शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:18 IST

२०२०-२१ या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. पेरणी केलेल्या पिकांवर हजारो रुपयांचा खर्च ...

२०२०-२१ या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. पेरणी केलेल्या पिकांवर हजारो रुपयांचा खर्च केला. मात्र काढणीस आलेले पीक अवकाळी पावसाने क्षतीग्रस्त झाले. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला. रब्बी हंगामातही पीक कर्ज व उसनवारी करून पेरणी केलेली पिके बहरली; मात्र १८ व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, तर दुसरीकडे आता रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे पेरणीचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

मशागतीचे दरही वाढले

डिझेलचे दर वाढल्याने यंत्राच्या साहाय्याने केली जाणारी मशागतही महागली आहे. नांगरणी, कोळपणी, पाळी, रोटावेटर, गहू, ज्वारी, हरभरा काढणीचे दर ५०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

१ लाख २० हजार मेट्रिक टन खताची गरज

परभणी जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियोजनानुसार दरवर्षी जवळपास ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिकांची पेरणी केली जाते. या पिकांच्या वाढीसाठी २०२०-२१ या खरीप हंगामात जिल्ह्याला १ लाख १० हजार ६५१ मेट्रिक टन खताची विक्री झाली होती. त्या अनुषंगाने यावर्षीही १ लाख २० हजार मेट्रिक टन खताची गरज आहे. मात्र एका गोणीमागे अडीचशे रुपये शेतकऱ्यांना जास्तीचे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना रासायनिक खत मोफत द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

कोरोनामुळे शेतीमालाला भाव मिळत नाही. उत्पादनावर केलेला खर्चही निघत नाही, तर दुसरीकडे रासायनिक खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करत शेतकऱ्यांची खत कंपन्यांकडून पिळवणूक सुरू आहे.

- नरसिंग ढेंबरे, शेतकरी

खरीप हंगामात बहरलेली पिके अतिवृष्टीच्या तडाख्यात वाहून गेली. त्यातच आगामी खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताच्या प्रत्येक गोणीमागे अडीचशे रुपयांची वाढ करून आर्थिक कोंडी करण्यात येत आहे.

- माणिक कदम, शेतकरी

रब्बी हंगामात हजारो रुपयांचा खर्च करून पिके वाढविली. मात्र फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळीने पिकांचे नुकसान झाले. या पिकांची मदत मिळाली नाही, तर दुसरीकडे खताचे भाव वाढवून जखमेवर मीठ चोळले जात आहे.

- विलास साखरे, शेतकरी