शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:18 IST

२०२०-२१ या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. पेरणी केलेल्या पिकांवर हजारो रुपयांचा खर्च ...

२०२०-२१ या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. पेरणी केलेल्या पिकांवर हजारो रुपयांचा खर्च केला. मात्र काढणीस आलेले पीक अवकाळी पावसाने क्षतीग्रस्त झाले. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला. रब्बी हंगामातही पीक कर्ज व उसनवारी करून पेरणी केलेली पिके बहरली; मात्र १८ व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, तर दुसरीकडे आता रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे पेरणीचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

मशागतीचे दरही वाढले

डिझेलचे दर वाढल्याने यंत्राच्या साहाय्याने केली जाणारी मशागतही महागली आहे. नांगरणी, कोळपणी, पाळी, रोटावेटर, गहू, ज्वारी, हरभरा काढणीचे दर ५०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

१ लाख २० हजार मेट्रिक टन खताची गरज

परभणी जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियोजनानुसार दरवर्षी जवळपास ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिकांची पेरणी केली जाते. या पिकांच्या वाढीसाठी २०२०-२१ या खरीप हंगामात जिल्ह्याला १ लाख १० हजार ६५१ मेट्रिक टन खताची विक्री झाली होती. त्या अनुषंगाने यावर्षीही १ लाख २० हजार मेट्रिक टन खताची गरज आहे. मात्र एका गोणीमागे अडीचशे रुपये शेतकऱ्यांना जास्तीचे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना रासायनिक खत मोफत द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

कोरोनामुळे शेतीमालाला भाव मिळत नाही. उत्पादनावर केलेला खर्चही निघत नाही, तर दुसरीकडे रासायनिक खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करत शेतकऱ्यांची खत कंपन्यांकडून पिळवणूक सुरू आहे.

- नरसिंग ढेंबरे, शेतकरी

खरीप हंगामात बहरलेली पिके अतिवृष्टीच्या तडाख्यात वाहून गेली. त्यातच आगामी खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताच्या प्रत्येक गोणीमागे अडीचशे रुपयांची वाढ करून आर्थिक कोंडी करण्यात येत आहे.

- माणिक कदम, शेतकरी

रब्बी हंगामात हजारो रुपयांचा खर्च करून पिके वाढविली. मात्र फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळीने पिकांचे नुकसान झाले. या पिकांची मदत मिळाली नाही, तर दुसरीकडे खताचे भाव वाढवून जखमेवर मीठ चोळले जात आहे.

- विलास साखरे, शेतकरी