शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
3
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
4
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
5
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
6
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
7
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
8
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
9
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
10
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
11
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
12
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
13
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
14
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
15
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
16
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
17
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
18
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
19
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
20
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढली धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:20 IST

शहरवासियांना आठ दिवसांआड पाणी परभणी : शहरात पाण्याची समस्या कायम आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा ...

शहरवासियांना आठ दिवसांआड पाणी

परभणी : शहरात पाण्याची समस्या कायम आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानाही केवळ नियोजनाचा अभाव असल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मागील वर्षीच्या उन्हाळ्यात १३ ते १५ दिवसांतून एक वेळा शहराला पाणी मिळत होते. आता ते ८ दिवसांतून एक वेळा दिले जात आहे. मनपाने नियमित आणि चार दिवसांआड पाणीपुरवठा करावा, नागरिकांची मागणी आहे.

अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर

परभणी : शहरातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. ८ ते १० महिन्यांपासून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याने शहरी भागातील रस्ते खराब झाले आहेत. नव्या वसाहतीत ही समस्या अधिक गंभीर आहे. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघातही होत असून, मनपाने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

जलवाहिनीला गळती

परभणी : शहरातील काही भागांत जलवाहिनीला गळती लागली आहे. नळाला पाणी सोडल्यानंतर रस्त्यावर पाण्याचे लोट वाहतात. मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत. तेव्हा मनपा प्रशासनाने जलवाहिनीची दुरुस्ती करून गळती थांबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

बाजारपेठ भागात पुन्हा हातगाडे

परभणी : येथील गांधी पार्क परिसरातील हातगाडे महिनाभरापूर्वी वाहतूक पोलिसांनी हटविले होते. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीसाठी होत असलेला अडथळा दूर झाला होता. मात्र आता पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. गांधी पार्क भागात मोठ्या प्रमाणात फळ आणि भाजी विक्रेते थांबत आहेत. त्यामुळे येथील वाहतूक वारंवार जाम होत आहे.

रोहयोची कामे जिल्ह्यात ठप्प

परभणी : जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेची कामे ठप्प पडली आहेत. प्रशासकीय यंत्रणेने ही कामे वाढविणे आवश्यक असताना त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. कोरोनाच्या काळात मोठ्या शहरातून अनेक मजूर परभणीत परतले आहेत. या मजुरांना त्यांच्या गावी काम उपलब्ध होत नाही. त्यामुळे शहरी भागात त्यांचे स्थलांतर होत आहे. प्रत्येकाच्या हाताला काम देण्याची जबाबदारी प्रशासनाची असून, रोहयोची कामे वाढवावीत, अशी मागणी होत आहे.