शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

जिल्ह्यात वाढले शेतीचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST

पीक विम्याच्या प्रश्नावर प्रशासनाची चुप्पी परभणी : जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त ...

पीक विम्याच्या प्रश्नावर प्रशासनाची चुप्पी

परभणी : जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाकडे तक्रारीही नोंदविल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. कृषी विभागही याबाबत फारसा पाठपुरावा करीत नसल्याने शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेपासून वंचित राहावे लागत आहे.

प्लास्टिकमुक्तीच्या ग्रामीण भागात प्रतिसाद

परभणी : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात प्लास्टिकमुक्त गाव चळवळ राबविली जात आहे. स्वच्छता अभियानाबरोबरच प्लास्टिक मुक्त गावाचे जनजागरण केले जात असून, ठिकठिकाण प्लास्टिक कचरा संकलित केला जात आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. तेव्हा न कुजणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले जात आहे.

वाहनतळांच्या जागांवर अतिक्रमण

परभणी : शहरात वाहनतळासाठी निश्चित केलेल्या जागांवर अतिक्रमण झाले असून, वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने रस्त्याच्या कडेनेच वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. शहरातील वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून निर्माण झाली आहे. मनपाने वाहनतळाच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यात सध्या रबीची पिके बहरात असून, या पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंपाला दिवसा वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, ग्रामीण भागात कृषिपंपाचा वीज पुरवठा दिवसभर खंडित ठेवून रात्रीच्या वेळी सुरू केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. महावितरण कंपनीने कृषिपंपाला दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

चौक बनला धोकादायक

परभणी : येथील स्टेडियम परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यावर चौकाची निर्मिती न केल्याने हा परिसर वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. चारही बाजूने एकाच वेळी वाहने या चौकात येतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने या ठिकाणी चौकाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.