शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

जायकवाडी कालव्यांची वहनक्षमता वाढवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:17 IST

परभणी : मराठवाड्यातील जायकवाडीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांची संगणकीय रचना आणि अत्याधुनिक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानानुसार रचना करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने ...

परभणी : मराठवाड्यातील जायकवाडीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांची संगणकीय रचना आणि अत्याधुनिक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानानुसार रचना करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने प्राधान्याने कामे करून सिंचनाचे क्षेत्र वाढविले जाणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी २३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खा. फौजिया खान, खा. संजय जाधव, आ. सुरेश वरपूडकर, आ.डॉ. राहुल पाटील, आ. रत्नाकर गुट्टे, जि.प. उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना, कार्यकारी संचालक के.बी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता विनय शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, जायकवाडी कालव्यांची वहनक्षमता कमी झाली आहे. त्याची सुधारणा करण्यात येणार असून, उच्च दर्जाची कामे केली जाणार आहेत. मराठवाड्यात होत असलेल्या पावसाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी कामांची आवश्यकता असेल, तेथे ती पूर्ण केली जातील. पालम तालुक्यातील डिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणीसाठ्यापैकी हक्काचा ३३ टक्के पाणीसाठा जिल्ह्यासाठी कायम राखीव ठेवण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. चाऱ्यांची तुटफूट व निर्माण झालेल्या अडथळ्यांची कामे तत्काळ हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रारंभी कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी जिल्ह्यातील प्रकल्पांची माहिती दिली. बैठकीस मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपकार्यकारी अभियंता प्रताप साेळंके यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.