शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:18 IST

२०२०-२१ या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. पेरणी केलेल्या पिकांवर हजारो रुपयांचा खर्च ...

२०२०-२१ या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. पेरणी केलेल्या पिकांवर हजारो रुपयांचा खर्च केला. मात्र काढणीस आलेले पीक अवकाळी पावसाने क्षतीग्रस्त झाले. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला. रब्बी हंगामातही पीक कर्ज व उसनवारी करून पेरणी केलेली पिके बहरली; मात्र १८ व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, तर दुसरीकडे आता रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे पेरणीचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

मशागतीचे दरही वाढले

डिझेलचे दर वाढल्याने यंत्राच्या साहाय्याने केली जाणारी मशागतही महागली आहे. नांगरणी, कोळपणी, पाळी, रोटावेटर, गहू, ज्वारी, हरभरा काढणीचे दर ५०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

१ लाख २० हजार मेट्रिक टन खताची गरज

परभणी जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियोजनानुसार दरवर्षी जवळपास ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिकांची पेरणी केली जाते. या पिकांच्या वाढीसाठी २०२०-२१ या खरीप हंगामात जिल्ह्याला १ लाख १० हजार ६५१ मेट्रिक टन खताची विक्री झाली होती. त्या अनुषंगाने यावर्षीही १ लाख २० हजार मेट्रिक टन खताची गरज आहे. मात्र एका गोणीमागे अडीचशे रुपये शेतकऱ्यांना जास्तीचे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना रासायनिक खत मोफत द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

कोरोनामुळे शेतीमालाला भाव मिळत नाही. उत्पादनावर केलेला खर्चही निघत नाही, तर दुसरीकडे रासायनिक खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करत शेतकऱ्यांची खत कंपन्यांकडून पिळवणूक सुरू आहे.

- नरसिंग ढेंबरे, शेतकरी

खरीप हंगामात बहरलेली पिके अतिवृष्टीच्या तडाख्यात वाहून गेली. त्यातच आगामी खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताच्या प्रत्येक गोणीमागे अडीचशे रुपयांची वाढ करून आर्थिक कोंडी करण्यात येत आहे.

- माणिक कदम, शेतकरी

रब्बी हंगामात हजारो रुपयांचा खर्च करून पिके वाढविली. मात्र फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळीने पिकांचे नुकसान झाले. या पिकांची मदत मिळाली नाही, तर दुसरीकडे खताचे भाव वाढवून जखमेवर मीठ चोळले जात आहे.

- विलास साखरे, शेतकरी