शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर वाढली धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST

नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा रखडला प्रस्ताव परभणी : येथील नटराज रंग मंदिराच्या दुरुस्तीचा प्रस्ताव रखडला आहे. मध्यंतरी मनपा प्रशासनाने नाट्यगृह दुरुस्तीसाठी ...

नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा रखडला प्रस्ताव

परभणी : येथील नटराज रंग मंदिराच्या दुरुस्तीचा प्रस्ताव रखडला आहे. मध्यंतरी मनपा प्रशासनाने नाट्यगृह दुरुस्तीसाठी नगरपालिका प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र, त्याचा पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. परिणामी, मागील सहा वर्षांपासून नाट्यगृह बंद आहे.

वाळूअभावी घरकुलांची बांधकामे रखडली

परभणी : जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने, खुल्या बाजारपेठेत वाळू उपलब्ध नाही. परिणामी, चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. शासनाच्या विविध योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानात घरकूल बांधकाम करणे शक्य नसल्याने, लाभार्थ्यांनी घरकुलांची बांधकामे बंद ठेवली आहेत. प्रशासनाने लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

स्टेडियम परिसरात स्वच्छगृहाचा अभाव

परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात स्वच्छतागृह नसल्याने व्यापारी व नागरिकांची कुचंबना होत आहे. शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मनपाने या भागासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी केल्यास नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. तेव्हा जिल्हा स्टेडियम परिसरात स्वच्छतागृह उभारण्याची मागणी होत आहे.

गहू, हरभऱ्याचे पीक बहरात

परभणी : जिल्ह्यात या वर्षी गहू आणि हरभऱ्याचे पीक बहरात आहे. जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन मिळाल्याने, या पिकाला वेळेवर पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे दोन्ही पिकांची वाढ सध्या समाधानकारक आहे. यंदाच्या रब्बी हंगामात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने रब्बीचे उत्पादन वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.

उद्यानांची दुरुस्ती करण्याची मागणी

परभणी : शहरातील राजगोपालाचारी उद्यानासह इतर दोन उद्यानांची दुरवस्था झाली आहे. कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला असून, मनपाने विकास कामे हाती घ्यावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. राजगोपालाचारी उद्यानासह नेहरू पार्क आणि शिवाजी पार्क या दोन्ही उद्यानांची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहरात वाढली अस्थायी अतिक्रमणे

परभणी : शहरात मोठ्या प्रमाणात अस्थायी अतिक्रमणे वाढली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा ही अतिक्रमणे असून, वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे मनपा प्रशासन आणि वाहतूक शाखेने रस्त्याच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे हटवावीत आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.