शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाढले शेतीचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST

पीक विम्याच्या प्रश्नावर प्रशासनाची चुप्पी परभणी : जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त ...

पीक विम्याच्या प्रश्नावर प्रशासनाची चुप्पी

परभणी : जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाकडे तक्रारीही नोंदविल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. कृषी विभागही याबाबत फारसा पाठपुरावा करीत नसल्याने शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेपासून वंचित राहावे लागत आहे.

प्लास्टिकमुक्तीच्या ग्रामीण भागात प्रतिसाद

परभणी : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात प्लास्टिकमुक्त गाव चळवळ राबविली जात आहे. स्वच्छता अभियानाबरोबरच प्लास्टिक मुक्त गावाचे जनजागरण केले जात असून, ठिकठिकाण प्लास्टिक कचरा संकलित केला जात आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. तेव्हा न कुजणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले जात आहे.

वाहनतळांच्या जागांवर अतिक्रमण

परभणी : शहरात वाहनतळासाठी निश्चित केलेल्या जागांवर अतिक्रमण झाले असून, वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने रस्त्याच्या कडेनेच वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. शहरातील वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून निर्माण झाली आहे. मनपाने वाहनतळाच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यात सध्या रबीची पिके बहरात असून, या पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंपाला दिवसा वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, ग्रामीण भागात कृषिपंपाचा वीज पुरवठा दिवसभर खंडित ठेवून रात्रीच्या वेळी सुरू केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. महावितरण कंपनीने कृषिपंपाला दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

चौक बनला धोकादायक

परभणी : येथील स्टेडियम परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यावर चौकाची निर्मिती न केल्याने हा परिसर वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. चारही बाजूने एकाच वेळी वाहने या चौकात येतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने या ठिकाणी चौकाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.