शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:18 IST

२०२०-२१ या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. पेरणी केलेल्या पिकांवर हजारो रुपयांचा खर्च ...

२०२०-२१ या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. पेरणी केलेल्या पिकांवर हजारो रुपयांचा खर्च केला. मात्र काढणीस आलेले पीक अवकाळी पावसाने क्षतीग्रस्त झाले. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला. रब्बी हंगामातही पीक कर्ज व उसनवारी करून पेरणी केलेली पिके बहरली; मात्र १८ व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, तर दुसरीकडे आता रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे पेरणीचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

मशागतीचे दरही वाढले

डिझेलचे दर वाढल्याने यंत्राच्या साहाय्याने केली जाणारी मशागतही महागली आहे. नांगरणी, कोळपणी, पाळी, रोटावेटर, गहू, ज्वारी, हरभरा काढणीचे दर ५०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

१ लाख २० हजार मेट्रिक टन खताची गरज

परभणी जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियोजनानुसार दरवर्षी जवळपास ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिकांची पेरणी केली जाते. या पिकांच्या वाढीसाठी २०२०-२१ या खरीप हंगामात जिल्ह्याला १ लाख १० हजार ६५१ मेट्रिक टन खताची विक्री झाली होती. त्या अनुषंगाने यावर्षीही १ लाख २० हजार मेट्रिक टन खताची गरज आहे. मात्र एका गोणीमागे अडीचशे रुपये शेतकऱ्यांना जास्तीचे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना रासायनिक खत मोफत द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

कोरोनामुळे शेतीमालाला भाव मिळत नाही. उत्पादनावर केलेला खर्चही निघत नाही, तर दुसरीकडे रासायनिक खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करत शेतकऱ्यांची खत कंपन्यांकडून पिळवणूक सुरू आहे.

- नरसिंग ढेंबरे, शेतकरी

खरीप हंगामात बहरलेली पिके अतिवृष्टीच्या तडाख्यात वाहून गेली. त्यातच आगामी खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताच्या प्रत्येक गोणीमागे अडीचशे रुपयांची वाढ करून आर्थिक कोंडी करण्यात येत आहे.

- माणिक कदम, शेतकरी

रब्बी हंगामात हजारो रुपयांचा खर्च करून पिके वाढविली. मात्र फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळीने पिकांचे नुकसान झाले. या पिकांची मदत मिळाली नाही, तर दुसरीकडे खताचे भाव वाढवून जखमेवर मीठ चोळले जात आहे.

- विलास साखरे, शेतकरी