शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

जिल्ह्यात वाढली उन्हाची तीव्रता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:41 IST

वाहनतळ नसल्याने प्रवाशांची गैरसोय परभणी : येथील बसस्थानक परिसरात वाहनतळाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानकावरील मोकळ्या जागेत कुठेही वाहने ...

वाहनतळ नसल्याने प्रवाशांची गैरसोय

परभणी : येथील बसस्थानक परिसरात वाहनतळाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानकावरील मोकळ्या जागेत कुठेही वाहने उभी केली जात आहेत. परिणामी, स्थानकातून बस बाहेर काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे. सध्या बसस्थानक भागात नवीन बसपोर्टची इमारत उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी जुनी इमारत पाडल्याने समस्या वाढली आहे.

वाहतुकीच्या नियमांचा बोजवारा

परभणी : शहरात जागोजागी वाहतुकीच्या नियमांचा बोजवारा उडविला जात आहे. सर्रास नियम मोडत वाहने चालविली जात असल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. विरुद्ध मार्गाने वाहने चालविणे, नो पार्किंगच्या जागेत वाहन उभे करणे त्याचप्रमाणे तिबल सीट वाहन चालविले जात आहे. वाहतूक शाखेने याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गहू, हरभऱ्याचे पीक जोमात

परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिके बहरली आहेत. यावर्षी गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांचे क्षेत्र वाढले असून, नियमित पाणी उपलब्ध होत असल्याने दोन्ही पिकांची वाढ समाधानकारक आहे. त्यातच जायकवाडी आणि निम्न दुधना या दोन्ही प्रकल्पाच्या कालव्यांना पाणी सोडल्याने शेतकऱ्यांची समस्या दूर झाली आहे.

शनिवार बाजारच्या जागेचा प्रश्न खितपत

परभणी : येथील शनिवार बाजार इतर ठिकाणी भरविण्याचा ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे. मात्र, अद्यापही या बाजारासाठी जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पूर्वीच्याच जागेवर हा बाजार भरविला जात असून, प्रत्येक शनिवारी नानलपेठ कॉर्नर भागात वाहतुकीचा खोळंबा होत आहे,

मोंढा बाजारपेठेत वाढल्या असुविधा

परभणी : शहरातील मोंढा बाजारपेठेत शेतकऱ्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. बाजारपेठेतील रस्त्यांचा प्रश्न बिकट झाला आहे. बाजार समितीच्या तीन बाजूंचे रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. बाजार समिती प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

उड्डाणपुलाचे काम संथगतीने

परभणी : शहरातील रेल्वेस्थानकालगत विद्यापीठ गेटवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. या कामामुळे विद्यापीठ गेटवरील रस्त्या दोन महिन्यांपासून बंद ठेवला आहे. या पुलाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे,