी १३ लाख ७६ हजार ८७५ रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांमध्ये अनियमितता झाली असून, त्यातील ४५ लाख ९९ हजार ३३८ रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात येऊनही केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेकडून होत असल्याचा प्रकार समोर आला आहे़जिंतूर तालुक्यात भारत निर्माण योजनेंर्गत २००६ ते ०७ या वर्षापासून लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेची कामे प्रशासकीय पातळीवर हाती घेण्यात आली होती. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे़ त्यामुळे या योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तालुक्यातील शेवडी येथे २००६-०७ या वर्षी योजनेचे काम हाती घेण्यात आले. परंतु, २३ लाख ९९ हजार ३०० रुपयांच्या या योजनेत पाणीपुरवठा समितीने १६ लाख रुपये उचलले. यामध्ये जवळपास ४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला. यातील वसुलीसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने समिती सदस्यांच्या सातबारावर बोजा टाकण्याचा प्रस्ताव महसूल प्रशासनाकडे पाठविला. मात्र महसूल विभागाने सचिवाच्याच सातबारावर बोजा टाकला असून, अध्यक्षांना अभय देण्यात आले आहे़ पोखर्णी तांडा येथील २२ लाख ७४ हजार ६०० रुपयांच्या योजनेत ७ लाख ३६ हजारांचा गैरव्यवहार झाला आहे़. सोरजा येथे १४ लाख २१ हजार ५५० रुपयांच्या योजनेत ६ लाख ५४ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे़ तसेच कडसावंगी येथील १४ लाख ३० हजार ७३९ रुपयांच्या योजनेत ४ लाख ९४ हजारांचा गैरव्यवहार झाला आहे. रायखेडा येथे २० लाख ५१ हजार २५० रुपये आणि १६ लाख ७४ हजार रुपयांच्या योजनेत गैरव्यवहार झाला असून, त्यातील ६ लाख २७ हजार रुपयांची वसुली करण्याचे निश्चित करण्यात आले होते़नागठाणा येथील १५ लाख ४७ हजार ८०० रुपये व १२ लाख १६ हजार १२३ रुपयांच्या योजनेत अनियमितता झाली असून, यातील ५ लाख ५३ हजार तर डिग्रस येथील १६ लाख ३४ हजार २९० आणि २६ हजार ३८ हजार ३०० रुपयांच्या योजनेत १ लाख रुपयांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले होते़ मानकेश्वर (चारठाणा) येथील १६ लाख ७३ हजार ५० व १६ लाख ५३ हजार १५८ रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत अनियमितता झाली असून, त्यातील २ लाख २५ हजार रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते़ बोर्डी येथील १७ लाख ११ हजार १०० व २५ लाख ७५ हजार ७४६ रुपयांच्या आणि सायखेडा येथील १९ लाख ४६ हजार ७८३ रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांमध्ये अनियमितता झाली़ तसेच डोहरा येथील ३६ लाख ८९ हजार ८६ रुपयांच्या पाणीपुरठा योजनेत अनियमितता झाली़ त्यातील ८ लाख १९ हजार ३३८ रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते़ एकूण ११ योजनांच्या कामांमधील ४५ लाख ९९ हजार ३३८ रुपयांची वसुली करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला लेखा परिक्षणातून देण्यात आले होते़ परंतु, ही वसुली केली गेली नाही़या प्रकरणी काही ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यानंतर रकमेच्या वसुलीसाठी समिती अध्यक्ष व सचिव यांच्या सातबारावर बोजा टाकण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दीड वर्षापूर्वी महसूल प्रशासनाला प्रस्ताव पाठविले होते. मात्र कारवाई करण्यासंदर्भात महसूल प्रशासन वेळकाढू भूमिका घेत आहे. त्यामुळे हे प्रस्ताव दीड वर्षापासून धूळखात पडून आहेत. या संदर्भातील प्रश्न मार्च महिन्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता़ त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसुकर व महसूल यंत्रणेला दिले होते़ परंतु, गेल्या आठ महिन्यांपासूनही या संदर्भात काहीही कारवाई झालेली नाही़ त्यामुळे कोणाला वाचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़